शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आंधृड ते मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 20:00 IST

कुठं छोट्या गावातली शिक्षणाची पायवाट कुठं मुंबईतला हायवे; पण उडाण भरायची तर प्रवास हवाच..

- ऋतुराज वृक्षराज देशमुखआंधृड माझं गाव. ३००० लोकवस्तीचं खेडं. शेती मुख्य व्यवसाय. गावच्या बालवाडीत गेलो मग तिथून माझ्या गावापेक्षा मोठ्या गावी डोणगाव जानेफळ गावच्या कॉन्व्हेंटमध्ये व नंतर तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमात माझं शिक्षण झालं. सत्यजित शाळेत सीबीएसई पॅटर्नला थोडा स्थिरावून मी दहावी उत्तीर्ण झालो.दहावीनंतर पुढे काय प्रश्न होताच. पुढं इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. गाव, घर, आईबाबांना सोडून गावापासून शंभर किमी दूर अकोला येथे निघालो. तिथं माझं सामान लावून आईबाबा गावाकडे परत निघाले. आईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले. आई पदरानी अश्रू पुसत होती. पहिली ताटातूट झाली. माझी पहिली रात्र सुरू झाली. घराकडील आठवणींनी..दोन वर्षे सरली. बारावीची परीक्षा झाली. टेक्निकल बोर्डाची परीक्षा, जेईईच्या दोन परीक्षा, सीईटी, एईईटी व एनडीए परीक्षेनिमित्त नागपूरपर्यंत प्रवास झाला. निकाल आले, इंजिनिअरिंग, मेडिकल व एनडीएमध्ये पास झालो. मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. मुंबईत व्हीजेआयआटीला प्रवेश घेतला.मुंबईत आल्यानंतर माझा पाऊलवाटेवरचा प्रवास संपल्यासारखं वाटायला लागलं. घर दिसत होतं. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठं असणार माझ्या अंगणातलं निंबाचं झाड, माझ्याच बरोबर वाढलेलं. त्यालाच दादांनी पंचमीला खास बांधून दिलेला झोका, पारिजातकाच्या फुलांचा सुगंध, गणपती, नवरात्रीत फुलं वेचणारी लहान मुलं, अशोकाचं झाड, वडाचं झाड, अंधाऱ्या सकाळी कोकिळेचा कुहू कुहू आवाज, माझी सत्यजित शाळा, स्कूल बसचा प्रवास, जीव लावणाºया नायडू मॅम, माळीसर, अकोल्याचे आकाशसर, खोलीमालक धनोकार काका-काकू सगळे आठवत राहिले.रात्रीला ९ - ९.३० वाजता सामसूम होणारं माझं गावं, रविदादाच्या दुकानासमोरील माणसाच्या रंगलेल्या गप्पा. प्रसन्न सकाळ. इथं मुंबईला कोकीळ नाही. पेरते व्हा म्हणणारे पक्षी नाही की सोनेरी किरणाचा कवडसाही नाही.मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये आम्ही चार मित्र राहतो. चार भागातून चार गावातून आलेलो, एकमेकांचे स्वभाव, राहणीमान काहीच माहीत नव्हते. पण या मित्रांनी जीव लावला, आमचं एक घर झालं सगळ्यांचं मिळून.माझ्या पाऊल वाटेचा प्रवास मेट्रो शहराच्या महामार्गावर आला आहे. माझा ध्येयपूर्तीचा प्रवास एरोनॉटिकलमध्ये रिसर्च करण्याचा आहे. आईबाबा आयएएस होण्याचे स्वप्न पाहतात. पण मला वाटतं एरोनॉटिकलमध्ये संशोधनाची संधी मिळाली तर हा प्रवास कधीच संपणार नाही. सध्या मुंबईत एक थांबा आहे चार वर्षांचा इतकंच.मुंबईतील गगनचुंबी इमारती, लोकलच्या ट्रेन, अजून न पाहिलेला समुद्र, मित्र, इथली धावपळ, संस्कृती, कॉलेजचं जग, कॅन्टीन, मी राहत असलेली सोसायटी हे सारं माझं वाटतंय आता...मुंबईला मी आपला वाटेल अशी आशा आहेच..(आंधृड, ता. मेहकर, जि. बुलढाणा)