शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

इंटरनेट यूजर्सच्या 5 चुकीच्या सवयी

By admin | Updated: November 27, 2015 21:23 IST

आपण इंटरनेट वापरून ऑनलाइन ‘उद्योग’ करतो, पण त्यातून आपण कसे नि किती चुकीचं वागतो,

आपण इंटरनेट वापरून ऑनलाइन ‘उद्योग’ करतो,
पण त्यातून आपण कसे नि किती चुकीचं वागतो,
हे आपल्या लक्षात येतंय का?
 
तंत्र तर आपल्या हातात आलं पण ते वापरण्याचं ‘ज्ञान’ आलंय का?
आणि जर ते नसेल तर मग आपल्या हातातलं तंत्रच आपल्या मानगुटीवर बसण्याची शक्यता वाढेल, हे सांगायला कुडमुडय़ा ज्योतिष्याचीही गरज नाही!
सध्या झालंय तसंच आणि त्या आपल्या तंत्रअज्ञानतेवर शिक्कामोर्तब केलंय एका अलीकडच्या सव्र्हेनं!
इंटरनेट यूजर्सच्या घाणोरडय़ा, चुकीच्या सवयी अर्थात ‘वस्र्ट इंटरनेट हॅबिट्स’ असा एक सव्र्हे देशभरात अलीकडेच झाला.
‘टेलेनॉर इंडिया’च्या वतीनं हा सव्र्हे केला, त्यात इंटरनेट यूजर्सना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात अॅडिक्शन किती, ते खरंच आहे का, याचाही शोध होताच. नेट वापरताना काय आवडतं, काय आवडत नाही, या प्रश्नांच्या रांगेत बाकी बरेच प्रश्न होते. अर्थात अनेकजणांनी सांगितलं की, इंटरनेट आपल्या आयुष्यात आल्यानं आपल्या जगण्याच्या दर्जात चांगला बदल झाला, आपल्या जगण्याचा स्तर उंचावला, आपण जास्त कनेक्टेड झालो.
पण तरीही या सव्र्हेत सापडल्या काही इंटरनेट यूजर्सच्या वस्र्ट हॅबिट्स!
त्यातल्या पहिल्या 5 चुकीच्या सवयींची ही एक यादी.
कितीही नाही म्हटलं तरी यापैकी एक किंवा खरं तर त्याहूनही अधिक सवयी आपल्याही असतातच. आहेतच!
जरा ताडून पाहू, इतकंच!
 
1) खोटय़ा-नाटय़ा माहितीचे फॉरवर्डस
ही सगळ्यात वाईट खोड. जे येईल ते खातरजमा न करता, क्रॉसचेक न करता, न वाचताही अनेकदा फॉरवर्ड ठोकले जातात. आपण जी माहिती पसरवतो ती खरी आहे का? ती वाचून त्याचे इतरांवर काय परिणाम होतील? त्यामुळे धार्मिक-जातीय भावना भडकतील का? त्यातून गैरसमज पक्के होतील का? मुळात माहितीच एकांगी आणि चुकीची आहे का, हे सारे प्रश्न स्वत:ला न विचारता फॉरवर्ड ठोकणं ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात घातक आणि चुकीची सवय आहे.
 
2) गेम खेळण्याची आमंत्रणं
आपल्याला आवडत असतील गेम खेळायला; पण म्हणून सतत इतरांना या ना त्या गेम्सचे ऑनलाइन इन्व्हिटेशन्स पाठवणं, अगदी आपल्या बॉसपासून ते सन्माननीय लोकांनाही, ही अत्यंत गचाळ सवय आहे. आणि आपण चुकून असली आमंत्रणं पाठवतोय, हे अनेकांना लक्षातही येत नाही.
3)वाट्टेल ते शेअर
अनेकजण काय वाट्टेल ते शेअर करतात. ते वाचून आपल्याविषयी लोकांचं काय मत होईल, याचा विचारही न करता अनेकजण सोशल साइट्सवर काय वाट्टेल ते म्हणजे त्यात अश्लील गोष्टीही आल्या, शेअर करत सुटतात.
4) सहानुभूतीच्या पोस्ट
आज काय, बरं नाही, आज काय, पाणीच नाही आलं इथपासून ते अनेक सेण्टी पोस्ट शेअर करण्याचा आणि त्यातून सतत सहानुभूती मिळवण्याचा एक चाळाच काहीजणांना असतो. सतत सिम्पथी सिकिंग. सतत रडायचं. सतत प्रेमभंगी मूड! 
हे लोक सतत अशाच पोस्ट शेअर करतात आणि मग त्यातून गोतावळा जमवतात.
 
5) हल्लेखोर काहीजण तर इंटरनेट हल्लेखोर झालेत. जरा आपल्या मनाविरुद्ध, विचारसरणीविरुद्ध पोस्ट दिसली की, याचं ट्रोलिंग सुरू, लगेच भडकतात, शिवीगाळ करतात, नको नको ते बोलतात, ही हल्लेखोरी अत्यंत भयाण आहे.
 
- निशांत महाजन