शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आंधृड ते मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 20:00 IST

कुठं छोट्या गावातली शिक्षणाची पायवाट कुठं मुंबईतला हायवे; पण उडाण भरायची तर प्रवास हवाच..

- ऋतुराज वृक्षराज देशमुखआंधृड माझं गाव. ३००० लोकवस्तीचं खेडं. शेती मुख्य व्यवसाय. गावच्या बालवाडीत गेलो मग तिथून माझ्या गावापेक्षा मोठ्या गावी डोणगाव जानेफळ गावच्या कॉन्व्हेंटमध्ये व नंतर तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमात माझं शिक्षण झालं. सत्यजित शाळेत सीबीएसई पॅटर्नला थोडा स्थिरावून मी दहावी उत्तीर्ण झालो.दहावीनंतर पुढे काय प्रश्न होताच. पुढं इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. गाव, घर, आईबाबांना सोडून गावापासून शंभर किमी दूर अकोला येथे निघालो. तिथं माझं सामान लावून आईबाबा गावाकडे परत निघाले. आईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले. आई पदरानी अश्रू पुसत होती. पहिली ताटातूट झाली. माझी पहिली रात्र सुरू झाली. घराकडील आठवणींनी..दोन वर्षे सरली. बारावीची परीक्षा झाली. टेक्निकल बोर्डाची परीक्षा, जेईईच्या दोन परीक्षा, सीईटी, एईईटी व एनडीए परीक्षेनिमित्त नागपूरपर्यंत प्रवास झाला. निकाल आले, इंजिनिअरिंग, मेडिकल व एनडीएमध्ये पास झालो. मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. मुंबईत व्हीजेआयआटीला प्रवेश घेतला.मुंबईत आल्यानंतर माझा पाऊलवाटेवरचा प्रवास संपल्यासारखं वाटायला लागलं. घर दिसत होतं. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठं असणार माझ्या अंगणातलं निंबाचं झाड, माझ्याच बरोबर वाढलेलं. त्यालाच दादांनी पंचमीला खास बांधून दिलेला झोका, पारिजातकाच्या फुलांचा सुगंध, गणपती, नवरात्रीत फुलं वेचणारी लहान मुलं, अशोकाचं झाड, वडाचं झाड, अंधाऱ्या सकाळी कोकिळेचा कुहू कुहू आवाज, माझी सत्यजित शाळा, स्कूल बसचा प्रवास, जीव लावणाºया नायडू मॅम, माळीसर, अकोल्याचे आकाशसर, खोलीमालक धनोकार काका-काकू सगळे आठवत राहिले.रात्रीला ९ - ९.३० वाजता सामसूम होणारं माझं गावं, रविदादाच्या दुकानासमोरील माणसाच्या रंगलेल्या गप्पा. प्रसन्न सकाळ. इथं मुंबईला कोकीळ नाही. पेरते व्हा म्हणणारे पक्षी नाही की सोनेरी किरणाचा कवडसाही नाही.मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये आम्ही चार मित्र राहतो. चार भागातून चार गावातून आलेलो, एकमेकांचे स्वभाव, राहणीमान काहीच माहीत नव्हते. पण या मित्रांनी जीव लावला, आमचं एक घर झालं सगळ्यांचं मिळून.माझ्या पाऊल वाटेचा प्रवास मेट्रो शहराच्या महामार्गावर आला आहे. माझा ध्येयपूर्तीचा प्रवास एरोनॉटिकलमध्ये रिसर्च करण्याचा आहे. आईबाबा आयएएस होण्याचे स्वप्न पाहतात. पण मला वाटतं एरोनॉटिकलमध्ये संशोधनाची संधी मिळाली तर हा प्रवास कधीच संपणार नाही. सध्या मुंबईत एक थांबा आहे चार वर्षांचा इतकंच.मुंबईतील गगनचुंबी इमारती, लोकलच्या ट्रेन, अजून न पाहिलेला समुद्र, मित्र, इथली धावपळ, संस्कृती, कॉलेजचं जग, कॅन्टीन, मी राहत असलेली सोसायटी हे सारं माझं वाटतंय आता...मुंबईला मी आपला वाटेल अशी आशा आहेच..(आंधृड, ता. मेहकर, जि. बुलढाणा)