शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चेकवर खेळाडूंची चुकीची नावे, नरिंदर बत्रा यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:31 IST

भारतीय आॅलिम्पिक महासंघावर (आयओए) रविवारी आयोजित एका कार्यक्रमात लाजिरवाणे होण्याची वेळ आली. कारण रोख पुरस्कार रकमेसाठी आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चेकवर नाव चुकीचे लिहिण्यात आले.

नवी दिल्ली - भारतीय आॅलिम्पिक महासंघावर (आयओए) रविवारी आयोजित एका कार्यक्रमात लाजिरवाणे होण्याची वेळ आली. कारण रोख पुरस्कार रकमेसाठी आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चेकवर नाव चुकीचे लिहिण्यात आले. एवढेच नाही तर एका खेळाडूच्या नावाचा समावेशही नव्हता.त्यात जवळजवळ १५ खेळाडूंचा समावेश होता. त्यात कम्पाऊंड तिरंदाज ज्योती सुरेखा वेनाम आणि अभिषेक वर्मा यांना केवळ पुष्पगुच्छ देण्यात आले. कारण त्यांचे नाव चेकवर चुकीचे लिहिण्यात आले होते. आयओएने सांघिक स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे पुरस्कार दिले. वैयक्तिक पदक विजेत्यांना पाच लाख, तीन लाख आणि दोन लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात आले.आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले,‘मी झालेल्या चुकीसाठी माफी मागतो. जवळजवळ १४-१५ खेळाडूंचे नाव चुकीचे छापल्या गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना केवळ पुष्पगुच्छ देत आहोत. चिंता करू नका, तुम्हाला रोख पुरस्कार मिळतील. चुकीचे नाव असलेले चेक त्यांना देणार नाही.’ आणखी एक लाजिरवाणी बाब म्हणजे आयोजक कांस्यपदपक विजेती मल्ल दिव्या काकरानच्या नावाचा उल्लेख करण्याचे विसरले.ज्यावेळी काकरानच्या आई-वडिलांनी कार्यक्रमानंतर बत्रा यांना याबाबत विचारणा केली तेव्हा अध्यक्षांनी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना दिव्याच्या पुरस्कराची घोषणा करण्यासाठी आमंत्रित केले, पण ते कार्यक्रम स्थळावरून रवाना झाले होते. काकरानची आई म्हणाली,‘ते सांगत आहेत की तिचे नाव यादीत नाही, पण आम्ही तिचे नाव दिले होते. काय होत आहे, याची मला कल्पना नाही.’आयओएचे महासचिव राजीव मेहता म्हणाले,‘कुठलीही बाब प्रथमच घडते. खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे आम्ही त्यांना रोख पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आम्ही भविष्यातही आॅलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्यांना रोख पुरस्कार देण्याची परंपरा कायम राखू. ही रक्कम आम्हाला आमचे प्रायोजक देतील.’अनेक खेळाडूंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यात सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोपडा, टेनिसपटू रोहन बोपन्ना व दिवीज शरण, मल्ल बजरंग पूनिया व विनेश फोगाट यांच्याव्यतिरिक्त बॅडमिंटनपटू पदकविजेत्या पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांचा समावेश आहे.भारताने आशियाई स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना ६९ पदके पटकावली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :newsबातम्या