शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आलिया...जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 13:23 IST

जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.

धीस इज लाइफ. माय लाइफ.जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.माझे वडील. तुम्हांला त्यांचं नाव आणि स्वभाव सगळंच माहीत आहे. ते नेहमी सांगतात, द बेस्ट आॅफ नोइंग इज नॉट नोइंग...‘मला माहीत नाही’ असं एकदा मान्य केलं की, माहिती करून घेणं सुरू होतं. हे एक फार सोपं लॉजिक आहे. मी तेच वापरते.माझ्यासाठी आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत : लॉजिक आणि लव्ह!लव्ह म्हणजे स्वत:वरचं प्रेम. सेल्फ लव्ह. माझं प्रेम आहे स्वत:वर. मी जी काही आहे, जशी आहे तसं मी स्वत:ला स्वीकारलं आहे. मनापासून. मी प्रेमानं सांगते स्वत:लाच, इट्स ओके आलिया, इफ यू डोण्ट नो सो मेनी थिंग्ज, इट्स ओके. जे येतं, ते फक्त नीट कर!मला काय येतं?- तर कॅमेºयासमोर उभं राहून ते जे काही कॅरेक्टर आहे, ते मला जगता येतं.माझ्या आयुष्यात अगदी लहानपणीच माझ्याही नकळत हे माझ्यात भिनलं की, बदल हीच एकमेव सतत चालणारी गोष्ट आहे. जग बदलतं. आपण बदलतो. बºयाच गोष्टी असतात, तशा राहत नाहीत. आयुष्य घट्ट मुठीत करकचून आवळून नाही ठेवता येत.यश मिळालं तर ते दोन्ही मुठीत घट्ट धरून ठेवता येतं का? ते यश सांडू नये, हरवू नये, कुणी हिसकावू नये किंवा कायमचं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून किती काळ मूठ आवळणार आपण?- यशाचं अत्तर इटुकल्या जागेतून कधी हवा होईल आपल्या लक्षातही येणार नाही. मग कशाला मूठ आवळा? त्यापेक्षा तळहातावर जे काही जगणं आहे ते जगलेलं, जपलेलं बरं.आज आलियाकडे यश आहे, उद्या असेलच असं नाही. मिळालेलं यश असं कायमचं, सतत आपल्यासोबत राहत नाही, याची मला जाणीव आहे. आज मला यश मिळतंय, उद्या दुसºया कुणाला मिळेल. आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल. आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात. त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट!मग आपण काय करायचं?आपलं मन म्हणतं ते बिनधास्त करायचं!आपलं मन देतंच की इण्ट्युशन!आपलं इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवेल त्या दिशेनं जायचं. जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा. सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले की, त्या निर्णयांतली सगळी गंमत निघून जाते.समोर आलं. आवडलं. करावंसं वाटलं. केलं. मस्त केलं. मजा आली. समाधान वाटलं. संपलं!हवं कशाला प्लॅनिंग ज्यात त्यात?मी हेच करते.माझे वडील नेहमी म्हणतात, यशाची चव चाखली की माणसांचा एक प्रॉब्लेम होतो. त्यांना वाटू लागतं की हे यश कायम राहील. यश कसं मिळवायचं याचा फॉर्म्युलाच सापडला आपल्याला. आणि मग अनेकजण गोष्टी इझी घ्यायला लागतात. त्यांना वाटतं, जमलं आता! पुढे सोपंच असणार सगळं. एकदा जमलं म्हणजे मग यापुढे सतत जमेलच!‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे, हे लक्षात ठेवलेलं बरं...