शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

चीनच्या रस्त्यांवर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 8:33 AM

चीन. आपला सख्खा शेजारी. त्याच्याविषयी आपण ‘ऐकतो’. पण त्या देशात फिरताना कळतो तो चीन वेगळा दिसतो, वेगळा भासतो.. तो समजून घेताना..

-  नीलेश बने

बीजिंग विद्यापीठात पोहचताच आमचं स्वागत ‘आईए, आने में आपको कोई तकलिफ तो नही हुई ना?’ असं अस्सल हिंदीमधून झालं. साउथ एशियन स्टडीज विभागाचे प्रमुख जिंयांग जिंकुई यांनी केलेलं हे स्वागत आम्हाला अनपेक्षित नसलं तरीही कानांना आनंद देणारं होतंच. आज या विद्यापीठात जिंकुई यांचे अनेक विद्यार्थी हिंदी शिकताहेत. या साऱ्या हिंदी-चीन नात्याचे जनक होते, थोर संस्कृत पंडित झी शियानलिन. रामायणाचा संस्कृतमधून चिनी भाषेत अनुवाद करणाºया शियानलिन यांना भारत सरकारनं पद्मभूषण देऊन गौरविलं आहे. या जी शियानलिन यांचा बीजिंग विद्यापीठातील पुतळा या दोन देशांमधील हजारो वर्षांच्या समृद्ध देवाणघेवाणीची साक्ष पटवत राहतो.बीजिंगप्रमाणे चीनमधील इतरही अनेक विद्यापीठांत भारतीय भाषा आणि भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी तयार होताहेत. काही विद्यार्थी तर, भारतात येऊन येथील भाषांचा आणि समाजशास्राचा अभ्यास करताहेत. जागतिकीकरणानंतर वाढत असलेल्या भारत-चीन व्यापारी आणि भूराजकीय संबंधांसाठी चीनने उचलेले महत्त्वाचे पाऊल आहे. ज्या देशाशी आपल्याला व्यवहार करायचा त्या देशाबद्दल, तिथल्या माणसांबद्दल, भाषेबद्दल माहिती असायला हवी, हे चीननं पुरतं जाणलं आहे.भारतातही आज मेंडरिन शिकणाºयांची संख्या वाढत असली, तरी विद्यापीठीय पातळीवर मात्र पुरती बोंब आहे. चीन आणि तिथल्या समाजव्यवस्थेबद्दल आपल्याकडे समज कमी आणि गैरसमज जास्त अशी परिस्थिती आहे. चिनी माणसं क्रूर असतात, ते साप-किडे वाट्टेल ते खातात, चीनमध्ये फिरणं धोकादायक आहे अशी धारणा आपल्याला सर्रास आढळते. चीनमध्ये फिरताना मात्र यातील अनेक गोष्टी अतिरंजित आहेत याची खात्री पटत जाते. उलट भारत आणि चीनमध्ये असलेले अनेक समानतेचे धागे सहजपणे जाणवू लागतात. आज जग जवळ येत असताना आणि चीन महासत्ता म्हणून उदयाला येत असताना, चीन समजून घ्यायलाच हवा असं ठामपणे वाटू लागतं.चीनच्या कोणत्याही विमानतळातून बाहेर पडलो की, परदेशाच्या टिपिकल वर्णनाप्रमाणे, आकाशाशी स्पर्धा करणाºया इमारती, भव्यदिव्य रस्ते, त्यावरून धावणाºया सुसाट गाड्या, चकाचक स्वच्छता हे सारं पहायला मिळतं. भारतातून जाणाºया प्रत्येकाला हे चित्र ‘वॉव’ असं वाटणारं असलं, तरीही चीनची खरी ओळख पटते ते तेथील माणसांशी बोलायला लागल्यानंतर. चिनी माणूसही कुटुंबकबिल्यात रमणारा असल्यानं त्यांच्याशी सहज गट्टी जुळते. बुद्धाच्या देशातून आलेल्या भारतीय माणसांबद्दल चिनी माणसाच्या मनात असलेला आदरही अनेकदा जाणवतो. फक्त अडचण येते ती भाषेची. पण व्यवहाराच्या पातळीवर चीनने त्यावर मात केली आहे.तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात आणि तुम्हाला तिथली एखादी वस्तू आवडली की तुम्ही त्या वस्तूच्या दिशेने बोट दाखवायचं. दुकानदार ती वस्तू तुमच्या हाती काढून दाखवणार. तुम्ही खुणेने किंमत किती म्हणून विचारता क्षणीच, तो कॅलक्युलेटर हातात घेणार आणि त्यावर त्याचा आकडा टाकणार. मग तुम्ही ही किंमत मान्य नाही म्हणून मान डोलावलीत की तो त्याचा आकडा थोडा कमी करणार. तुम्ही पुन्हा मान डोलावून तुमचा आकडा त्यावर टाकलात की तो मान डोलावणार आणि त्यावरची किंमत त्यावर टाकणार. सौदा पटला तर ती वस्तू प्रेमाने पॅक करून तुमच्या हातात देत ‘श्ये श्ये’ म्हणजे ‘थँक यू’ म्हणणार.