शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

यू मुंबाचा धडाकेबाज विजय

By admin | Updated: February 24, 2016 03:48 IST

स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवून बंगाल वॉरियर्सला ३०-१७ असे लोळवले. तर, यानंतर झालेल्या अत्यंत एकतर्फी लढतीत पटना

- रोहित नाईक,  जयपूरस्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवून बंगाल वॉरियर्सला ३०-१७ असे लोळवले. तर, यानंतर झालेल्या अत्यंत एकतर्फी लढतीत पटना पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सचा ४७-२४ असा फडशा पाडला.सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईकरांनी भक्कम बचावाला वेगवान आक्रमणाची साथ देताना बंगाल वॉरियर्सच्या आव्हानातली हवा काढली. कर्णधार अनूप कुमारने सामन्यातील पहिल्याच चढाईत खाते उघडल्यानंतर मुंबईकरांनी तुफान खेळ करून आठव्याच मिनिटाला बंगलावर पहिला लोण चढवला. यू मुंबाच्या धडाक्यापुढे बंगालचा कोणताही खेळाडू चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे कर्णधार नीलेश शिंदेच्याही चढाया अपयशी ठरला. मध्यंतराला मुंबईने १७-६ अशा १५ गुणांच्या एकतर्फी आघाडीने वर्चस्व राखले.यानंतरही मुंबईचा धडाका कमी झाला नाही. रिशांक देवाडिगा व अनूपच्या खोलवर चढाया आणि फझेल अत्राचली व विशाल माने यांच्या मजबूत पकडींच्या जोरावर यू मुंबाने २६व्या मिनिटाला बंगालवर दुसरा लोण चढवून २१-९ अशा १२ गुणांच्या मोठ्या आघाडीसह सामन्याचे चित्र स्पष्ट केले. अत्राचलीच्या पकडीपुढे बंगालचा प्रत्येक चढाईपटू दबावाखाली खेळताना दिसला. एक वेळ बंगालने बचावात्मक पवित्रा घेऊन मुंबईकरांना तिसऱ्या चढाईत पकडण्याची रणनीती आखली. मात्र, मुंबईच्या मोठ्या आघाडीमुळे त्यांची योजना अपयशी ठरली. मुंबईवर लोण चढवण्याची संधीही बंगालने साधली होती; मात्र मुंबईच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. अखेरीस मुंबईकरांनी शानदार विजयावर शिक्का मारला. बंगालकडून जँग कून लीचा अष्टपैलू खेळ आणि नीलेशच्या पकडी चमकदार ठरल्या. मुंबईकडून चढाईत पुन्हा एकदा रिशांकने निर्णायक खेळ करताना ६, तर अनूपने ५ गुण मिळविले. बचावात फझेल व विशाल यांनी अनुक्रमे ६ व ३ गुण वसूल केले.यानंतर पटना पायरेट्सने यजमान जयपूर पिंक पँथर्सला ४७-२४ असे लोळवले. घरच्या मैदानावरील शेवटचा सामनाही हरल्याने जयपूरच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. तुफानी हल्ला चढवताना पटनाने सुरुवातीला १०-० अशी जबरदस्त आघाडी घेतली. यजमानांना पहिल्या गुणासाठी ७व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली. मध्यंतराला २७-५ असा दबदबा राखलेल्या पटनाने जयपूरवर तब्बल ४ लोण चढवले. तर, जयपूरने पटनावर एक लोण चढवला; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पटनाला अर्धशतकापासून रोखल्याचे एकमेव समाधान जयपूरला मिळाले.बंगालविरुद्धच्या विजयात संघातील प्रत्येकाने सर्वोत्तम खेळ केला. यापुढेही विजयी मालिका कायम राखण्याचा निर्धार आहे. आमचे संरक्षण निर्णायक ठरले आणि याचे श्रेय फझेल अत्राचलीला द्यावे लागेल. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला.- अनूप कुमार, कर्णधार, यू मुंबा