शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून आपण पास की नापास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 7:59 AM

देशासाठी आपण काय करतो? आपण आहोत का जबाबदार नागरिक? बजावतोय का, आपली राष्ट्रीय कर्तव्यं?

ठळक मुद्देसांगा, किती मार्क द्यायचे आपण आपल्याला?

- अनन्या भारद्वाज

उद्या ऑगस्ट क्रांतिदिन.चले जाव नारा दिला, तो हा दिवस. 9 ऑगस्ट. पुढच्याच गुरुवारी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन.हे सारे उल्लेख आले की, आपला अभिमान डोळ्यात पाणी म्हणून तरळतो. आपल्या देशाचा, आपल्या प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो. ते वाटणं चूक नाहीच, पण हे सारं करताना स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्यं चोख बजावतो का, याचाही जरा ताळमेळ कधीतरी मांडला पाहिजे.आपण व्यवस्थेला, सरकारला, नेत्यांना प्रश्न विचारतो, त्यांना म्हणतो की, सांगा, देशासाठी तुम्ही काय केलं?समजा, हा प्रश्न कुणी आपल्यालाच विचारला की, तुम्ही देशासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करता. कसे वागता तर आपण काय उत्तर देऊ?देशभक्ती म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे, तर कर्तव्यपूर्तीही आहे. अधिकारापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं, ते निरपेक्ष भावनेनंच आधी करायला हवं. ते आपण करतो का?जरा तपासून पाहू.1) सिग्नल पाळले जातात की तोडले जातात?2)ओव्हर स्पीडिंग होतं की नाही?3) रस्त्यात, टर्नवर गाडी थांबवून फोनवर बोलतो की नाही?4) गाडी चालवताना फोनवर बोलतो की नाही?5) रांगांची शिस्त पाळतो का?6) रस्त्यात पचापचा थुंकतो का?7) रस्त्यात कचरा टाकतो का?8) बस, ट्रेन इथं कचरा टाकतो का?9) गड-किल्यांवर जाऊन काहीबाही खरडतो का?10) सामाजिक शिस्त पाळतो का?11) अपघात झाला तर शूट करतो की जखमीला मदत करतो?12) सर्वत्र नियम पाळतो की मी तमक्याचा ढमका म्हणून ओळखी सांगतो?13) वेळेवर सगळी बिलं भरतो का?-अशी यादी कितीही मोठी करता येईल. आपण आपल्या देशावर प्रेम करतो तर या देशातले कायदे पाळणं, ते निभावणं ही आपली जबाबदारी नाही का? ते आपलं राष्ट्रप्रेम नाही का?आपण आपलं राष्ट्रप्रेम कशात मोजणार? कसं दाखवणार? की निव्वळ घोषणा देणार? निव्वळ नारेबाजी करून पोकळ आवेश दाखवणार?हे प्रश्न आपणच स्वतर्‍ला विचारले पाहिजे, जय हिंद म्हणताना मी उत्तम नागरिक बनेल म्हणून काय काय केलं हे सांगता आलं पाहिजे.विचारा स्वतर्‍ला, आपण एक उत्तम नागरिक म्हणून स्वतर्‍ला दहा पैकी किती मार्क द्याल? आणि ते कमी असतील गुण तर कसं बदलणार स्वतर्‍ला.आजपासूनच!

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)