शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दोस्तीचे गुन्हेगार

By admin | Updated: December 3, 2015 22:19 IST

ज्यांनी दोस्तीत विश्वासघात सहन केला, आपल्या आयुष्याची वाताहात करून घेतली अशा मित्रांनी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा म्हणत सांगितलेल्या या ५ गोष्टी.

 ज्यांनी दोस्तीत विश्वासघात सहन केला, आपल्या आयुष्याची वाताहात करून घेतली अशा मित्रांनी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा म्हणत सांगितलेल्या या ५ गोष्टी. ‘आॅक्सिजन’च्या वाचक चर्चेत सहभागी झालेले तरुण दोस्त म्हणताहेत, आम्ही चुकलो, पण तुम्ही सांभाळा! ‘दोस्तीचे गुन्हेगार’ हा ‘आॅक्सिजन’ (३० आॅक्टोबर) मधला लेख वाचून अनेक मित्रमैत्रिणींनी आपले अनुभव लिहून पाठवले. अर्थात मुलींपेक्षा मुलांची पत्रं कितीतरी जास्त. सारी एकच कथा सांगणारी! मित्रांनी आपल्याला कसं फसवलं, याच्या त्या कहाण्या. कारणं अनेक, कहाण्या अनेक, अनुभव अनेक पण तरीही त्यात एक सूत्र दिसतं. आपण ज्यांना मित्र समजून ज्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकत होतो, त्या मित्रांनीच विश्वासघात केल्याचं दु:ख तर होतंच, पण अनेकांच्या पत्रात वेदना होत्या. आपल्या आयुष्यातली अनेक महत्त्वाची वर्षे वाया गेल्याची, आणि त्यापायी स्वत:च्या जगण्याची वाताहात करून घेण्याची! त्या साऱ्या कहाण्या शांतपणे वाचल्या तर मित्रांनी आपल्याला का फसवलं किंवा आपण का फसत गेलो, याची काही कारणं या तरुण मुलांनीच सांगितलेली दिसतात. तीच ही ठळक कारणं.. अशा ५ गोष्टी, ज्या पुढच्यास ठेच, मागचा शहाणा असं समजून लक्षात ठेवायला हव्यात.. १) व्यसनांचा आग्रह वाईट संगतीला लागून आपले हाल झाले, असं कबूल करणाऱ्या सगळ्या मित्रांनी लिहिलं आहे की, व्यसन हा सगळ्यात मोठा आणि पहिला शत्रू ठरला. ‘घे रे सिगारेट, काही होत नाही’ असं म्हणत झालेली सुरुवात मग दारू आणि काहींच्या संदर्भात तर पार ड्रग्जपर्यंत पोहचली. आणि मग त्यासाठी पैसे हवेत म्हणून घरातली चोऱ्यामाऱ्यांना सुरुवात झाली. आपले मित्र आपल्याला व्यसनांच्या नादी लावून आपलं नुकसान करताहेत, भरीस घालून आपल्याला नको त्या गोष्टींची सवय लावताहेत हे त्यावेळी लक्षातही आलं नाही. आणि दोस्तीत व्यसन आणून सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जात राहिल्या, जात राहतात. २) मुलींची छेड आणि प्रेम प्रकरण विशेषत: कॉलेजात जाणाऱ्या तरुणांनी हे लिहिलंय की, तरुणींना छेडणं, नाक्यावर उभं राहणं, पाठलाग करणं यासाऱ्याला तरुण दोस्त अनेकदा डेअरिंग म्हणतात आणि ते डेअरिंग करायला भाग पाडतात. त्यातून मग मारामाऱ्या सुरू होतात. गोष्टी विकोपाला जातात. ३) फक्त थ्रीलसाठी अनेक तरुण मुलांनी लिहिलं आहे की, पैसा होता आमच्याकडे पण लाइफमधे काही थ्रील नव्हतं. त्या थ्रीलसाठी मग बाइक उचलणं, त्या दामटून कुठं तरी सोडून देणं असे प्रकार आम्ही दोस्तांनी सुरू केले. त्यातून आलेला पैसा व्यसनात गेला की मग घरातही चोऱ्या केल्या. त्या साऱ्यात थ्रील वाटू लागलं आणि आपल्याला कुणी पकडू शकत नाही, असा कॉन्फिडन्स वाढला. ४) एकटेपणा आणि घरातली शिस्त खरं तर हे कारण जरा विचित्र वाटेल, पण अनेक पत्रात मुलांनी लिहिलंय की घरात शिस्त फार. त्यात आई-बाबांना वेळ नाही. त्यांना काही सांगायला गेलं की ते लगेच भांडायला लागतात नाही तर लेक्चर तरी देतात. त्यातून एकटेपणा वाढलेला. अशावेळी दोस्तच सर्वस्व वाटतात. ते म्हणतील ते खरं आणि तेच करावंसं वाटतं. हे दोस्त तुटले तर आपलं कुणीच नाही, नसेल याची भीती वाटते. आणि मग त्यातूनच ते दोस्त जपण्यासाठी ते म्हणतील ते करायला सुरुवात होते. ५) मित्रांवर विश्वास हे खरं तर सगळ्यात मोठ पण इमोशनल कारण! दोस्तांवर विश्वास तर असतोच पण त्यांच्या विषयी प्रेम असते. आपल्या दोस्तांइतकं आपल्याला कुणी ओळखत नाही, त्यांच्या इतका आपला विचार कुणीच करू शकत नाही, अशी एक खात्री असते. त्या विश्वासापोटी मित्रांच्या भानगडीत त्यांना मदत केली जाते. त्यांच्या चुका लपवल्या जातात. आणि कधी ना कधी ते सुधारतील असं वाटून त्यांची संगत कायम ठेवली जाते. आपण केलं काहीच नाही पण त्या मित्रांच्या चुकांनी आपला घात केला, असं पत्रात अनेकांनी लिहिलंय ते त्यातल्या भयाण कहाण्यांसह! हे सारं वाचून ज्यानं त्यानं ठरवायचं की, आपले मित्र हे खरंच मित्र आहेत की, आपल्याला फसवत दोस्तीचे गुन्हेगार ठरताहेत? - आॅक्सिजन टीम