शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

आलिया...जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 13:23 IST

जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.

धीस इज लाइफ. माय लाइफ.जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.माझे वडील. तुम्हांला त्यांचं नाव आणि स्वभाव सगळंच माहीत आहे. ते नेहमी सांगतात, द बेस्ट आॅफ नोइंग इज नॉट नोइंग...‘मला माहीत नाही’ असं एकदा मान्य केलं की, माहिती करून घेणं सुरू होतं. हे एक फार सोपं लॉजिक आहे. मी तेच वापरते.माझ्यासाठी आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत : लॉजिक आणि लव्ह!लव्ह म्हणजे स्वत:वरचं प्रेम. सेल्फ लव्ह. माझं प्रेम आहे स्वत:वर. मी जी काही आहे, जशी आहे तसं मी स्वत:ला स्वीकारलं आहे. मनापासून. मी प्रेमानं सांगते स्वत:लाच, इट्स ओके आलिया, इफ यू डोण्ट नो सो मेनी थिंग्ज, इट्स ओके. जे येतं, ते फक्त नीट कर!मला काय येतं?- तर कॅमेºयासमोर उभं राहून ते जे काही कॅरेक्टर आहे, ते मला जगता येतं.माझ्या आयुष्यात अगदी लहानपणीच माझ्याही नकळत हे माझ्यात भिनलं की, बदल हीच एकमेव सतत चालणारी गोष्ट आहे. जग बदलतं. आपण बदलतो. बºयाच गोष्टी असतात, तशा राहत नाहीत. आयुष्य घट्ट मुठीत करकचून आवळून नाही ठेवता येत.यश मिळालं तर ते दोन्ही मुठीत घट्ट धरून ठेवता येतं का? ते यश सांडू नये, हरवू नये, कुणी हिसकावू नये किंवा कायमचं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून किती काळ मूठ आवळणार आपण?- यशाचं अत्तर इटुकल्या जागेतून कधी हवा होईल आपल्या लक्षातही येणार नाही. मग कशाला मूठ आवळा? त्यापेक्षा तळहातावर जे काही जगणं आहे ते जगलेलं, जपलेलं बरं.आज आलियाकडे यश आहे, उद्या असेलच असं नाही. मिळालेलं यश असं कायमचं, सतत आपल्यासोबत राहत नाही, याची मला जाणीव आहे. आज मला यश मिळतंय, उद्या दुसºया कुणाला मिळेल. आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल. आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात. त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट!मग आपण काय करायचं?आपलं मन म्हणतं ते बिनधास्त करायचं!आपलं मन देतंच की इण्ट्युशन!आपलं इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवेल त्या दिशेनं जायचं. जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा. सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले की, त्या निर्णयांतली सगळी गंमत निघून जाते.समोर आलं. आवडलं. करावंसं वाटलं. केलं. मस्त केलं. मजा आली. समाधान वाटलं. संपलं!हवं कशाला प्लॅनिंग ज्यात त्यात?मी हेच करते.माझे वडील नेहमी म्हणतात, यशाची चव चाखली की माणसांचा एक प्रॉब्लेम होतो. त्यांना वाटू लागतं की हे यश कायम राहील. यश कसं मिळवायचं याचा फॉर्म्युलाच सापडला आपल्याला. आणि मग अनेकजण गोष्टी इझी घ्यायला लागतात. त्यांना वाटतं, जमलं आता! पुढे सोपंच असणार सगळं. एकदा जमलं म्हणजे मग यापुढे सतत जमेलच!‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे, हे लक्षात ठेवलेलं बरं...