शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

‘अर्जुन पुरस्कार मिळेल यासाठी कुठले पदक जिंकू’; साक्षी मलिकचं थेट पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:37 IST

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या साक्षीने, ‘माझ्या नावामागे अर्जुन पुरस्कार विजेती अशी बिरुदावली लागावी हे माझे स्वप्न आहे. अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी असे कुठले पदक जिंकावे,’ हे आपणच सुचवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांवर वाद निर्माण होणे नवीन नाही. यंदाही नव्या वादाला तोंड फुटले. क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी ‘खेलरत्न’ पुरस्काराची मानकरी ठरलेल्या महिला मल्ल साक्षी मलिक आणि भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समितीने सुचविलेल्या २९ पैकी २७ खेळाडूंनाच हा पुरस्कार मिळणार आहे. या निर्णयामुळे हताश झालेल्या साक्षी मलिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली शिवाय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना प्रश्न विचारला आहे.

साक्षीला २०१७ ला देशातील चौथा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कारणास्तव यंदा तिला अर्जुन पुरस्कार नाकारण्यात आला. मागच्या आठवड्यात न्या.(सेवानिवृत्त) मुकुंदकम शर्मा यांच्या नेतत्वाखालील निवड समितीने २९ जणांच्या नावांची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. साक्षी आणि मीराबाई या दोघींना अर्जुन पुरस्कार देण्याचा निर्णय रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आला होता. समितीने यादीत दोघींच्या नावाचा समावेश केला, तेव्हापासूनच टीका होऊ लागली होती. कोरोनामुळे २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात होणार नाही. विजेत्यांना व्हर्च्युअल पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेत्या साक्षीने, ‘माझ्या नावामागे अर्जुन पुरस्कार विजेती अशी बिरुदावली लागावी हे माझे स्वप्न आहे. अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी असे कुठले पदक जिंकावे,’ हे आपणच सुचवा, असा प्रश्न क्रीडामंत्र्यांना विचारला आहे. तिने पुढे लिहिले, ‘मा. मोदीजी आणि मा. क्रीडामंत्रीजी, मला खेलरत्नने सन्मानित करण्यात आले याचा अभिमान वाटतो. सर्व पुरस्कार आपल्या नावावर असावेत असे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. खेळाडूू यासाठी प्राणाची बाजी लावतो. मला अर्जुन पुरस्कार मिळावा, हे स्वप्न आहे. कुस्ती कारकीर्दीत कधीही अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्याचे स्वप्न माझ्या वाट्याला येणार नाही काय?’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी