शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुवर्णकन्या राहीला पदोन्नती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:55 IST

सध्या राही कोल्हापुरात उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणारी महाराष्ट्रकन्या राही सरनोबतला पदोन्नती मिळणार का, याबाबत क्रीडा क्षेत्रात उत्सुकता आहे. २७ वर्षीय राही ही सध्या कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिच्या पदोन्नतीबाबत ‘विशेष बाब’ म्हणून प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तालयातील सुत्रांनी गुरूवारी ‘लोकमत’ला दिली.जागतिक नेमबाजी स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहीला राज्य शासनाच्या नियमानुसार थेट ‘क्लास वन’ नोकरी देण्यात आली आहे. यानंतर कामगिरीत सातत्य राखत तिने आता आशियाई स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेण्याचा पराक्रम केला आहे. क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पंजाब, हरियाणा या राज्यांत खेळाडूला शासकीय नोकरी मिळाल्यानंतर त्याने महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्यास पदोन्नतीसाठी त्याचा विचार केला जातो. खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी पंजाब, हरियाणा सरकार ही योजना राबविते. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूने यश मिळविल्यास त्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याचा नियम महाराष्ट्र शासनाने अलिकडेच जारी केला आहे. त्यापुढील पाऊल म्हणून खेळाडूंना अधिक चांगले यश मिळविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उपरोक्त निर्णय घेण्याची संधी राज्य शासनाला आहे.राहीच्या यशाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला ५० लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. शासनसेवेत असलेल्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर आधारित पदोन्नती देण्याबाबत सरकारचा थेट नियम नियम नसल्याने पुणे विभागीय कार्यालयात याबाबत याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘राहीचे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. शासकीय सेवेतील खेळाडूंना खेळातील कामगिरीवर आधारित पदोन्नती देण्याचा नियम नसला तरी विशेष बाब म्हणून याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.’ यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.हे पदक खूप महत्त्वाचे - राहीकेवळ आशियाई पदक म्हणून हे यश माझ्यासाठी महत्त्वाचे नसून अनेक बाबतीत हे यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. गेली २-३ वर्ष माझी दुखापतीमध्ये गेली आणि त्यातून सावरण्यास मला खूप वेळ लागला. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्तरावर पदक जिंकणे खूप महत्त्वाचे ठरते. अशाप्रकारचे यश मिळवण्यासाठी खूप महिन्यांचा काळ लागतो, कारण तुम्ही वर्षभर खेळापासून दूर असता. त्यामुळे एक प्रोत्साहन किंवा मला पुढील मोठ्या स्पर्धांसाठी आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी हे पदक खूप महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रीया राही सरनोबतने ‘लोकमत’कडे दिली.राहीच्या यशाचा अभिमानराहीने मिळवलेल्या यशाबाबत आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आपला आणखी एक खेळाडू जलतरणपटू वीरधवल खाडे याचे पदक हुकले. मात्र, यामुळे त्याच्या परिश्रमाचे मोल कमी होत नाही. या दोन्ही खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावून आगामी काळात देशाला आॅलिम्पिक पदके जिंकून द्यावीत, यासाठी शुभेच्छा.- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे विभाग

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतAsian Games 2018आशियाई स्पर्धा