शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

वर्ल्डकप जिंकण्यासाठी ‘तीन अच्छे दिन’ची गरज

By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST

भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी फक्त तीन चांगल्या दिवसांची गरज असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांने व्यक्त केले.

राहुल द्रविड : धोनी, विराट एकटेच सामन्याचा निकाल फिरवू शकतातनवी दिल्ली : भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी फक्त तीन चांगल्या दिवसांची गरज असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांने व्यक्त केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात हा शैलीदार फलंदाज बोलत होता.द्रविड म्हणाला, ‘या विश्वचषक स्पर्धेचे स्वरूपच असे आहे की, अग्रस्थानावरील सर्व संघांना उपांत्यफेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी आपल्याला तीन चांगल्या दिवसांची गरज असणार आहे. आपल्याकडे महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली आहेत की, जे एकटेच सामन्याचा निकाल फिरवू शकतात.’द्रविड म्हणाला, ‘हे सर्व सहज आणि सोपे आहे, असे माझे मत नाही. हा प्रवास कठीण असणार आहे. मात्र, व्यक्तिगत कामगिरीच्या बाबतीत आपण भाग्यवान असू. त्यामुळेच आपण विश्वचषक जिंंकू शकतो.’भारत-आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी केव्हा जिंकेल? या प्रश्नावर बोलताना द्रविड म्हणाला की, मलाही याचे उत्तर हवे आहे. कसोटीतील घटती प्रेक्षक संख्या हा चिंतेचा विषय असून, यासाठी दिवस-रात्र कसोटी खेळविण्याच्या पर्यायाचा विचार व्हायला हवा, असेही तो म्हणाला.द्रविड म्हणाला, ‘सध्याच्या परिस्थितीत आपली कामे सोडून कोणी पाच दिवस सामना पाहायला येईल हे मला कठीण वाटते. त्यामुळेच दिवस-रात्र कसोटीचा पर्याय मला योग्य वाटतो. यामुळे प्रेक्षकांच्या संख्येत भर पडेल असे मला वाटते, असेही द्रविड म्हणाला.(वृत्तसंस्था)सरितादेवीच्या कृतीचे समर्थन नाहीभारतीय महिला मुष्ठियोद्धा सरितादेवीने इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक घेण्यास नकार दिला होता. मात्र, सरितादेवीची ही कृती योग्य नव्हती, असे राहुल द्रविडचे मत आहे. अंक देण्याच्या वादग्रस्त पद्धतीमुळे सरितादेवीला कोरियाच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला होता. द्रविड म्हणाला, ‘मुष्ठियुद्धामध्ये अंक देण्याची पद्धत कशी आहे, हे मला माहीत नाही. उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे तिच्या मन:स्थितीची मला जाणीव आहे. मात्र, त्यानंतर २४ तासांनी झालेल्या कार्यक्रमात पदक न स्वीकारण्याच्या कृतीचे मी समर्थन करू शकत नाही. मला ही गोष्ट योग्य वाटत नाही.