शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

आलिया...जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 13:23 IST

जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.

धीस इज लाइफ. माय लाइफ.जे समोर आयुष्य आहे, ते जगावं, प्रामाणिकपणे त्याला सामोरं जावं. हा मी ठरवलेला एक साधासोपा मार्ग आहे. त्यावरून चालत राहणं मला आवडतं.माझे वडील. तुम्हांला त्यांचं नाव आणि स्वभाव सगळंच माहीत आहे. ते नेहमी सांगतात, द बेस्ट आॅफ नोइंग इज नॉट नोइंग...‘मला माहीत नाही’ असं एकदा मान्य केलं की, माहिती करून घेणं सुरू होतं. हे एक फार सोपं लॉजिक आहे. मी तेच वापरते.माझ्यासाठी आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत : लॉजिक आणि लव्ह!लव्ह म्हणजे स्वत:वरचं प्रेम. सेल्फ लव्ह. माझं प्रेम आहे स्वत:वर. मी जी काही आहे, जशी आहे तसं मी स्वत:ला स्वीकारलं आहे. मनापासून. मी प्रेमानं सांगते स्वत:लाच, इट्स ओके आलिया, इफ यू डोण्ट नो सो मेनी थिंग्ज, इट्स ओके. जे येतं, ते फक्त नीट कर!मला काय येतं?- तर कॅमेºयासमोर उभं राहून ते जे काही कॅरेक्टर आहे, ते मला जगता येतं.माझ्या आयुष्यात अगदी लहानपणीच माझ्याही नकळत हे माझ्यात भिनलं की, बदल हीच एकमेव सतत चालणारी गोष्ट आहे. जग बदलतं. आपण बदलतो. बºयाच गोष्टी असतात, तशा राहत नाहीत. आयुष्य घट्ट मुठीत करकचून आवळून नाही ठेवता येत.यश मिळालं तर ते दोन्ही मुठीत घट्ट धरून ठेवता येतं का? ते यश सांडू नये, हरवू नये, कुणी हिसकावू नये किंवा कायमचं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून किती काळ मूठ आवळणार आपण?- यशाचं अत्तर इटुकल्या जागेतून कधी हवा होईल आपल्या लक्षातही येणार नाही. मग कशाला मूठ आवळा? त्यापेक्षा तळहातावर जे काही जगणं आहे ते जगलेलं, जपलेलं बरं.आज आलियाकडे यश आहे, उद्या असेलच असं नाही. मिळालेलं यश असं कायमचं, सतत आपल्यासोबत राहत नाही, याची मला जाणीव आहे. आज मला यश मिळतंय, उद्या दुसºया कुणाला मिळेल. आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल. आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात. त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट!मग आपण काय करायचं?आपलं मन म्हणतं ते बिनधास्त करायचं!आपलं मन देतंच की इण्ट्युशन!आपलं इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवेल त्या दिशेनं जायचं. जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा. सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले की, त्या निर्णयांतली सगळी गंमत निघून जाते.समोर आलं. आवडलं. करावंसं वाटलं. केलं. मस्त केलं. मजा आली. समाधान वाटलं. संपलं!हवं कशाला प्लॅनिंग ज्यात त्यात?मी हेच करते.माझे वडील नेहमी म्हणतात, यशाची चव चाखली की माणसांचा एक प्रॉब्लेम होतो. त्यांना वाटू लागतं की हे यश कायम राहील. यश कसं मिळवायचं याचा फॉर्म्युलाच सापडला आपल्याला. आणि मग अनेकजण गोष्टी इझी घ्यायला लागतात. त्यांना वाटतं, जमलं आता! पुढे सोपंच असणार सगळं. एकदा जमलं म्हणजे मग यापुढे सतत जमेलच!‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे, हे लक्षात ठेवलेलं बरं...