शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Avinash Sable, World Athletics Championships 2022 : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेची अंतिम फेरीत एन्ट्री, अखेरच्या २०० मीटरमध्ये लावला जोर अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 06:46 IST

World Athletics Championships 2022 : Avinash Sable qualify for the final पहिल्या दिवसात अविनाश साबळे याने पदकाची आशा पल्लवीत केली. 3000 Metres Steeplechase Men स्पर्धेच्या अंतिम फेरीत अविनाशने आपले स्थान पक्के केले. 

World Athletics Championships 2022 : भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने ( Anju Bobby George ) पॅरीस येथे २००३साली पार पडलेल्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आणि त्याआधी भारताच्या एकाही खेळाडूला World Athletics Championships स्पर्धेत पदक पटकावता आलेले नव्हते. यंदा हा दुष्काळ संपेल अशी आशा आहे आणि सर्वांचे लक्ष टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राकडे ( Neeraj Chopra) आहे. पण, आजच्या पहिल्या दिवसात महाराष्ट्राचा सुपूत्र अविनाश साबळे ( Avinash Sable) याने पदकाची आशा पल्लवीत केली. 3000 Metres Steeplechase Men ( ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत) स्पर्धेच्या अंतिम फेरीत अविनाशने आपले स्थान पक्के केले.

२० किमी चालण्याच्या शर्यतीत भारताच्या खेळाडूंना अपयश आले. महिलांच्या शर्यतीत प्रियांकाला १:३९:४२ या वेळेसह ३४व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर पुरुष गटात  संदीप कुमार १:३१:५८ या वेळेसह ४०वा आला. १२ वर्षांच्या कारकीर्दित संदीपची ही सर्वात संथ वेळ ठरली. त्यानंतर ३००० मीटर स्टीपलचेस ( अडथळ्यांच्या शर्यतीत) स्पर्धेत अविनाशने कमाल केली. HEAT 3 मध्ये सहभागी असलेल्या अविनाशने १५०० मीटरपर्यंत अव्वल स्थान कायम राखले होते, परंतु त्यानंतर तो अचानक ६ व्या क्रमांकावर गेला. पण, शेवटच्या २०० मीटरमध्ये त्याने जोर लावला आणि अव्वल तीन स्पर्धकांमध्ये स्थान पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला. अविनाशने ८ मिनिटे १८.४४ सेंकदाची वेळ नोंदवली.

अविनाशचा प्रवास...महाराष्ट्राचा अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील.... टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर अविनाश घरी परतला असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. पण, त्यातून सावरत पुन्हा मेहनत करत तो मैदानावर परतला.  जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाश इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अविनाश सहभागी होणार आहे. २०२२मध्ये Rabat Diamond League मध्ये ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यातीत ८:१२.४८ सेकंदाची वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम केला. त्याने ९ वेळा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. मार्च २०२२मध्ये त्याने इंडियन ग्रँड प्रिक्स २ मध्ये ८:१६.२१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.  

१३ सप्टेंबर १९९४ मध्ये अविनाशचा जन्म... वयाच्या सहाव्या वर्षापासून घर ते शाळा असा त्याचा रोजचा ६ किलोमीटरचा पायी प्रवास सुरू झाला. मग तो कधीकधी धावत हे अंतर पार करायचा तर कधी चालत... १२वीनंतर त्याने भारतीय सैन्यात  5 Mahar regiment मध्ये दाखल झाला. २०१३-१४ मध्ये सियाचिन येथे त्याची पोस्टींग झाली, तर २०१५मध्ये राजस्थान व सिक्कीम येथे त्याची पोस्टींग झाली होती. २०१५मध्ये त्याने आंतर-सैन्य क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला. पण, ट्रेनर अमरिष कुमार यांनी त्याला स्टीपलचेल ( अडथळ्यांच्या शर्यतीत) सहभाग घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याने ३ महिन्यांत २० किलो वजन घटवले.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBeedबीड