शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीच सर्वोत्कृष्ट, मोहम्मद आमीरकडून तोंडभरुन कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:52 IST

मोहम्मद आमीरसमोर रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्स यांचे पर्याय असतानाही त्याने विराट कोहलीचीच निवड केली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने भारताचा अक्षरक्ष: धुव्वा उडवणा-या पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहली जगातील सर्वात उत्कृष्ट फलंदाज असल्याचं मोहम्मद आमीर बोलला आहे. विशेष म्हणजे मोहम्मद आमीरसमोर रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्स यांचे पर्याय असतानाही त्याने विराट कोहलीचीच निवड केली. मोहम्मद आमीरने ट्विटरवर चॅट सेशन ठेवलं होतं. यावेळी त्याला या चौघांपैकी सर्वात्कृष्ट फलंदाज कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना त्याने सांगितलं की, "चौघेही उत्तम आहे पण वैयक्तिकरित्या विराट कोहली".
 
 
पुढच्या प्रश्नालाही मोहम्मद आमीरने आपल्याला विराट कोहलीच सर्वात्कृष्ट वाटत असल्याचं सांगितलं. तुझ्या मते सध्या सर्वात्कृष्ट फलंदाज कोण आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तरही मोहम्मद आमीरने विराट कोहली असंच दिलं. 
 
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मोहम्मद आमीरने भारतीय फलंदाजांची दांडी गुल करत संघाला विजय मिळवून दिला. आमीरने विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची विकेट घेत सामन्यावर पकड मजबूत केली होती. मोहम्मद आमीरने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या आधारे पाकिस्तानने अंतिम सामना तब्बल 180 धावांनी जिंकला आणि भारताचा दणदणीत पराभव केला. सोबतच पहिल्यांदा आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीही जिंकली. 
 
यावेळी मोहम्मद आमीरने 2009 रोजी झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफी सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची विकेट मिळवल्यानंतर तितकाच आनंद झाला असल्याचं सांगितलं. तसंच 2016 रोजी एशिया कपमध्ये केलेली गोलंदाजी आपली आत्तापर्यतची सर्वोत्तम होती असंही त्याने सांगितलं. भारतासमोर त्या सामन्यात फक्त 83 धावांचं आव्हान होतं. पण मोहम्मद आमीरने रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैनाची झटपट विकेट मिळवल्याने आठ धावांवर तिन विकेट्स अशी दयनीय परिस्थिती झाली होती. अखेर विराट कोहलीने केलेल्या सुरेख फलंदाजीमुळे भारताला तो सामना जिंकता आला. 
विराट कोहली आणि मोहम्मद आमीरने याआधीही एकमेकांचं कौतुक केलं आहे. मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकल्यानंतर संघात पुनरागन करताना विराट कोहलीने आमीरला शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच टी20 वर्ल्ड कपदरम्यान दोन्ही संघांमध्ये होणा-या सामन्याआधी विराट कोहलीने आमीरला बॅट भेट म्हणून दिली होती.