शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

करिअर का अडलं? न फिरवल्यामुळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 4:39 PM

आपल्या प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं आपल्याला आपला कौशल्य संच अर्थात स्किलसेट फिरवत ठेवावा लागेल! ते कसं जमायचं?

ठळक मुद्दे निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!

-डॉ. भूषण केळकर

दहावीच्या विद्याथ्र्याना आणि त्यापेक्षाही त्यांच्या पालकांना (माझी त्यांना पूर्ण सहानुभूती!) आता प्रिलिम्सचे वेध लागले असणार. आजचीच बातमी आहे की, बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सराव करताना उत्तरं कशी लिहावी याचं मार्गदर्शन राज्य सरकार बालभारतीच्या अधिकृत ‘यूटय़ूब’ वाहिनीवर करणार आहे. तशी माहिती त्या चॅनलवरच अपलोड केली जाणार आहे!अजून एक बातमी म्हणजे बिटकॉइन किंवा इथेरियम् वगैरे आभासी चलनाविषयी आपण ऐकतोच. (त्याविषयी याच सदरात आपण काही महिन्यांपूर्वी बोललोय) तर आता भारत सरकार स्वतर्‍च त्या प्रकारची डिजिटल करन्सी म्हणजे ‘डिजिटल नोटा’ बाजारात आणण्यासाठी पावलं उचलत आहे. अजून एक बातमी. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय. ते म्हणतात, ‘ड्रोन्समुळे शेतीचा चेहरामोहरा बदलेल!’ पीकपद्धती, औषधांची फवारणी आणि विशेषतर्‍ जलसिंचनात आमूलाग्र बदल ड्रोन्स करू शकतील हे तर खरंच!अक्षरशर्‍ गेल्या दोन दिवसातील या तीन बातम्या आहेत. तिन्ही वेगळ्या क्षेत्रातल्या; पण आपल्या नेहमीच्या जीवनाशी संबंधित. तीनही बातम्यांमधला समान धागा म्हणजे ‘इंडस्ट्री 4.0’! तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच देशात सर्वसामान्य जीवनावरही परिणाम होतोय. त्या बदलांना आपण सामोरं जातोय..लहानपणी ती एक गोष्ट तुम्ही ऐकलीय ना? भाकरी का करपली, घोडा का अडला अन् विडा का रंगला नाही या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. ते म्हणजे ‘न फिरवल्यामुळे!’ ‘चेंज इज द ओन्ली परमनण्ट थिंग’ ही इंग्रजी म्हण उगीच लोकप्रिय झालेली नाही.आधीच्या एका लेखात मी कोडॅक या कंपनीविषयी लिहिलं होतं. जगातले 85 टक्के फोटोपेपर बनवणारी ही कंपनी दिवाळखोरीत गेली ती काळाची ‘डिजिटल’ पावलं न ओळखल्यानं. अशी कित्येक उदाहरणं आपण देऊ शकतो. मर्फी रेडिओ, नोकिया फोन, अ‍ॅम्बेसिडर गाडी इ.नुसतं हेच नाही तर आजच्या लेखात आपण हे समजावून घेऊ की नुसतं वस्तू वा कमोडिटीच्या बाबतीत हे घडतंय असं नाही, तर बिझिनेस मॉडेलसुद्धा बदलत आहेत. आता तर इंडस्ट्री 4.0 मध्ये तो वेग कितीतरी वाढतो आहे.हेच बघा ना-हर्टज, अवीस इ. अमेरिकन गाडय़ा भाडेतत्त्वावर देणार्‍या कंपन्या. पण या कंपन्या उबर या कंपनीपुढे फिक्या पडल्या आहेत!  हजारो/लाखो गाडय़ा ज्यांच्या मालकीच्या आहेत अशा या हर्टज व अवीस या कंपन्या. त्याउलट  उबरकडे एकही गाडी स्वतर्‍च्या मालकीची नाही! पण बिझिनेस कुणाचा जोरात आहे?दुसरं उदाहरण- शेरटॅन, हिन्टन, मॅरिअट वगैरे आलिशान हॉटेल्स.  ज्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्ता आहेत त्यांना प्रचंड टक्कर देत आह एअर बस. ज्यांच्याकडे एक दहा बाय दहाची खोलीसुद्धा स्वतर्‍ची नाही!हे घडतं आहे ते इंडस्ट्री 4.0 मधल्या अनेकविध तंत्रज्ञानाच्या उपविभागांमुळे! आणि म्हणून आपल्या सर्वानाच हे कळणं आवश्यक ठरतं!भारतात यायला वेळ असला तरी आता पेट्रोल/डिझेलवर चालणार्‍या गाडय़ांचं प्रमाण प्रगत जगात कमी होतंय हे नक्की. हायब्रिड तंत्रज्ञान (बॅटरी/सौरऊर्जा/पेट्रोल) वापरून चालणार्‍या गाडय़ा आणि विशेषतर्‍ बॅटरीवरच्या गाडय़ा यामुळे गाडय़ांचं डिझाइन बदलतंय, विलक्षण वेगानं!आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सोलर अलायन्स या जगातील 120 हून अधिक देशांच्या समूहाचं नेतृत्व मिळवून दिलं. या सौरऊज्रेवर जर गाडय़ांमधल्या बॅटर्‍या चार्ज करू लागलो तर नुसतंच प्रदूषण कमी होईल असं नाही, पण भारताचं मध्यपूव्रेवरील असणार इंधनासाठीचं अवलंबित्व आणि तद्नुषंगिक परकीय चलनाचा खर्च संपेल! त्यासाठी जसं सौरऊर्जा व नॅनो तंत्रज्ञान लागेल तसंच त्यासाठी इंडस्ट्री 4.0चे अनेक उपघटकसुद्धा लागतील.वाचकहो, ज्ञानग्रहणाचा विडा रंगायचा असेल, नोकरीची भाकरी करपायची नसेल, प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.).