शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

देशभरात दरवर्षी ६० टक्के इंजिनिअर बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:19 IST

इंजिनिअरिंगला स्कोप आहे हा भ्रम आता विसरा. कंपन्या म्हणतात, इंजिनिअर नोकरीस लायकच नाहीत, म्हणून जेमतेम ४० टक्के तरुण इंजिनिअर्सना मिळते नोकरी!

‘कोणी नोकरी देता का नोकरी... चार वर्षं, लाखो रु पये खर्चून, पालकांच्या आग्रहाखातर, मामा-काकांची उदाहरणं बघून, कुठल्याशा नातेवाइकांचे सल्ले घेऊन, मित्रांचं ऐकून, क्वचित प्रसंगी स्वखुशीने आणि बहुतेकदा दुसरं काहीच माहीत नसल्यानं इंजिनिअर झालेल्या तरुणाला कुणी नोकरी देता का नोकरी?- असं आजचं चित्र आहे.इंजिनिअर झालेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली, शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाखाली दबून गेलाय. मनासारखं काम, पगार हे सर्व मिळण्याची अपेक्षा सोडून कसलीही का असेना पण त्याला नोकरी हवी आहे.हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण ते आजचं वास्तव आहे.‘आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ म्हणजेच ‘एआयसीटीई’ (अकउळए) या भारतातील तांत्रिक शिक्षणविषयक सर्व बाबींचे नियोजन, नियमन आणि नियंत्रण करणाºया संस्थेमार्फत प्रसिद्ध झालेली ही गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहा.हे आकडेच वास्तव सांगतात. आणि ते वास्तव फार वाईट आहे.

२०१२ ते २०१६ या चार वर्षांत देशातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी जेमतेम ४० टक्के इतकी आहे. देशभराचा विचार केला असता सरत्या शैक्षणिक वर्षात २९,९८,२३८ एवढ्या प्रचंड संख्येने इंजिनिअरिंगच्या जागा उपलब्ध होत्या. यापैकी १५,०६,९७७ इतक्याच जागा भरल्या गेल्या. म्हणजेच पदविका, पदवी आणि पदव्युत्तर मिळून जवळपास निम्म्या जागा या रिकाम्याच राहिल्या. गेल्या काही वर्षांत रिकाम्या राहणाºया या जागा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु इंजिनिअर झालेल्यांपैकीही जेमतेम ४० टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळाली हे चित्र जास्त भयावह आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती ही अधिक गंभीर आहे, कारण गेल्या वर्षी उपलब्ध ३,४४,८९८ जागांपैकी केवळ १,६१,९३५ इतक्याच म्हणजे निम्म्याहून कमी इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा भरल्या गेल्या. गेल्या चार वर्षांत दर १०० उत्तीर्णांपैकी केवळ सरासरी २५ जणांनाच नोकरी मिळाली आहे. या सगळ्यात ती नोकरी कोणत्या स्वरूपाची आहे? तिचा घेतलेल्या शिक्षणाशी संबंध कितपत आहे? दर्जा काय? त्यानुसार मिळणारा पगार किती? - हे सारे महत्त्वाचे प्रश्न लक्षात घेतलेले नाहीत. त्यांचा विचार केला असता एकूण विषयाची भीषणता अधिक तीव्र होऊ शकते.आपण इंजिनिअरिंग करत असू किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार असू तर ही माहिती आपल्या हाताशी असलेली बरी!

(या आकडेवारीसह देशातील तसेच राज्यातील उत्तीर्ण आणि नोकरीप्राप्त विद्यार्थ्यांची आकडेवारी तसेच देशातील अभियांत्रिकी शिक्षणाविषयीची इतर सर्व माहिती www.aicte-india.org या वेबसाइटवर पाहता येईल.)