शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

World Cup - सलामीच्या लढतीत भारताकडून इंग्लंडचा 35 धावांनी पराभव

By admin | Updated: June 24, 2017 22:35 IST

आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला आहे

ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 24 - आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडचा पराभव करत भारताने आपण प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. भारतीय संघातील सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने अत्यंत सहजपणे हा सामना जिंकत इंग्लंडला पराभवाची धूळ चाखली. 
 
भारताने प्रथम फलंदाजी करत फक्त तीन विकेट्स गमावत एकूण 281 धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने ताबडतोब फलंदाजी करत फक्त 72 चेंडूत 90 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी पूनम राऊतसोबत स्मृतीने 144 धावांची भागिदारी केली. पूनम राऊतने 134 चेंडूत 86 धावा केल्या. कर्णधार मिताली राजनेही उत्कृष्ट फलंदाजी केली. ती 71 धावांवर नाबाद राहिली. मिताली राजने एकदिवसीय सामन्यातील सलग सातवं अर्धशतक केलं. 
 
281 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला 246 भारतीय संघाने 246 धावांत गारद केलं. भारताने 35 धावांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात भारताने इंग्लंडविरोधात मिळवलेला हा पहिला विजय आहे. याआधी झालेले सहा सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडचे खेळाडू मोठी भागिदारी करण्यात अपयशी ठरले. फ्रॅन विल्सन वगळता एकही खेळाडू जास्त वेळ टिकू शकली नाही. विल्सनने 102 चेंडूत 81 धावा केल्या. तिचा रन आऊट सामन्यातील टर्निग पॉईंट ठरला. ऑफ स्पिनर दिप्ती शर्माने 47 धावांच्या बदल्यात तीन विकेट्स घेतल्या. 
 

भारताला अद्याप विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. यावेळी पात्रता फेरीचा अडथळा पार करीत आठ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले असते, तर विश्वकप २०१७साठी त्यांना थेट पात्रता मिळवता आली असती, पण आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सामना न खेळल्यामुळे भारताला सहा गुणांचे नुकसान सोसावे लागले. भारत गुणतालिकेत १९ अंकासह पाचव्या स्थानी होता. त्यामुळे भारतीय संघाला श्रीलंकेमध्ये पात्रता फेरी खेळावी लागली. भारताने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. रंगतदार अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवला होता.

मिताली राजच्या रूपाने भारताकडे सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. अलीकडेच १०० वन-डे सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारी ती जगातील तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिने सलग सहा सामन्यांत अर्धशतक झळकावले. मिताली कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात मितालीने ८५ धावांची खेळी केली होती. भारताने या लढतीत १०९ धावांनी विजय मिळवला होता.