शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘विश्व तिरंदाजीने एएआयचे निलंबन हटवावे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 04:48 IST

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांचे आवाहन

नवी दिल्ली : देशातील तिरंदाजांना टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करता यावी यासाठी विश्व तिरंदाजी संघटनेने भारतीय तिरंदाजी संघटनेवरील (एएआय) निलंबन हटवावे, अशी विनंती सोमवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली.विश्व तिरंदाजी प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात बत्रा म्हणाले की, ‘विश्व संघटनेच्या पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली एएआयने योग्य आणि पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या आहेत. त्यामुळे भारताला २०२० ऑलिम्पिकची तयारी सुरू करता यावी यासाठी त्यांच्यावरील निलंबन हटवायला हवे.’केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा शनिवारी तीन पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बीवीपी राव यांचा ३४-१८ असा पराभव केला. एएआयचे माजी अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांच्या पाठिंब्यामुळे मुंडा यांच्या पूर्ण पॅनलने बाजी मारली. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल. निवडणूक दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. विश्व तिरंदाजी आशिया विभागाचे उपाध्यक्ष चापोल आता त्यांचा अहवाल सादर करतील व त्या आधारावर विश्व संघटना सशर्त निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेईल.आॅलिम्पिकसाठी भारताने पुरुष गटात आधीच संघाचा कोटा व महिला गटात एक वैयक्तिक कोटा मिळवला आहे. त्याआधी मुंडा व राव यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांनी गेल्या वर्षी जूनमध्ये नवी दिल्ली व चंदीगड येथे वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या होत्या. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत