शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

मुळात तुम्हाला एमबीए करायची गरजच काय?

By admin | Published: May 28, 2015 2:59 PM

एमबीए ही एक अत्यंत ‘बेसिक’ डिग्री आहे. तिच्यावर करिअरचे इमले बांधले जाऊ शकत नाहीत!एमबीए करू का?

कुणी म्हणतं एमबीए कर, त्यातून झटपट करिअरला लिफ्ट मिळेल, कुणी म्हणतं एमबीए करू नकोस, त्याची किंमत आता बीए एवढीच! एमबीए करूनही काही उपयोग नाही?

मी नक्की करू काय? एमबीए करू की नकोच?
 
 आयआयएम-अहमदाबाद नावाच्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेत जर तुम्हाला अॅडमिशन मिळत असेल, तर मी एमबीए करू का, हा प्रश्नच निकालात निघतो.
पण ज्यांना अशा बडय़ा दर्जेदार संस्थेत अॅडमिशन मिळत नाही, ज्यांची बौद्धिक कामगिरीही जेमतेम आहे, बाकी काहीच दिसत नाही म्हणून मग कुठल्याही ‘डी’ग्रेड कॉलेजात एमबीएला प्रवेश घ्यावा का? -तर नाही. तिथं एमबीए करून काहीच उपयोग नाही आणि काहीच जमलं नाही म्हणून एमबीए करावं, असं तर अजिबात नाही.
पण, त्यातल्या त्यात जी मुलं हुशार आहेत, पण आयआयएम दर्जाची नाहीत त्यांनी काय करावं?
त्यांनी एमबीए करताना किमान एवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे की, त्या कॉलेजने तुम्हाला तुमच्या पोटेन्शियल एम्प्लॉयर्सना तरी भेटवलं पाहिजे. बॅँका, लाइफ इन्श्युरन्स कंपन्या, फायनान्स कंपन्या हे जग तरी तुम्हाला दिसलं पाहिजे. तसं होणार नसेल, तर तुमच्या एमबीए करण्याला काहीच अर्थ नाही.
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायला हवं की, एमबीए ही एक अत्यंत बेसिक डिग्री आहे. बीए, बीकॉम, बीएस्सीसारखी एक बेसिक डिग्री. त्यामुळे आपण फार मोठं काही शिकतोय, असं समजू नका. एमबीए करण्याचे फक्त काही फायदे आहेत, असं समजा..
1) तिथं प्रवेश घेतल्यावर तुमच्यापेक्षाही ‘सुपीरिअर’ असणा:या काही हुशार मुला-मुलींशी तुमची ओळख होईल. आपण नक्की कुठं उभे आहोत, याचं थोडं भान येईल.
2) एमबीएला शिकवणा:या चांगल्या शिक्षकांशी ओळख होईल.
3) कार्पोरेट इंडियाशी थोडीबहुत ओळख होईल, त्यातले काही कॅम्पस रिक्रुटमेण्टसाठीही कदाचित ते तुमच्या कॉलेजता येतील!
त्यामुळे तुम्ही एमबीए करणारच असाल तर हे सारं लक्षात ठेवा. 
आणि एमबीएला जायचंच असेल तर तुम्हाला उत्तम मार्क तरी मिळायला हवेत. (नाहीतर तुमच्या वडिलांकडे पैसे तरी हवेत, त्या जोरावर बडय़ा कॉलेजात अॅडमिशन घेता येईल.)
 
एमबीए करायचंच असं ठरवलंय, निर्णय पक्का झालाय, पण प्रश्न एकच, चांगलं कॉलेज कसं निवडायचं, नक्की कुठं अॅडमिशन घ्यायचं, कुठल्या दिशेनं जायचंच नाही?
 
1) ‘मला एमबीए का करायचंय?’ हाच प्रश्न मुळात स्वत:ला ठाकूनठोकून विचारा. बीए, बीएस्सी, बीकॉम असं काहीतरी करायचं आणि मग ऐनवेळेस ठरवायचं की, चला आता पुढे काहीतरी करायचं तर एमबीए करू! मला तर अशाही काही मुली माहिती आहेत, ज्यांनी लग्न टाळायचं म्हणून फक्त एमबीएला अॅडमिशन घेतले. या अशा कारणांसाठी एमबीए करूच नका, त्याचा काही उपयोग नाही.
विचार करायचाच असेल तर पॉङिाटिव्हली करा.  आपल्याला त्या क्षेत्रत काहीतरी काम करायचंय, करिअर घडवायचंय हे पक्कंअसेल तरच एमबीएच्या वाटय़ाला जा!
 
2) एमबीए झाल्यावर कुठं काम करायची तुमची इच्छा आहे, हा प्रश्नही आत्यंतिक महत्त्वाचा. तुम्हाला फायनान्समध्ये अत्यंत उच्च स्तरावर काम करण्याची महत्त्वाकांक्षा असेल, तर न्यूयॉर्क, लंडन, हॉँगकॉँग, सिंगापूर, दुबई या शहरात इंटरनॅशनल करिअर आहे. आणि तिथे पोहोचायचं असेल, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या कॉलेजातून एमबीए करायला हवं. तुम्हाला भारतात बॅँकेतच नोकरी करायची असेल तर एमबीए कशाला करता, त्यासाठी बॅँकाच्या परीक्षा द्या.  
मुद्दा काय, आपल्याला कुठे आणि काय काम करायचंय हे ठरवून एमबीएसाठी कॉलेज निवडा!
 
3) एमबीएची डिग्री तुम्हाला फोकस करायला शिकवते. नुसतं फायनान्समध्ये करिअर असं म्हणून नाही चालत, तर कार्पोरेट फायनान्स, ब्रोकरेज, इन्व्हेस्टमेण्ट बॅकिंग, नक्की कशात काम करायचंय हे ठरवावं लागतं. त्याप्रमाणो कॉलेज निवडायला हवं. त्यामुळे आपल्याला करायचं काय हे ठरवून मग त्यात स्पेशलायङोशन असलेलं कॉलेज निवडा!
 
4) कुठल्याही कॉलेजात जाऊन एमबीएची डिग्री आणली असेल तर त्या डिग्रीला बाजारात काही किंमत नाही हे लक्षात ठेवा!
पी. व्ही. सुब्रमण्यम
सुप्रसिद्ध अर्थसल्लागार आणि विश्लेषक