शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

महिला बॉक्सिंगमध्ये खूप सुधारणा झाली, पण खेळाडूंचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:59 IST

‘महिला बॉक्सिंगमध्ये आज खूप सुधारणा झाली आहे, पण खेळाडूंचे काय? त्यांच्या कामगिरीमध्ये कधी सुधारणा होणार,’ असा प्रश्न सहा वेळची जागतिक विजेती बॉक्सर मेरीकोम हिने उपस्थित केला.

मुंबई : ‘महिला बॉक्सिंगमध्ये आज खूप सुधारणा झाली आहे, पण खेळाडूंचे काय? त्यांच्या कामगिरीमध्ये कधी सुधारणा होणार,’ असा प्रश्न सहा वेळची जागतिक विजेती बॉक्सर मेरीकोम हिने उपस्थित केला. इंडियन फेडरेशन आॅफ स्पोर्ट गेमिंगच्या (आयएफएसजी) वतीने भारताच्या विविध युवा खेळाडूंना ‘स्टार्स आॅफ टुमॉरो’ (एसओटू) या उपक्रमांतर्गत मेरीकोमच्या हस्ते गौरविण्यात आले.बुधवारी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मेरीकोमने म्हटले की, ‘आज खेळामध्ये सोईसुविधांच्या बाबतीत मोठी सुधारणा झाली आहे. मात्र, त्या तुलनेत खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. खेळाडूंसाठी चांगले साहित्य उपलब्ध असून खेळाडूंना मोठा पाठिंबाही मिळत आहे, परंतु तरीही कामगिरीत सुधारणा झालेली पाहण्यास मिळत नाही. खेळाडूंनी खेळताना विचारात्मक खेळ करावा. त्यांनी मानसिकरीत्या अधिक सक्षम होणे गरजेचे आहे, पण या गोष्टी त्यांच्यामध्ये पाहण्यास मिळत नाही. अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मोठा अनुभव असूनही, त्यांच्या खेळाचा स्तर मात्र म्हणावा तसा उंचावलेला नाही.’मेरीकोम पुढे म्हणाली की, ‘मी जेव्हा जागतिक स्पर्धेत पहिले दोन सुवर्ण पदक जिंकले, तेव्हाही अनेकांना माझ्या बाबतीत किंवा माझ्या कामगिरीची माहिती नव्हती. कोणतीही मदत मिळत नसल्याने मी एकटीच वाटचाल करत होती. बस, रेल्वेने प्रवास होत होता. एखाद्या स्पर्धेदरम्यान राहण्यासाठी साधी खोली मिळायची, पण या सर्व गोष्टी माझ्यासाठी एकप्रकारे चांगल्या ठरल्या. कारण यामुळे मला प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. जर मी एखाद्या श्रीमंत घरातील असते, तर मला कदाचित संघर्ष काय असतो, हे कळालेच नसते. त्यामुळे एका साधारण कुटुंबातून पुढे आल्याचा मला अभिमान आहे. यानंतर, तिसऱ्यांदा व चौथ्यांदा जागतिक जेतेपद पटकावल्यानंतर मला पुरस्कर्ते मिळाले.’टोकियो २०२० सालच्या आॅलिम्पिक तयारीविषयी मेरीकोमने सांगितले की, ‘यंदाच्या जागतिक स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात खेळलेल्या खेळाडूंवर मी लक्ष ठेवून होते. यापैकी एक-दोन खेळाडू आव्हानात्मक वाटले, पण इतर खेळाडू सर्वसाधारण असल्याने माझ्याकडे संधी आहे. या सर्व खेळाडूंचा आता व्यवस्थित अभ्यास करून, त्यानुसार मी योजना तयार करेन.’तसेच, ‘तयारी करताना योग्य साथीदार मिळणेही आवश्यक असते, पण त्याची कमतरता आपल्याकडे भासते. इतर वजनी गटातील खेळाडूंकडूनही अपेक्षित मदत होत नाही. त्यांचे केवळ त्यांच्या खेळावर प्रेम आहे. देशाचा विचार त्यांच्याकडून झाला, तरच आपल्याला यश मिळू शकेल,’ असेही मेरी म्हणाली.पोलंड स्पर्धेचा जागतिक स्पर्धेसाठी झाला फायदासहावे जागतिक सुवर्ण पदक मिळविण्यात काहीच अडचण आली नाही. मला माझ्या तयारीवर पूर्ण विश्वास होता. आशियाई स्पर्धेतही मला विशेष स्पर्धा मिळाली नाही. पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत मात्र तुलनेत चांगली लढत मिळाली. या स्पर्धेत जागतिक स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बहुतेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामुळे तयारी चांगली झाली होती.- एम. सी. मेरीकोम.