शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

विराट कोहलीच सर्वोत्कृष्ट, मोहम्मद आमीरकडून तोंडभरुन कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:52 IST

मोहम्मद आमीरसमोर रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्स यांचे पर्याय असतानाही त्याने विराट कोहलीचीच निवड केली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने भारताचा अक्षरक्ष: धुव्वा उडवणा-या पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहली जगातील सर्वात उत्कृष्ट फलंदाज असल्याचं मोहम्मद आमीर बोलला आहे. विशेष म्हणजे मोहम्मद आमीरसमोर रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्स यांचे पर्याय असतानाही त्याने विराट कोहलीचीच निवड केली. मोहम्मद आमीरने ट्विटरवर चॅट सेशन ठेवलं होतं. यावेळी त्याला या चौघांपैकी सर्वात्कृष्ट फलंदाज कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना त्याने सांगितलं की, "चौघेही उत्तम आहे पण वैयक्तिकरित्या विराट कोहली".
 
 
पुढच्या प्रश्नालाही मोहम्मद आमीरने आपल्याला विराट कोहलीच सर्वात्कृष्ट वाटत असल्याचं सांगितलं. तुझ्या मते सध्या सर्वात्कृष्ट फलंदाज कोण आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तरही मोहम्मद आमीरने विराट कोहली असंच दिलं. 
 
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मोहम्मद आमीरने भारतीय फलंदाजांची दांडी गुल करत संघाला विजय मिळवून दिला. आमीरने विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची विकेट घेत सामन्यावर पकड मजबूत केली होती. मोहम्मद आमीरने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या आधारे पाकिस्तानने अंतिम सामना तब्बल 180 धावांनी जिंकला आणि भारताचा दणदणीत पराभव केला. सोबतच पहिल्यांदा आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीही जिंकली. 
 
यावेळी मोहम्मद आमीरने 2009 रोजी झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफी सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची विकेट मिळवल्यानंतर तितकाच आनंद झाला असल्याचं सांगितलं. तसंच 2016 रोजी एशिया कपमध्ये केलेली गोलंदाजी आपली आत्तापर्यतची सर्वोत्तम होती असंही त्याने सांगितलं. भारतासमोर त्या सामन्यात फक्त 83 धावांचं आव्हान होतं. पण मोहम्मद आमीरने रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैनाची झटपट विकेट मिळवल्याने आठ धावांवर तिन विकेट्स अशी दयनीय परिस्थिती झाली होती. अखेर विराट कोहलीने केलेल्या सुरेख फलंदाजीमुळे भारताला तो सामना जिंकता आला. 
विराट कोहली आणि मोहम्मद आमीरने याआधीही एकमेकांचं कौतुक केलं आहे. मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकल्यानंतर संघात पुनरागन करताना विराट कोहलीने आमीरला शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच टी20 वर्ल्ड कपदरम्यान दोन्ही संघांमध्ये होणा-या सामन्याआधी विराट कोहलीने आमीरला बॅट भेट म्हणून दिली होती.