याहून एक गमतीचा प्रकार आम्ही हाँगझूमध्ये पाहिला. हाँगझू या नितांतसुंदर शहरामध्ये ग्रँडमा’ज किचन नावाचं अस्सल चिनी जेवण वाढणारं हॉटेल आहे. या हॉटेलच्या परिसरात अक्षरश: आपल्याकडील जत्रा वाटावी अशी दुकानं लागली होती. तेथील एका दुकानात एक जण साखरेच्या पाकामधून आपल्या लॉलीपॉपसारख्या कॅण्डी बनवित होता. पण त्या कॅण्डींना तो फुलपाखरू, ड्रॅगन असे विविध आकार देत होता. त्याचं ते कसब लाजवाबच होतं; पण ज्यांना चायनीज बोलता येत नाही, त्याला आपल्याला काय हवं हे कसं सांगायचे म्हणून त्याने समोर चक्क घड्याळासारखी तबकडी लावून ठेवली होती. आपल्याला ज्या आकाराची कॅण्डी हवी त्या चित्रावर काटा ठेवायचा आणि युवान द्यायचे. आपल्याला हवं ते चित्र साखरेच्या पाकातून साकारत तो आपल्या हातात देणार.‘शब्देविण संवादू’चा हा अनुभव घेत खरं तर संपूर्ण चीन फिरणंही फारसं अवघड नाही. आता तर नव्या पिढीला बºयापैकी इंग्रजी बोलता येतं त्यामुळे बीजिंग, शांघाय, ग्वांगडांग, हाँगझू आदी शहरात (त्यांच्या आणि आपल्याही) तोडक्यामोडक्या इंग्रजीतून संवाद साधता येतो.इथं पोटाशी साहसी खेळ ज्यांना करायचे नाहीत, त्यांच्यासाठी भारी पर्याय म्हणजे इंटरनेटवरील भारतीय रेस्टॉरंटची यादी तयार ठेवायची. आज चीनमधल्या प्रत्येक शहरात अनेक भारतीय रेस्टॉरंट आहेत. तिथे अगदी इडली डोश्यापासून पनीर माखनीपर्यंत आणि कटिंग चहापासून चिकन बिर्याणीपर्यंतचे पदार्थ मिळतात. समजा आपण जिथे फिरतो आहोत, तिथे जवळ भारतीय रेस्टॉरंट नसेलच, तर आसपासचे सुपरमार्केट शोधायचं भारीतली भारी फळे तिथे स्वस्तात मिळतात. तसेच ब्रेड, बटर, चीज मिळतंच. फलाहारावर किंवा ब्रेड बटरवर सहजपणे वेळ मारून नेता येते.आम्ही ज्या बीजिंगमधील हॉटेलात उतरलो होतो तिथल्या किचनमध्ये आम्हाला विजेंदर प्रसाद भेटला आणि आमचे बीजिंगमधले दिवस दाल-राइस आणि पराठा खात आनंदात गेले. उत्तराखंडमधील गढवाल विद्यापीठातून शिकलेला विजेंदर २००८ मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आॅलिम्पिक खेळाच्या वेळी शेफ म्हणून चीनमध्ये आला. तो सांगत होता की, त्याच्यासारखे बरेच जण या दरम्यान चीनमध्ये आले इथलेच झाले.भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला आणि १९४९ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. दोन्ही देशांनी एकत्रच; पण दोन स्वतंत्र मार्गाने नव्या पर्वाला सुरुवात केली. आज भारत महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना, चीन जवळपास महासत्ता बनला आहे. अर्थात या महासत्तेला अमानुष नरसंहारांची आणि हुकूमशाहीची काटेरी टोचणी आहे. तरीही गेल्या सत्तर वर्षाने चीनने जो बदल घडवलाय, तो कमालीचा विस्मयकारक आहे.जगभर कम्युनिझमचा पराभव होत असताना, चीनने भांडवलशाही स्वीकारूनही रुजविलेला कम्युनिझम भल्याभल्या अभ्यासकांना कोड्यात टाकणारा आहे. मानवी इतिहासात समूह म्हणून जगताना चीन करत असलेला हा प्रयोग विकासाकडे नेणारा आहे की विनाशाकडे हे येणारा काळच ठरवेल. पण चीनचं जे काही होईल त्याचा परिणाम भारतावर आणि पर्यायाने तुमच्या आमच्यावर होणार आहे. कारण भारत आणि चीन हे भूगोलाने जोडलेले शेजारी आहेत. त्यामुळेच चीन समजून घेणं या प्रवासात अधिक गरजेचं वाटत गेलं.भारतीय दूतावासातील एक उच्चपदस्थ अधिकारी आम्हाला सांगत होते की, आज चीन ज्या वेगाने भारताचा आणि भारतातील विविध विषयांचा अभ्यास करते आहे, त्या तुलनेत भारतात मात्र चीनचा अभ्यास होताना दिसत नाही. दोन्ही देशांमधला व्यापार आज वाढतो आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय चीनमध्ये आहे, त्याचे प्रमुख के.व्ही. कामत हे भारतीय आहेत. दुर्दैवानं भारतात मात्र चीनबद्दलचा अभ्यास गांभीर्याने होताना दिसत नाही. चीनबद्दलची अढी मनातून काढून टाकून त्यासाठी चीन फिरायला हवा, अनुभवायला हवा आणि समजून घ्यायला हवा.

(लेखक ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाउण्डेशन’ येथे रिसर्च फेलो म्हणून काम करतात. अलीकडेच त्यांनी एका अभ्यासासाठी चीनचा दौरा केला.)