शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

कॉर्पोरेट ते निसर्ग

By अोंकार करंबेळकर | Updated: February 22, 2018 11:10 IST

अरे आता काय आपलं शिकण्याचं वय आहे का? शिकलो ना एवढं, नोकरीबिकरी लागली, आता काय नी कधी शिकणार.. असं किती सहज म्हणतो आपण. चारचौघांसारखं जगण्याच्या नादात आपल्या आवडीनिवडीच विसरून जातो.

- ओंकार करंबेळकर

मुंबईतली अरुंधती कॉर्पोरेटची नोकरी सोडून छंदालाच आपलं काम बनवते तेव्हा..अरे आता काय आपलं शिकण्याचं वय आहे का? शिकलो ना एवढं, नोकरीबिकरी लागली, आता काय नी कधी शिकणार.. असं किती सहज म्हणतो आपण. चारचौघांसारखं जगण्याच्या नादात आपल्या आवडीनिवडीच विसरून जातो. आणि मग कधीकधी हळहळतो की, वेळात वेळ काढून मनासारखं काम केलं असतं तर बरं झालं असतं. आता पैसे आहेत पण वेळ नाही..बहुतांश माणसांची हीच कहाणी. पण मुंबईत राहणाºया अरुंधती म्हात्रे यांनी मात्र आपला छंद जगायचं ठरवलं.अरुंधतीचं निसर्गाशी नातंही अगदी अपघातानं जोडलं गेलं. मुंबई-ठाण्यात राहणाºया लोकांचं आयुष्य फ्लॅटमध्येच जातं. घर, लोकल, आॅफिस आणि विकेंडला आराम यापलीकडे फारसं काहीच सहसा घडत नाही. पण अरुंधतीनं एकदा सहजच चिमण्यांसाठी एक शेल्टर बॉक्स बाल्कनीमध्ये टांगला. काही दिवसांतच चिमणा-चिमणी जोडप्यानं तिथं घरटं केलं. नव्या पाहुण्यांचा दिनक्रम पाहत बसण्याचा चाळाच अरुंधतीला लागला. मग त्यांच्या लक्षात आलं आपल्या आजूबाजूला अनेक पक्षी आहेत. त्यांचंही निरीक्षण सुरु झालं. नंतर येऊर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायला सुरुवात केली. पक्ष्यांचे, फुलपाखरांचे निरीक्षण करणं, त्यांचे फोटो काढणं अशाप्रकारे ही दोस्ती वाढत गेली.या नव्या छंदाला थोडा आणखी वेळ आणि अभ्यासाची जोड द्यायचं तिनं ठरवलं. अरुंधती संगणक अभियंता असल्यामुळे नोकरीही कॉर्पोरेट क्षेत्रातच. वन्यजीव आणि निसर्गाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी तिने पुण्यामध्ये इकॉलॉजी सोसायटीमध्ये सस्टेनेबल मॅनेजमेंट आॅफ नॅचरल रिसोर्सेस अँड नेचर कॉन्झर्वेशनचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी पुण्यात जाऊन तासाला बसायचं आणि आठवडाभर नोकरी करायची असं चक्र सुरु झालं. त्यानंतर त्यांनी ठाणे फर्न संस्थेचा फिल्ड बॉटनीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. हे सगळं सुरु असताना त्यांची भ्रमंतीही सुरु झाली. नव्या फुलांचं, झाडांचं, फुलपाखरांचं, पक्ष्यांचं निरीक्षण कर, त्यांची माहिती गोळा कर अशा सवयींमुळे त्यांचं स्वत:चं ज्ञानही बºयापैकी वाढलं होतं. त्यांच्या सात-आठ वर्षांच्या अनुभवाला आता निसर्गशिक्षणाची जोड लाभली होती.त्यानंतर अरुंधतीनं पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रातच काम करायचं निश्चित केलं. सलग १३ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात केलेली नोकरी सहजासहजी सोडणं शक्य नव्हतंच. पण निसर्गाची ओढ शांत बसू देत नव्हती. चार वर्षांपूर्वी तिनं स्वत:ची 'अरण्या' नावाची संस्था स्थापन केली. लहान मुलांना निसर्ग अभ्यासाची ओढ लागावी यासाठी त्या संस्थेद्वारे विशेष प्रयत्न केले जातात. पक्ष्यांचं खाद्य ठेवायची फीडर्स वेगवेगळ्या वस्तूंपासून कशी बनवायची हे लहान मुलांना शिकवणं, करवंट्या, माती, बांबू अशा विविध वस्तूंपासून त्या बर्डफीडर्स बनवणं सुरु झालं. ताडदेवच्या एका शाळेत आठवड्यातून तीनदा निसर्ग अभ्यासाचे धडेही मुलांना गिरवणं सुरु झालं.अरुंधती म्हणते, ‘मी जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रातील किंवा शहरात वाढलेल्या लोकांशी बोलते तेव्हा निसर्गाचा आणि आपला संबंध तुटत चाललाय हे लक्षात येतं. पैसे असले की काहीही विकत घेता येतं असं लोकांना वाटायला लागतं. शहरात राहणारी माणसं आपल्या विचित्र जीवनशैलीमुळं अनेक आजारांना, ताणाला आमंत्रण देतात हे उघड दिसतंय. खरंतर एखादं फुलपाखरू फुलावर बसलंय, घरट्यातून आत-बाहेर करत पिलांना भरवणारी चिमणी, कुंडीतल्या फुलांना येणारी रोपं नुस्ती पाहिली तरी यातला निम्मा ताण जाऊ शकतो. यासाठीच आपण सर्वांनी निसर्गाशी 'कनेक्ट' वाढवायला हवा.'हा कनेक्ट वाढवायला अरुंधती यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी निसर्गात फुकट मिळणाºया बिया आपल्या कशा उपयोगाच्या हे तरुण मुलींना तोंडी सांगण्याच्या ऐवजी त्यांनी वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये त्या या बियांचा वापर करून 'इअरिंग्ज' बनवायला सुरुवात केली. ही नव्या प्रकारच्या इअरिंग्जची कल्पना पोरींना भारी आवडली. त्यांच्या वर्कशॉपला प्रतिसादही मिळाला.बियांचे दागिने शिकवताना ही अमुक झाडाची बी, त्यामुळे पोटदुखी बरी होऊ शकते. ही बी तमुक आजारावर इलाज म्हणून आयुर्वेदात वापरली जाते अशी माहितीही त्या देतात. पारंपरिक पद्धतीने मुलांना सांगण्याऐवजी अशा गमतीदार पद्धतीने आवडेल अशा, समजेल अशा भाषेत शिकवलं तर वन्यजीव आणि पर्यावरणाची तरुणांना चांगली गोडी लागते, असं त्या म्हणतात.(लेखक लोकमत आॅनलाइनमध्ये उपसंपादक आहे.)