शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सोलो ट्रॅव्हल! अजून कधीच तुम्ही एकटय़ानं प्रवास केलेला नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST

एकेकटय़ाने स्वत:लाच शोधण्याचा हा प्रवास करुन पहा, मग सांगा.

ठळक मुद्दे धोक्याचं म्हणाल, तर धोका कुठेही असतोच. घरातल्या घरात बसूनदेखील धोका असतोच.

प्राची  पाठक 

आजकाल सर्वत्र सोलो ट्रॅव्हलर्सबद्दल चर्चा होत असतात. आपण निमूट त्यांच्या गोष्टी आणि त्यांचे दौरे वाचत असतो. पाहत असतो. त्या सोलो ट्रॅव्हलर्समध्ये आपण आपल्याला ठेवून बघतच नाही. का? तर  ‘शक्यच  नाही’ असा फिक्स स्टॅम्प आपण आपल्यावरच मारून घेतलेला असतो.मला ते झेपणार नाही.. मला सोबत लागतेच.. एकटय़ानं काय फिरत बसायचं आणि का?.. आज-काल रोज कसल्या कसल्या बातम्या समोर येतात, आपलं काही बरंवाईट झालं तर? - असे शेकडो प्रश्न आपल्याला सतावत असतात.एकटय़ाने फिरणे हे उत्तम मेडिटेशन आहे खरं तर. हो, ती थिअरीसुद्धा आपली पाठ असते. परंतु, आपला कम्फर्ट सोडून पाठीवर झोळी बांधून बाहेर पडायची उभारी मिळत नसते. साधं पाच मिनिटांवर नेहमीच्या ठिकाणी जायचं असेल तरी अनेक जण एकमेकांना सोबत घेऊन फिरतात. लगेच गाडी काढून तयार असतात. पायी जायचं? नो, बिग नो !  नेहमीची जागा. तिथे कशाला पाहिजे कुणाची सोबत, असा प्रश्नही आपल्याला पडत नाही, इतकी आपल्याला कोणाच्या तरी सोबत असायची सवय झालेली असते. 

काय करता येईल?

मानसशास्नत एक शब्द आहे र्‍ माइंडफुलनेस ! आपण जे काही काम करतोय, त्याबद्दल पूर्ण जागरूक/सतर्क  असणं ! एकटय़ाने फिरताना हाच माइंडफुलनेस झकास कामाला लागतो. दैनंदिन ताणाच्या गोष्टींपासून आपल्याला दूर नेतो. एकटं फिरताना प्रत्येक गोष्ट नीट लक्ष देऊन करावी लागते. आपली जबाबदारी कुणावर सोपवून चालत नाही. कुठून कुठे जायचं, कसं जायचं, त्या त्या ठिकाणी भेटणारी लोकं, तिथे किती वेळ घालवायचा, आर्थिक व्यवहार, आपल्या आवडीनिवडी, आपली सुरक्षा हे आणि असं सगळं भान आपलं आपल्याला ठेवावं लागतं. ते भान सतत आपल्या जागी तेवत ठेवणं म्हणजेच एक प्रकारचं मेडिटेशन!त्यासाठी फार दूर जायचीदेखील गरज नाही. आपल्याच सोसायटीपासून सुरुवात करा. तिचा मॅप बघा. त्यानुसार कोणते भाग आपण पाहिले नाहीत, कोणत्या रस्त्याने गेलेलो नाही, ते रस्ते पायाखालून जाऊ दे. आपल्याच कॉलेजात, ऑफिसलासुद्धा वेगवेगळ्या रस्त्यांनी जाऊन बघा. आपल्या शहरात आपण ठरवून, शहर बघायला म्हणून फार कमी वेळा फिरतो. ते करून पाहा.काही भागातून एकटय़ानं पायी फिरायचं. कुठे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायची. कधी आपलं वाहन न्यायचं. कधी सायकलवर जायचं, कधी बाइकवर. आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारणं, त्यांचे खाद्यपदार्थ, संस्कृती, पेहराव समजून घेणं, त्यांची भाषा शिकणं असं सगळं ह्या सोलो ट्रॅव्हलमध्ये करता येतं.आधी आपल्या आसपास फिरा. मग इतर लहान मोठी शहरं पायाखाली घालण्याचे बेत आखा. त्यांची माहिती वाचायची. तिथे काय काय बघण्यासारखं आहे त्याबद्दल आणखीन माहिती लोकांकडूनच घ्यायची. त्या त्या ठिकाणच्या प्रसिद्ध डिशेश खाऊन बघायच्या. तिथले बाजार पिंजून काढायचे. हळूहळू आपला परीघ विस्तारत न्यायचा. आणखीन लांबचे सोलो ट्रॅव्हल करायचे. त्यासाठी आधी घरातून बाहेर तर पडा. आपल्या आळसाला आणि भीतीला एक धक्का मारणं फार महत्त्वाचं त्यासाठी! 

त्याने काय होईल?

1. असे सोलो प्रवास आपला आत्मविश्वास वाढवतात. संवादकौशल्य नीट तासून घ्यायला मदत करतात. निर्णय घेण्याची सवय लावतात. घेतलेल्या निर्णयातून जे बरंवाईट घडेल, त्याचीही जबाबदारी घ्यायला शिकवतात. 2. स्वतर्‍ला समजून घेण्यासाठीसुद्धा सोलो ट्रॅव्हल कामास येऊ शकतो. डोक्यातला गोंधळ मिटवायला त्याने मदतच होऊ शकते. 3. प्रत्येक सफरीनंतर आपल्याला किती फ्रेश वाटतं, किती नवीन विचार डोक्यात येत राहतात ते तुम्हाला जाणवेल. 4. धोक्याचं म्हणाल, तर धोका कुठेही असतोच. घरातल्या घरात बसूनदेखील धोका असतोच. तर धोक्याचीदेखील जबाबदारी घेण्यासाठी एकटय़ाने घराबाहेर पडायला हवं!