शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याकडे अजूनही सोयीसुविधांची कमतरता

By admin | Updated: August 26, 2016 03:42 IST

आपल्या देशात टेबल टेनिससाठी सोयीसुधांची अजूनही कमी आहे.

रोहित नाईक,

मुंबई- आपल्या देशात टेबल टेनिससाठी सोयीसुधांची अजूनही कमी आहे. खेळाडूंना अनेकदा चांगल्या सोयींसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे जावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. संघटनेलाही एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आणि अश्या समस्यांना सामोरे जात आपले खेळाडू आॅलिम्पिकपर्यंत धडक मारतात, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी दिग्गज टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांनी ‘लोकमत’कडे दिली.रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय टेटे खेळाडूंच्या कामगिरीविषयी मेहता म्हणाले, ‘‘भारतीयांची कामगिरी नक्कीच निराशाजनक झाली. याची कल्पना खेळाडूंनाही आहे. विशेष म्हणजे सौम्यजीत घोषकडून अपेक्षा होत्या. त्याचा ड्रॉदेखील इतरांच्या तुलनेत थोडा चांगला होता. परंतु, तो दबावाखाली आला. एकूणंच भारतीयांकडून याहून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, कारण याआधीच्या स्पर्धांत त्यांनी चमकदार कामगिरी केली होती.’’टटेमध्ये भारताची सर्व मदार अनुभवी शरथ कमलवर होती. जर्मनीत वास्तव्यास असलेल्या कमलबाबत मेहता यांनी सांगितले की, ‘‘कमलकडून नक्कीच खूप अपेक्षा होता. तो जरी सुरुवातीलाच पराभूत झाला असला, तरी त्यादिवशी त्याचा खेळ उत्कृष्ट झाला होता. त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचे अधिक कौतुक करावे लागेल. कारण, कमलचा प्रतिस्पर्धी शानदार खेळला. तो दिवस कमलचा नव्हता.’’त्याचप्रमाणे, पराभवाने खचून जाऊ नका असा संदेश नवोदितांना देताना मेहना यांनी सांगितले की, ‘‘यंदा आॅलिम्पिकमध्ये मनिका बत्रासारखे अनेक युवा खेळाडू सहभागी झाले होते. भलेही त्यांना अपयश आले असेल, पण पुढे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांना खेळायचे आहेत. त्यामुळे यासाठी आता त्यांनी तयारी करावी. भारतात पुरुष व मुले अनेकदा टेटे स्पर्धांसाठी विदेशात जात असतात. मुलींच्या बाबतीत हे प्रमाण कमी आहे आणि सध्या हे चित्र हळूहळू बदलत आहे. शिवाय संघटनेकडूनही मिळणाऱ्या मदतीचा फायदा घेत महिला व मुलींनी चमकदार कामगिरी करावी.’’त्याचप्रमाणे, ‘‘सोयीसुविधांमध्ये वाढ, कॉर्पोरेट जगताकडून आर्थिक पाठबळ आणि सरकारकडून मदत मिळाल्यास टेटे खेळ अधिक बहरु शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येणे आवश्यक आहे,’’ असेही मेहता यांनी यावेळी सांगितले.>सगळे म्हणतात आपण आॅलिम्पिकमध्ये खूप मागे आहोत. मी मान्यही करतो. पण हे चित्र बदलत असून साक्षी, सिंधूसारख्या खेळाडूंनी याची सुरुवात केली आहे. अशा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पण आपण केवळ आपल्या कमजोरीकडे बोट दाखवत राहिलो, तर कधीच पुढे जाणार नाही. यासाठी सर्वप्रथम स्वत:पासून बदल केला पाहिजे. त्याशिवाय हे चित्र बदलणार नाही.- कमलेश मेहता