शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सुवर्णकन्या राहीला पदोन्नती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:55 IST

सध्या राही कोल्हापुरात उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणारी महाराष्ट्रकन्या राही सरनोबतला पदोन्नती मिळणार का, याबाबत क्रीडा क्षेत्रात उत्सुकता आहे. २७ वर्षीय राही ही सध्या कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिच्या पदोन्नतीबाबत ‘विशेष बाब’ म्हणून प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तालयातील सुत्रांनी गुरूवारी ‘लोकमत’ला दिली.जागतिक नेमबाजी स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहीला राज्य शासनाच्या नियमानुसार थेट ‘क्लास वन’ नोकरी देण्यात आली आहे. यानंतर कामगिरीत सातत्य राखत तिने आता आशियाई स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेण्याचा पराक्रम केला आहे. क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पंजाब, हरियाणा या राज्यांत खेळाडूला शासकीय नोकरी मिळाल्यानंतर त्याने महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्यास पदोन्नतीसाठी त्याचा विचार केला जातो. खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी पंजाब, हरियाणा सरकार ही योजना राबविते. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूने यश मिळविल्यास त्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याचा नियम महाराष्ट्र शासनाने अलिकडेच जारी केला आहे. त्यापुढील पाऊल म्हणून खेळाडूंना अधिक चांगले यश मिळविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उपरोक्त निर्णय घेण्याची संधी राज्य शासनाला आहे.राहीच्या यशाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला ५० लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. शासनसेवेत असलेल्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर आधारित पदोन्नती देण्याबाबत सरकारचा थेट नियम नियम नसल्याने पुणे विभागीय कार्यालयात याबाबत याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘राहीचे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. शासकीय सेवेतील खेळाडूंना खेळातील कामगिरीवर आधारित पदोन्नती देण्याचा नियम नसला तरी विशेष बाब म्हणून याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.’ यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.हे पदक खूप महत्त्वाचे - राहीकेवळ आशियाई पदक म्हणून हे यश माझ्यासाठी महत्त्वाचे नसून अनेक बाबतीत हे यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. गेली २-३ वर्ष माझी दुखापतीमध्ये गेली आणि त्यातून सावरण्यास मला खूप वेळ लागला. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्तरावर पदक जिंकणे खूप महत्त्वाचे ठरते. अशाप्रकारचे यश मिळवण्यासाठी खूप महिन्यांचा काळ लागतो, कारण तुम्ही वर्षभर खेळापासून दूर असता. त्यामुळे एक प्रोत्साहन किंवा मला पुढील मोठ्या स्पर्धांसाठी आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी हे पदक खूप महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रीया राही सरनोबतने ‘लोकमत’कडे दिली.राहीच्या यशाचा अभिमानराहीने मिळवलेल्या यशाबाबत आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आपला आणखी एक खेळाडू जलतरणपटू वीरधवल खाडे याचे पदक हुकले. मात्र, यामुळे त्याच्या परिश्रमाचे मोल कमी होत नाही. या दोन्ही खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावून आगामी काळात देशाला आॅलिम्पिक पदके जिंकून द्यावीत, यासाठी शुभेच्छा.- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे विभाग

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतAsian Games 2018आशियाई स्पर्धा