शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

रफू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:16 IST

इथं आजीच्या नऊवारीची मायेची गोधडी होते, तिथं यूज अ‍ॅण्ड थ्रो कसं चालेल?

- अदिती मोघेवेस्टर्न जगात यूज अ‍ॅण्ड थ्रोची संस्कृती उदयाला यायची त्यांची कारणं असतील. मधल्या काळात ती संस्कृती वेगाने फोफावली खरी; पण आपल्याकडे हा विचार मुरायला सोपा नव्हे.पुरवून वापरणं हे आपल्या हाडात आहे. आजीचे कपडे नातीला येईपर्यंत वापरायची पद्धत आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट नव्हे. बापाच्या चपलेत पोराचा पाय पोहचेपर्यंत ती टिकवायची असते हे गृहीतक आहे.फेव्हिकॉलची ती अ‍ॅड होती बघा मागे ज्याची टॅग लाइन आहे. मजबूत जोड हे, टुटेगा नही. ते इथे सगळ्याच गोष्टींना लागू आहे. आपल्या संस्कृतीत फॅशन ही इतिहासजमा होत नाही, ती रिसायकल होत राहते.त्यामुळे शहरं सोडली तर आजही गावं याच विचारांना धरून आहेत. आणि भारत या खेड्यांचा देश आहे.पु.लं.च्या लिखाणातलं मांजरपाट कापड, मळखाऊ रंगाचं कापड हे आपल्याकडे चालतं. कारण ते मळलं तरी कळत नाही. पण असा विचार करतो म्हणजे म्हणून सौंदर्यदृष्टी नाही, असं अजिबातच नाही.राजस्थानच्या रेतीच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे रंगीबेरंगी फेटे आणि मोजड्या, पगड्या. पांढºया आणि सोनेरी रंगाच्या केरळ मधल्या साड्या, कर्नाटक मधलं इरकल, महाराष्ट्रातली कोल्हापुरी चप्पल या सगळ्यातली कॉमन गोष्ट म्हणजे त्यांचा वेगळेपणा.आजीच्या जुन्या नऊवारची नंतर मायेची मऊ गोधडी होते. माणसांच्या आयुष्याइतकीच किंबहुना त्यांच्या साड्या, धोतर, फेटे, चपलांची आयुष्य असतात असं मुळात मानणारी ही संस्कृती आहे. इथला राष्ट्रपिता पंचे नेसून जगात वावरतो आणि इथे अंतरंगाचा सौंदर्याशी थेट संबंध आहे असं मानलं जातं.माणसांचं सौंदर्य त्याच्या कपड्यांवरून नव्हे तर त्याच्या कार्यावरून मोजलं जात असल्यामुळे आपल्या मुळापर्यंत फॅशनचं वारं शिरलं नाही.त्या त्या पिढीचे बेलबॉटम्स आणि साधना कट वगैरे ट्रेण्ड्स होते, नाही असं नाही. पण घरांमध्ये कपाटात अजूनही आजीच्या, आईच्या पैठण्या नीट जपून ठवलेल्या सापडतात आपल्याला.खूप जुने झाले कपडे की बोहारणीला देऊन भांडी घ्यायची पद्धत अजूनही सुरू आहे. मी जिथे गोरेगावला राहते तिथे दर गुरुवारी जुन्या कपड्यांचा बाजार लागतो आणि दणदणीत चालतोसुद्धा.मध्यंतरी मी हिमाचलला भटकायला गेले होते, सोझा नावाच्या कुलू जवळच्या एका छोट्या गावात. तिथे मला नॅशनल स्कूल आॅफ डिझाईनमध्ये शिकणारे काही क्रिएटिव्ह विद्यार्थी भेटले, जे सगळे अशा जुन्या बाजारांमधून बिनधास्त कपडे उचलून वापरतात. तिथेच मला पॉल नावाचा पासष्टीचा ताठ आॅस्ट्रेलियन म्हातारा भेटला. आपली अनेक वर्षांची बुलेट पुरवून चवीने नीट वापरणारा. जन्म आॅस्ट्रेलियामध्ये झाला असला तर मनाने भारतीयच.पदार्थांवर, वस्तूंवर विश्वास ठेवणारी संस्कृती आहे भारतीय. गोष्टी बिघडल्या म्हणून टाकून देणारी नाहीये. चपला शिवता येतात, कपडे रफू करता येतात. या विचारांबद्दल खूप आदर आणि माया असणारा पॉलसुद्धा तीन-चार जोडी कपडे वर्षभर वापरतो.नैसर्गिक पद्धतीने बनणारे कपडे आणि धान्य यांचं मार्केटिंग सध्या जोरात सुरू आहे. पण या संस्कृतीत आॅरगॅनिकचा ट्रेण्ड फार माहीत नसतानासुद्धा सगळंच मातीकडून घेऊन मातीला परत द्यायचं असतं यावरच भर राहिलेला आहे.त्यामुळे ब्रॅण्ड्स, अ‍ॅक्सेसरीज्, डिझायनर, गोष्टी यांचं बस्तान इथे सहज बसू शकत नाही. एकीकडे मॉल्सनी शहरांना एक सारखं, मोनोटोनस करून टाकायचा विडा उचलला आहे आणि दुसरीकडे अनेक डिझायनर्स आपल्या मुळांपर्यंत जाऊन जुन्या पद्धती रिव्हाइव्ह करण्यात खूप वेळ देत आहेत. सौंदर्य साधेपणात आहे असं मानणाºया आपल्या देशाला या सगळ्या जुन्या पद्धतीचं संवर्धन करण्यासाठी मात्र मोटिव्हेशनची गरज आहे एवढं नक्की.शहरं जरी रोज बदलणाºया फॅशनच्या स्वाधीन होत असली तरी जुनं ते सोनं हा विचार आपल्या संस्कृतीतून तसाच पुढे जात राहील. पिढ्यान् पिढ्या जपल्या जाणाºया आजीच्या गोधडीसारखाच. aditimoghehere@gmail.com