शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्जुन पुरस्कार मिळेल यासाठी कुठले पदक जिंकू’; साक्षी मलिकचं थेट पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:37 IST

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या साक्षीने, ‘माझ्या नावामागे अर्जुन पुरस्कार विजेती अशी बिरुदावली लागावी हे माझे स्वप्न आहे. अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी असे कुठले पदक जिंकावे,’ हे आपणच सुचवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांवर वाद निर्माण होणे नवीन नाही. यंदाही नव्या वादाला तोंड फुटले. क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी ‘खेलरत्न’ पुरस्काराची मानकरी ठरलेल्या महिला मल्ल साक्षी मलिक आणि भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समितीने सुचविलेल्या २९ पैकी २७ खेळाडूंनाच हा पुरस्कार मिळणार आहे. या निर्णयामुळे हताश झालेल्या साक्षी मलिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली शिवाय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना प्रश्न विचारला आहे.

साक्षीला २०१७ ला देशातील चौथा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कारणास्तव यंदा तिला अर्जुन पुरस्कार नाकारण्यात आला. मागच्या आठवड्यात न्या.(सेवानिवृत्त) मुकुंदकम शर्मा यांच्या नेतत्वाखालील निवड समितीने २९ जणांच्या नावांची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. साक्षी आणि मीराबाई या दोघींना अर्जुन पुरस्कार देण्याचा निर्णय रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आला होता. समितीने यादीत दोघींच्या नावाचा समावेश केला, तेव्हापासूनच टीका होऊ लागली होती. कोरोनामुळे २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात होणार नाही. विजेत्यांना व्हर्च्युअल पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या साक्षीने, ‘माझ्या नावामागे अर्जुन पुरस्कार विजेती अशी बिरुदावली लागावी हे माझे स्वप्न आहे. अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी असे कुठले पदक जिंकावे,’ हे आपणच सुचवा, असा प्रश्न क्रीडामंत्र्यांना विचारला आहे. तिने पुढे लिहिले, ‘मा. मोदीजी आणि मा. क्रीडामंत्रीजी, मला खेलरत्नने सन्मानित करण्यात आले याचा अभिमान वाटतो. सर्व पुरस्कार आपल्या नावावर असावेत असे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. खेळाडूू यासाठी प्राणाची बाजी लावतो. मला अर्जुन पुरस्कार मिळावा, हे स्वप्न आहे. कुस्ती कारकीर्दीत कधीही अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्याचे स्वप्न माझ्या वाट्याला येणार नाही काय?’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी