शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
6
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
7
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
10
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
11
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
12
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
13
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
14
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
15
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
16
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
17
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
18
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
19
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
20
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

चेकवर खेळाडूंची चुकीची नावे, नरिंदर बत्रा यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:31 IST

भारतीय आॅलिम्पिक महासंघावर (आयओए) रविवारी आयोजित एका कार्यक्रमात लाजिरवाणे होण्याची वेळ आली. कारण रोख पुरस्कार रकमेसाठी आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चेकवर नाव चुकीचे लिहिण्यात आले.

नवी दिल्ली - भारतीय आॅलिम्पिक महासंघावर (आयओए) रविवारी आयोजित एका कार्यक्रमात लाजिरवाणे होण्याची वेळ आली. कारण रोख पुरस्कार रकमेसाठी आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चेकवर नाव चुकीचे लिहिण्यात आले. एवढेच नाही तर एका खेळाडूच्या नावाचा समावेशही नव्हता.त्यात जवळजवळ १५ खेळाडूंचा समावेश होता. त्यात कम्पाऊंड तिरंदाज ज्योती सुरेखा वेनाम आणि अभिषेक वर्मा यांना केवळ पुष्पगुच्छ देण्यात आले. कारण त्यांचे नाव चेकवर चुकीचे लिहिण्यात आले होते. आयओएने सांघिक स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे पुरस्कार दिले. वैयक्तिक पदक विजेत्यांना पाच लाख, तीन लाख आणि दोन लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात आले.आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले,‘मी झालेल्या चुकीसाठी माफी मागतो. जवळजवळ १४-१५ खेळाडूंचे नाव चुकीचे छापल्या गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना केवळ पुष्पगुच्छ देत आहोत. चिंता करू नका, तुम्हाला रोख पुरस्कार मिळतील. चुकीचे नाव असलेले चेक त्यांना देणार नाही.’ आणखी एक लाजिरवाणी बाब म्हणजे आयोजक कांस्यपदपक विजेती मल्ल दिव्या काकरानच्या नावाचा उल्लेख करण्याचे विसरले.ज्यावेळी काकरानच्या आई-वडिलांनी कार्यक्रमानंतर बत्रा यांना याबाबत विचारणा केली तेव्हा अध्यक्षांनी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना दिव्याच्या पुरस्कराची घोषणा करण्यासाठी आमंत्रित केले, पण ते कार्यक्रम स्थळावरून रवाना झाले होते. काकरानची आई म्हणाली,‘ते सांगत आहेत की तिचे नाव यादीत नाही, पण आम्ही तिचे नाव दिले होते. काय होत आहे, याची मला कल्पना नाही.’आयओएचे महासचिव राजीव मेहता म्हणाले,‘कुठलीही बाब प्रथमच घडते. खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे आम्ही त्यांना रोख पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आम्ही भविष्यातही आॅलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्यांना रोख पुरस्कार देण्याची परंपरा कायम राखू. ही रक्कम आम्हाला आमचे प्रायोजक देतील.’अनेक खेळाडूंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यात सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोपडा, टेनिसपटू रोहन बोपन्ना व दिवीज शरण, मल्ल बजरंग पूनिया व विनेश फोगाट यांच्याव्यतिरिक्त बॅडमिंटनपटू पदकविजेत्या पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांचा समावेश आहे.भारताने आशियाई स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना ६९ पदके पटकावली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :newsबातम्या