शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

‘विश्व तिरंदाजीने एएआयचे निलंबन हटवावे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 04:48 IST

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांचे आवाहन

नवी दिल्ली : देशातील तिरंदाजांना टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करता यावी यासाठी विश्व तिरंदाजी संघटनेने भारतीय तिरंदाजी संघटनेवरील (एएआय) निलंबन हटवावे, अशी विनंती सोमवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली.विश्व तिरंदाजी प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात बत्रा म्हणाले की, ‘विश्व संघटनेच्या पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली एएआयने योग्य आणि पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या आहेत. त्यामुळे भारताला २०२० ऑलिम्पिकची तयारी सुरू करता यावी यासाठी त्यांच्यावरील निलंबन हटवायला हवे.’केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा शनिवारी तीन पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बीवीपी राव यांचा ३४-१८ असा पराभव केला. एएआयचे माजी अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांच्या पाठिंब्यामुळे मुंडा यांच्या पूर्ण पॅनलने बाजी मारली. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल. निवडणूक दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. विश्व तिरंदाजी आशिया विभागाचे उपाध्यक्ष चापोल आता त्यांचा अहवाल सादर करतील व त्या आधारावर विश्व संघटना सशर्त निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेईल.आॅलिम्पिकसाठी भारताने पुरुष गटात आधीच संघाचा कोटा व महिला गटात एक वैयक्तिक कोटा मिळवला आहे. त्याआधी मुंडा व राव यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांनी गेल्या वर्षी जूनमध्ये नवी दिल्ली व चंदीगड येथे वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या होत्या. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत