शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

पुन्हा लाज आणणार नाही, विराट कोहलीचं आश्वासन

By admin | Updated: March 3, 2017 14:11 IST

आपला संघ उत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करेल असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 3 - ऑस्ट्रेलियाविरोधात पुण्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवाने भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीला खूप काही शिकवलं आहे. आपला संघ उत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करेल असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे. पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे खेळलो तसं खेळप्रदर्शन पुन्हा करणार नाही असा आश्वासन कोहलीने चाहत्यांना दिलं आहे.
 
गेल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवावर बोलताना कोहली बोलला की, 'अशा प्रकारच्या पराभवाला तुम्ही नक्कीच विसरणं पसंद कराल. जेव्हा एखादा निकाल आपल्याबाजूने नसतो, तेव्हा झालेला पराभव तुमच्या जिव्हारी लागणं फार महत्वाचं असतं. त्या पराभवातून तुम्ही शिकणं महत्वाचं असतं. जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर तुम्ही कधीच काही शिकू शकणार नाही'. 'आपल्या कमतरतेमुळे आपला पराभव झाला हे मान्य करणं महत्वाचं असतं. विरोधी संघ आपल्यापेक्षा चांगला खेळला हे मान्य करणंही तितकंच महत्वाचं आहे', असंही विराट कोहलीने सांगितलं आहे.
 
पुढे बोलताना कोहली म्हणाला की, 'याचा अर्थ आम्ही प्रत्येक कसोटी सामना अशाचप्रकारे खेळू असा होत नाही. जर तुम्ही प्रत्येक दिवस, सत्रात चांगला खेळलात तर कसोटी सामना जिंकता, जे आम्ही नाही करु शकलो. जे आम्हाला माहित आहे त्यावर भर देत सुधरवण्याचा प्रयत्न करु. मालिका संपेपर्यंत पुन्हा असं प्रदर्शन पाहायला मिळणार नाही याचं आश्वासन मी तुम्हाला देऊ शकतो'.
 
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 333 धावांनी दारुण पराभव केला आहे. गेल्या दोन वर्षातील हा अत्यंत खराब खेळ होता हे स्वत: कोहलीने मान्य केलं होतं. पहिला सामना हरल्याने भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. मालिकेत पुनरागमन करणं भारतासाठी सोपी गोष्ट नाही, कारण 1932 मध्ये कसोटी खेळण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यत फक्त तीन वेळाच भारतीय संघ पहिला सामना हरल्यानंतर मालिकेत यशस्वी कामगिरी करण्यास यशस्वी झाला आहे.