- डॉ. अविनाश मोरे, निर्माण 6
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस केलं. इंटर्नशिप झाल्यावर ग्रामीण भागात बंधपत्रित सेवा पूर्ण करायची, हे डोक्यात होतं. त्यामुळं तिथं लागणारी आवश्यक ती कौशल्यं आणि ज्ञान आपल्याकडे हवे म्हणून इंटर्नशिप करताना जास्तीत जास्त वेळ दवाखान्यात घालवला. जेवढं काही शिकता येईल, ते शिकायचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी वैद्यकीय महाविद्यालयात काम केलं होतं. येथे मनुष्यबळ कमी आणि त्याप्रमाणात इथे येणारी रु ग्णसंख्या ही खूप जास्त आहे. हे लोक इथे येतात ते यांना पीएचसीवर न मिळणा:या उपचारांमुळे किंवा गरज नसताना विनाकारण केलेल्या संदर्भसेवेमुळे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी म्हणून रु जू होताना डोक्यात एकच गोष्ट होती की, विनाकारण मी कोणत्याही रु ग्णाला पुढच्या स्तरावर संदर्भित करणार नाही. या काळात मला नांदेड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र माळाकोळी, बरबडा आणि अर्धापूर अशा तीन ठिकाणी सेवा देण्याची संधी मिळाली. वैद्यकीय महाविद्यालयात काम करताना तिथे आपल्या मागे सीनिअर आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असते; पण प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र जे काही असता, ते केवळ आणि केवळ तुम्हीच!त्यामुळे इथे आल्यावर ब:याच वेळेला मला एकटय़ाला निर्णय घ्यायला जड गेलं. पहिल्या ठिकाणी रुजू झाल्याच्या 4-5 दिवसातच एकेदिवशी सकाळी सकाळी एका रु ग्णाला घेऊन नातेवाइकांचा घोळका आला. काय झालं असं विचारलं तर, रात्री झोपताना ठीक होते. आता सकाळी रोजची उठायची वेळ होऊन गेली, म्हणून उठवायला गेलो, तर काहीच हालचाल करत नाहीहेत, असं एका दमात त्या मुलाने सांगून टाकलं. काहीतरी लवकर करा म्हणून ते 7-8 नातेवाईक माङया तोंडाकडे पाहत बसले. रु ग्ण दगावला आहे असं कळतं होतं; पण या आधी कधी मृत्यू झाला आहे असं मी सांगितलं नव्हतं. इतरांना काम करताना पाहिलं होतं. त्यामुळे हाताची, गळ्याची, पायाची कुठलीतरी नाडी लागते का ते परत परत पाहील. कुठेच काहीच नव्हतं. तरीही परत एकदा एका सीनिअरला कॉल करून अजून काही पहायचं का, हे विचारल. आणि मग नातेवाइकांना मृत्यू झाल्याच कळवलं. त्यानंतरही तो पूर्ण दिवस मनाला अनाहूत भीती लागून राहिली होती की, मी योग्य तो निर्णय दिलाय ना? त्या दिवशी मला कळलं की, इथे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जरी मिळत असलं, तरी त्यासोबतच भली मोठी जबाबदारीही आपल्यावर आहे.असंसर्गजन्य रोग आणि त्याचे परिणाम यांचं प्रमाण गरजेपेक्षा खूप अधिक असल्याचं या एक वर्षात जाणवलं. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांची औषधं वर्षानुवर्षे घ्यावी लागतात; पण याबाबतीत लोकांचं आरोग्य शिक्षण करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो असं जाणवलं. या गोळ्या चालू असताना रुग्णाला गोळ्यांच्या प्रभावामुळे त्रस जाणवत नाही. कालांतराने मला काहीच त्रस होत नाही, तर मग गोळ्या का खायच्या, अशी मानसिकता तयार होते. मग ते मनानेच गोळ्या घ्यायचं बंद करतात. काही वेळा हे ही जाणवलं की महिन्याला तीन-चारशे रु पये खर्च औषधांवर करणं लोकांना परवडत नाही. त्यामुळेही गोळ्या बंद होतात. हळूहळू रक्तदाब वाढू लागतो आणि मग एखाद्या दिवशी अर्धागवायू (पॅरालिसिस) झटका बसतो. यासाठी मग येणा:या अशा प्रत्येक रुग्णाला, तुम्हाला काही त्रस नसला तरीही हे औषध चालू ठेवणं का गरजेचं आहे, हे समजावून सांगायला सुरुवात केली. माङया या काळात हे ही जाणवलं की स्रियांमध्ये रक्तक्षयाचं प्रमाण अधिक आहे. अशा गरोदर मातांना कमी वजनाची मुलं जन्मतात, मग ते वारंवार आजारी पडतात.या सर्व प्रसंगातून मला हे कळलं की, डॉक्टर म्हणून माझं काम हे फक्त यांना गोळ्या देऊन संपत नाही! तर त्याच्याही पलीकडे जाऊन रु ग्ण गोळ्या घेतात का, घेत असतील तर योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतात का, घेत नसतील तर का घेत नाहीत, त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी मी काय करू शकतोल इथर्पयत हा प्रवास सुरू असायला हवा. डॉक्टर म्हणून माझी ही भूमिका मी या काळात नव्यान शिकलो.
***
निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?
तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवड प्रक्रि या सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.