शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

आंधृड ते मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 20:00 IST

कुठं छोट्या गावातली शिक्षणाची पायवाट कुठं मुंबईतला हायवे; पण उडाण भरायची तर प्रवास हवाच..

- ऋतुराज वृक्षराज देशमुखआंधृड माझं गाव. ३००० लोकवस्तीचं खेडं. शेती मुख्य व्यवसाय. गावच्या बालवाडीत गेलो मग तिथून माझ्या गावापेक्षा मोठ्या गावी डोणगाव जानेफळ गावच्या कॉन्व्हेंटमध्ये व नंतर तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमात माझं शिक्षण झालं. सत्यजित शाळेत सीबीएसई पॅटर्नला थोडा स्थिरावून मी दहावी उत्तीर्ण झालो.दहावीनंतर पुढे काय प्रश्न होताच. पुढं इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. गाव, घर, आईबाबांना सोडून गावापासून शंभर किमी दूर अकोला येथे निघालो. तिथं माझं सामान लावून आईबाबा गावाकडे परत निघाले. आईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले. आई पदरानी अश्रू पुसत होती. पहिली ताटातूट झाली. माझी पहिली रात्र सुरू झाली. घराकडील आठवणींनी..दोन वर्षे सरली. बारावीची परीक्षा झाली. टेक्निकल बोर्डाची परीक्षा, जेईईच्या दोन परीक्षा, सीईटी, एईईटी व एनडीए परीक्षेनिमित्त नागपूरपर्यंत प्रवास झाला. निकाल आले, इंजिनिअरिंग, मेडिकल व एनडीएमध्ये पास झालो. मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. मुंबईत व्हीजेआयआटीला प्रवेश घेतला.मुंबईत आल्यानंतर माझा पाऊलवाटेवरचा प्रवास संपल्यासारखं वाटायला लागलं. घर दिसत होतं. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठं असणार माझ्या अंगणातलं निंबाचं झाड, माझ्याच बरोबर वाढलेलं. त्यालाच दादांनी पंचमीला खास बांधून दिलेला झोका, पारिजातकाच्या फुलांचा सुगंध, गणपती, नवरात्रीत फुलं वेचणारी लहान मुलं, अशोकाचं झाड, वडाचं झाड, अंधाऱ्या सकाळी कोकिळेचा कुहू कुहू आवाज, माझी सत्यजित शाळा, स्कूल बसचा प्रवास, जीव लावणाºया नायडू मॅम, माळीसर, अकोल्याचे आकाशसर, खोलीमालक धनोकार काका-काकू सगळे आठवत राहिले.रात्रीला ९ - ९.३० वाजता सामसूम होणारं माझं गावं, रविदादाच्या दुकानासमोरील माणसाच्या रंगलेल्या गप्पा. प्रसन्न सकाळ. इथं मुंबईला कोकीळ नाही. पेरते व्हा म्हणणारे पक्षी नाही की सोनेरी किरणाचा कवडसाही नाही.मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये आम्ही चार मित्र राहतो. चार भागातून चार गावातून आलेलो, एकमेकांचे स्वभाव, राहणीमान काहीच माहीत नव्हते. पण या मित्रांनी जीव लावला, आमचं एक घर झालं सगळ्यांचं मिळून.माझ्या पाऊल वाटेचा प्रवास मेट्रो शहराच्या महामार्गावर आला आहे. माझा ध्येयपूर्तीचा प्रवास एरोनॉटिकलमध्ये रिसर्च करण्याचा आहे. आईबाबा आयएएस होण्याचे स्वप्न पाहतात. पण मला वाटतं एरोनॉटिकलमध्ये संशोधनाची संधी मिळाली तर हा प्रवास कधीच संपणार नाही. सध्या मुंबईत एक थांबा आहे चार वर्षांचा इतकंच.मुंबईतील गगनचुंबी इमारती, लोकलच्या ट्रेन, अजून न पाहिलेला समुद्र, मित्र, इथली धावपळ, संस्कृती, कॉलेजचं जग, कॅन्टीन, मी राहत असलेली सोसायटी हे सारं माझं वाटतंय आता...मुंबईला मी आपला वाटेल अशी आशा आहेच..(आंधृड, ता. मेहकर, जि. बुलढाणा)