शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सुवर्णकन्या राहीला पदोन्नती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:55 IST

सध्या राही कोल्हापुरात उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणारी महाराष्ट्रकन्या राही सरनोबतला पदोन्नती मिळणार का, याबाबत क्रीडा क्षेत्रात उत्सुकता आहे. २७ वर्षीय राही ही सध्या कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिच्या पदोन्नतीबाबत ‘विशेष बाब’ म्हणून प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तालयातील सुत्रांनी गुरूवारी ‘लोकमत’ला दिली.जागतिक नेमबाजी स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहीला राज्य शासनाच्या नियमानुसार थेट ‘क्लास वन’ नोकरी देण्यात आली आहे. यानंतर कामगिरीत सातत्य राखत तिने आता आशियाई स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेण्याचा पराक्रम केला आहे. क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पंजाब, हरियाणा या राज्यांत खेळाडूला शासकीय नोकरी मिळाल्यानंतर त्याने महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्यास पदोन्नतीसाठी त्याचा विचार केला जातो. खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी पंजाब, हरियाणा सरकार ही योजना राबविते. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूने यश मिळविल्यास त्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याचा नियम महाराष्ट्र शासनाने अलिकडेच जारी केला आहे. त्यापुढील पाऊल म्हणून खेळाडूंना अधिक चांगले यश मिळविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उपरोक्त निर्णय घेण्याची संधी राज्य शासनाला आहे.राहीच्या यशाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला ५० लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. शासनसेवेत असलेल्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर आधारित पदोन्नती देण्याबाबत सरकारचा थेट नियम नियम नसल्याने पुणे विभागीय कार्यालयात याबाबत याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘राहीचे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. शासकीय सेवेतील खेळाडूंना खेळातील कामगिरीवर आधारित पदोन्नती देण्याचा नियम नसला तरी विशेष बाब म्हणून याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.’ यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.हे पदक खूप महत्त्वाचे - राहीकेवळ आशियाई पदक म्हणून हे यश माझ्यासाठी महत्त्वाचे नसून अनेक बाबतीत हे यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. गेली २-३ वर्ष माझी दुखापतीमध्ये गेली आणि त्यातून सावरण्यास मला खूप वेळ लागला. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्तरावर पदक जिंकणे खूप महत्त्वाचे ठरते. अशाप्रकारचे यश मिळवण्यासाठी खूप महिन्यांचा काळ लागतो, कारण तुम्ही वर्षभर खेळापासून दूर असता. त्यामुळे एक प्रोत्साहन किंवा मला पुढील मोठ्या स्पर्धांसाठी आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी हे पदक खूप महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रीया राही सरनोबतने ‘लोकमत’कडे दिली.राहीच्या यशाचा अभिमानराहीने मिळवलेल्या यशाबाबत आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आपला आणखी एक खेळाडू जलतरणपटू वीरधवल खाडे याचे पदक हुकले. मात्र, यामुळे त्याच्या परिश्रमाचे मोल कमी होत नाही. या दोन्ही खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावून आगामी काळात देशाला आॅलिम्पिक पदके जिंकून द्यावीत, यासाठी शुभेच्छा.- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे विभाग

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतAsian Games 2018आशियाई स्पर्धा