शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लाज आणणार नाही, विराट कोहलीचं आश्वासन

By admin | Updated: March 3, 2017 14:11 IST

आपला संघ उत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करेल असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 3 - ऑस्ट्रेलियाविरोधात पुण्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवाने भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीला खूप काही शिकवलं आहे. आपला संघ उत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करेल असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे. पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे खेळलो तसं खेळप्रदर्शन पुन्हा करणार नाही असा आश्वासन कोहलीने चाहत्यांना दिलं आहे.
 
गेल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवावर बोलताना कोहली बोलला की, 'अशा प्रकारच्या पराभवाला तुम्ही नक्कीच विसरणं पसंद कराल. जेव्हा एखादा निकाल आपल्याबाजूने नसतो, तेव्हा झालेला पराभव तुमच्या जिव्हारी लागणं फार महत्वाचं असतं. त्या पराभवातून तुम्ही शिकणं महत्वाचं असतं. जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर तुम्ही कधीच काही शिकू शकणार नाही'. 'आपल्या कमतरतेमुळे आपला पराभव झाला हे मान्य करणं महत्वाचं असतं. विरोधी संघ आपल्यापेक्षा चांगला खेळला हे मान्य करणंही तितकंच महत्वाचं आहे', असंही विराट कोहलीने सांगितलं आहे.
 
पुढे बोलताना कोहली म्हणाला की, 'याचा अर्थ आम्ही प्रत्येक कसोटी सामना अशाचप्रकारे खेळू असा होत नाही. जर तुम्ही प्रत्येक दिवस, सत्रात चांगला खेळलात तर कसोटी सामना जिंकता, जे आम्ही नाही करु शकलो. जे आम्हाला माहित आहे त्यावर भर देत सुधरवण्याचा प्रयत्न करु. मालिका संपेपर्यंत पुन्हा असं प्रदर्शन पाहायला मिळणार नाही याचं आश्वासन मी तुम्हाला देऊ शकतो'.
 
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 333 धावांनी दारुण पराभव केला आहे. गेल्या दोन वर्षातील हा अत्यंत खराब खेळ होता हे स्वत: कोहलीने मान्य केलं होतं. पहिला सामना हरल्याने भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. मालिकेत पुनरागमन करणं भारतासाठी सोपी गोष्ट नाही, कारण 1932 मध्ये कसोटी खेळण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यत फक्त तीन वेळाच भारतीय संघ पहिला सामना हरल्यानंतर मालिकेत यशस्वी कामगिरी करण्यास यशस्वी झाला आहे.