शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : आता जगायचं कसं ते सांगा? - खेड्यापाडयातलं  तारुण्य कसली शिक्षा भोगतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:30 IST

परवा इचलकरंजीजवळच्या खोतवाडी भागात  बाजारला भाजी विकण्यासाठी गेलो तर  भाजी गाडीवरून उतरवायच्या आत लोक तुटून पडलं,  सोशल डिस्टन्स वगैरे हे या गर्दीला माहीत नाही. या गर्दीने पाच मिनिटांच्या आतबाहेर भाजी संपवली; तितक्यात पोलीस आले दांडके घेऊन. बाजार गुंडाळला. 

ठळक मुद्देहा दुष्काळाच्या आधीचा धोंडा महिना आहे. कसं होणार .? कुणाला माहिती.?

-श्रेणिक नरदेकोरोना विषाणू परदेशातून आला.  शेतकरी परदेशात नव्हता गेला.  शेतमजूर गेला नव्हता. चहाटपरीवाला, भाजीवाले, फुलवाले, गजरा विकणारे, इस्रीवाला, गवंडी, भांडी घासणारी, धुणं धुणारी, पंक्चर दुकानवाला, केळेगाडीवाले, लोहार, कासार, गावोगावच्या जत्रेत खेळण्याची दुकाने लावणारे, फिरून चिरमुरे, आईस्क्र ीम गारेगार विकणारे अशी ही हातावर पोटं असलेली गोरगरीब लोकं परदेशात गेली नव्हती. जगभर विशेषत: चीनमध्ये जेव्हा हाहाकार उडला होता तेव्हा आपली व्यवस्था मजेतच चालू होती. त्यानंतर आपल्या देशातील मंत्र्यासंत्र्यांनी, वजनदार लोकांनी आपलं वजन वापरून परदेशातले लोक विमानाने भारतात आणले. जुजबी तपासणी केली आणि त्यांच्या हातावर शिक्का मारून सोडून दिलं. हेच लोक आले आणि गावभर बोंबलत हिंडले. नाचले. गायले. जेवणावळ्या उठवल्या, पाटर्य़ा केल्या.अशी मजा या लोकांनी केली आणि हळूहळू यातलेच काही लोक पॉङिाटिव्ह आले. जनता कफ्यरू लागला. लगेचच दोनेक दिवसांनी लॉकडाउनचा निर्णय झाला.  लोकांनी स्थलांतर चालू केलं. गावोगावी पोलीस तैनात झाले. कारणाने बाहेर आलेले लोकही पोलिसांच्या दंडुक्याचे शिकार झाले. आज गावोगावी लोक द्राक्षांच्या बागा तोडून टाकालेत. फिरते विक्रे ते, छोटे व्यापारी बसून आहेत, चहापानटपरीवाले बसून आहेत. परवा इचलकरंजीजवळच्या खोतवाडी भागात बाजारला भाजी विकण्यासाठी गेलो तर भाजी गाडीवरून उतरवायच्या आत गि:हाइकं तुटून पडलं, सोशल डिस्टन्स वगैरे हे या गर्दीला माहीत नाही. या गर्दीने पाच मिनिटांच्या आतबाहेर भाजी संपवली; तितक्यात पोलीस आले दांडके घेऊन, बाजार गुंडाळला. देणा:यांनी पैसे दिले बाकीचे पळून गेले. ही वेळ पैशाचा हिशेब घालण्याची नाही याची जाणीव आहे. मात्र याच बाजारात एक जाणवलेली गोष्ट अशी की, जे छोटे व्यापारी दर आठवडी बाजारात दिसायचे त्यातील एकही व्यापारी दिसला नाही. कारण त्यांना वाहतुकीचं कोणतंच साधन उपलब्ध नाही. यात जास्त करून महिला होत्या, त्यांची उपजीविका कशी चालत असेल काय माहीत?जे परदेशातून आले त्यांना सरकारने अतिशय अदबीनं आणलं. मात्र लॉकडाउन झाल्यावर लोक आपापल्या घरी शेकडो किलोमीटर चालत निघाले तेव्हा त्यांची वाहतुकीची सोय केली नाही. आता जेव्हा हे लोक गावी परतले तेव्हा त्यांना रस्त्यावर बसवून त्यांच्यावर औषध फवारणी केली जातीय हा कुठला अमानुष प्रकार? हीच पद्धत रोग घेऊन येणा:या पांढरपेशा इंडियन लोकांवर का वापरली नाही. मात्र या क्वॉरण्टाइन नीट न पाळलेल्या इंडियन लोकांमुळे आज कशातच काही दोष नसलेला ग्रामीण भारतीय वर्ग भिकेला लागलेला आहे. आणि ग्रामीण तरुणाचं तर पूर्ण भवितव्य अधांतरी वाटू लागलं आहे.इंडिया आणि भारत असे या देशाचे दोन चेहरे होतेच.आता भारत, तिथला तरुण अधिक होरपळतो आहे. हा दुष्काळाच्या आधीचा धोंडा महिना आहे.कसं होणार .? कुणाला माहिती.?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या