शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

corona virus : आता जगायचं कसं ते सांगा? - खेड्यापाडयातलं  तारुण्य कसली शिक्षा भोगतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:30 IST

परवा इचलकरंजीजवळच्या खोतवाडी भागात  बाजारला भाजी विकण्यासाठी गेलो तर  भाजी गाडीवरून उतरवायच्या आत लोक तुटून पडलं,  सोशल डिस्टन्स वगैरे हे या गर्दीला माहीत नाही. या गर्दीने पाच मिनिटांच्या आतबाहेर भाजी संपवली; तितक्यात पोलीस आले दांडके घेऊन. बाजार गुंडाळला. 

ठळक मुद्देहा दुष्काळाच्या आधीचा धोंडा महिना आहे. कसं होणार .? कुणाला माहिती.?

-श्रेणिक नरदेकोरोना विषाणू परदेशातून आला.  शेतकरी परदेशात नव्हता गेला.  शेतमजूर गेला नव्हता. चहाटपरीवाला, भाजीवाले, फुलवाले, गजरा विकणारे, इस्रीवाला, गवंडी, भांडी घासणारी, धुणं धुणारी, पंक्चर दुकानवाला, केळेगाडीवाले, लोहार, कासार, गावोगावच्या जत्रेत खेळण्याची दुकाने लावणारे, फिरून चिरमुरे, आईस्क्र ीम गारेगार विकणारे अशी ही हातावर पोटं असलेली गोरगरीब लोकं परदेशात गेली नव्हती. जगभर विशेषत: चीनमध्ये जेव्हा हाहाकार उडला होता तेव्हा आपली व्यवस्था मजेतच चालू होती. त्यानंतर आपल्या देशातील मंत्र्यासंत्र्यांनी, वजनदार लोकांनी आपलं वजन वापरून परदेशातले लोक विमानाने भारतात आणले. जुजबी तपासणी केली आणि त्यांच्या हातावर शिक्का मारून सोडून दिलं. हेच लोक आले आणि गावभर बोंबलत हिंडले. नाचले. गायले. जेवणावळ्या उठवल्या, पाटर्य़ा केल्या.अशी मजा या लोकांनी केली आणि हळूहळू यातलेच काही लोक पॉङिाटिव्ह आले. जनता कफ्यरू लागला. लगेचच दोनेक दिवसांनी लॉकडाउनचा निर्णय झाला.  लोकांनी स्थलांतर चालू केलं. गावोगावी पोलीस तैनात झाले. कारणाने बाहेर आलेले लोकही पोलिसांच्या दंडुक्याचे शिकार झाले. आज गावोगावी लोक द्राक्षांच्या बागा तोडून टाकालेत. फिरते विक्रे ते, छोटे व्यापारी बसून आहेत, चहापानटपरीवाले बसून आहेत. परवा इचलकरंजीजवळच्या खोतवाडी भागात बाजारला भाजी विकण्यासाठी गेलो तर भाजी गाडीवरून उतरवायच्या आत गि:हाइकं तुटून पडलं, सोशल डिस्टन्स वगैरे हे या गर्दीला माहीत नाही. या गर्दीने पाच मिनिटांच्या आतबाहेर भाजी संपवली; तितक्यात पोलीस आले दांडके घेऊन, बाजार गुंडाळला. देणा:यांनी पैसे दिले बाकीचे पळून गेले. ही वेळ पैशाचा हिशेब घालण्याची नाही याची जाणीव आहे. मात्र याच बाजारात एक जाणवलेली गोष्ट अशी की, जे छोटे व्यापारी दर आठवडी बाजारात दिसायचे त्यातील एकही व्यापारी दिसला नाही. कारण त्यांना वाहतुकीचं कोणतंच साधन उपलब्ध नाही. यात जास्त करून महिला होत्या, त्यांची उपजीविका कशी चालत असेल काय माहीत?जे परदेशातून आले त्यांना सरकारने अतिशय अदबीनं आणलं. मात्र लॉकडाउन झाल्यावर लोक आपापल्या घरी शेकडो किलोमीटर चालत निघाले तेव्हा त्यांची वाहतुकीची सोय केली नाही. आता जेव्हा हे लोक गावी परतले तेव्हा त्यांना रस्त्यावर बसवून त्यांच्यावर औषध फवारणी केली जातीय हा कुठला अमानुष प्रकार? हीच पद्धत रोग घेऊन येणा:या पांढरपेशा इंडियन लोकांवर का वापरली नाही. मात्र या क्वॉरण्टाइन नीट न पाळलेल्या इंडियन लोकांमुळे आज कशातच काही दोष नसलेला ग्रामीण भारतीय वर्ग भिकेला लागलेला आहे. आणि ग्रामीण तरुणाचं तर पूर्ण भवितव्य अधांतरी वाटू लागलं आहे.इंडिया आणि भारत असे या देशाचे दोन चेहरे होतेच.आता भारत, तिथला तरुण अधिक होरपळतो आहे. हा दुष्काळाच्या आधीचा धोंडा महिना आहे.कसं होणार .? कुणाला माहिती.?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या