शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

World Cup - सलामीच्या लढतीत भारताकडून इंग्लंडचा 35 धावांनी पराभव

By admin | Updated: June 24, 2017 22:35 IST

आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला आहे

ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 24 - आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडचा पराभव करत भारताने आपण प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. भारतीय संघातील सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने अत्यंत सहजपणे हा सामना जिंकत इंग्लंडला पराभवाची धूळ चाखली. 
 
भारताने प्रथम फलंदाजी करत फक्त तीन विकेट्स गमावत एकूण 281 धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने ताबडतोब फलंदाजी करत फक्त 72 चेंडूत 90 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी पूनम राऊतसोबत स्मृतीने 144 धावांची भागिदारी केली. पूनम राऊतने 134 चेंडूत 86 धावा केल्या. कर्णधार मिताली राजनेही उत्कृष्ट फलंदाजी केली. ती 71 धावांवर नाबाद राहिली. मिताली राजने एकदिवसीय सामन्यातील सलग सातवं अर्धशतक केलं. 
 
281 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला 246 भारतीय संघाने 246 धावांत गारद केलं. भारताने 35 धावांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात भारताने इंग्लंडविरोधात मिळवलेला हा पहिला विजय आहे. याआधी झालेले सहा सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडचे खेळाडू मोठी भागिदारी करण्यात अपयशी ठरले. फ्रॅन विल्सन वगळता एकही खेळाडू जास्त वेळ टिकू शकली नाही. विल्सनने 102 चेंडूत 81 धावा केल्या. तिचा रन आऊट सामन्यातील टर्निग पॉईंट ठरला. ऑफ स्पिनर दिप्ती शर्माने 47 धावांच्या बदल्यात तीन विकेट्स घेतल्या. 
 

भारताला अद्याप विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. यावेळी पात्रता फेरीचा अडथळा पार करीत आठ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले असते, तर विश्वकप २०१७साठी त्यांना थेट पात्रता मिळवता आली असती, पण आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सामना न खेळल्यामुळे भारताला सहा गुणांचे नुकसान सोसावे लागले. भारत गुणतालिकेत १९ अंकासह पाचव्या स्थानी होता. त्यामुळे भारतीय संघाला श्रीलंकेमध्ये पात्रता फेरी खेळावी लागली. भारताने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. रंगतदार अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवला होता.

मिताली राजच्या रूपाने भारताकडे सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. अलीकडेच १०० वन-डे सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारी ती जगातील तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिने सलग सहा सामन्यांत अर्धशतक झळकावले. मिताली कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात मितालीने ८५ धावांची खेळी केली होती. भारताने या लढतीत १०९ धावांनी विजय मिळवला होता.