शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या महिला संघाला सांघिक जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 10:37 IST

पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला.

मुंबई : पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाच्या प्रथम क्रमांकावर २४४.७३ गुण मिळवून आपले नाव नोंदवले आहे.  ४४.४५ गुण मिळवून सिंगापूरने आणि ३०.२२ गुण मिळवून मलेशियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये जवळपास १५० हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण स्पर्धा बघण्यासाठी  भारतभरातील विविध राज्यांमधून आजी-माजी मल्लखांब पटूंनी हजेरी लावली होती. विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने आणि भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने संपन्न झालेल्या  मुंबई मधील श्री. समर्थ व्यायाम मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये जगभरातून इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिऐतनाम, जपान, इंग्लंड, भारत, नॉर्वे, बहारीन, फ्रान्स, इटली, स्पेन, झेक रिपब्लिक, अमेरिका, जर्मनी  अशा १५ देशांनी सहभाग घेतला आहे. विविध देशातून आलेल्या स्पर्धकांचे दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावरचे सादरीकरण बघण्यासाठी साधारण तीन-चार हजार प्रेक्षक उपस्थित होते. सांघिक विजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघामध्ये सहा खेळाडू असणे आवश्यक होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी प्रत्येक खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान आणि दोन मोठे असे चार संच करणे अनिवार्य होते.  महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम सर्वोत्तम दहा खेळाडूंमध्ये वैयक्तिक अजिंक्यपदासाठी स्पर्धा क्रमांक दोनमध्ये सुरस रंगली. तर स्पर्धा क्रमांक तीनचे विजेतेपद साधनांवर केल्या जाणाऱ्या लहान आणि मोठ्या संचांमधील सर्वोत्तम कामगिरी साठी देण्यात आले.

महाराष्ट्राची संस्कृती जपणारा मल्लखांब महाराष्ट्रातील अनेक जिल्यांमध्ये मोठ्या कुशलतेने खेळला जातो. या स्पर्धेच्या निमित्ताने साताऱ्यामधील कारी मल्लखांब संघ, विले-पार्ले मधील पार्लेश्वर व्यायामशाळा यांनी मल्लखांबाचे सादरीकरण केले. ओरिसा मधून आलेल्या श्रीलताने केलेल्या पुरलेल्या मल्लखांबावरच्या सादरीकरणाने  भारतामध्ये विस्तरलेल्या मल्लखांबाचे प्राबल्य दिसून आले. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने महिला विभागात द्वितीय आलेल्या इटलीच्या डेलिया सेरुटीने दोरी मल्लखांबावर तर जपानच्या कोइको टाकेमोटोने पुरलेल्या मल्लखांबावर आपले संच सादर केले. पुरुष विभागातून दीपक शिंदे आणि सागर ओहळकर यांनी दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावर आपले कौशल्य सादर केले. नुकतंच जीवन गौरव पुरस्कराने सन्मानित केलेल्या श्री. उद्य देशपांडे यांच्या जर्मनी मधील मल्लखांब खेळाडूंनी संगीताच्या चालीवर आपले मनोरे सादर केले. श्री समर्थ व्यायाम मंदिरात प्रशिक्षण घेणाऱ्या दोन योगासन पट्टुनी योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक केले.

मल्लखांबामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कर मिळवलेल्या आदित्य अहिरे ( सातारा), यशवंत साटम( मुंबई उपनगर), राजेश राव( मुंबई उपनगर), रवींद्र पेठे(पुणे), महेंद्र चेंबूरकर(मुंबई उपनगर), शांताराम जोशी(रत्नागिरी), नंदा शिंदे(मुंबई शहर ), चित्रा खवळे( मुंबई शहर), पंकज शिंदे( पुणे), सत्यजित शिंदे ( पुणे), विक्रांत दाभाडे ( सातारा) , कल्पेश जाधव( मुंबई उपनगर), प्रदीप चेंबूरकर( मुंबई उपनगर ) या तेरा खेळाडूंकडून स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.  

टॅग्स :Mumbaiमुंबई