शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विराटची कमाल, केदारची धमाल! पहिल्या वनडेत भारताची बाजी

By admin | Updated: January 15, 2017 22:00 IST

कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडने दिलेल्या 351 धावांच्या आव्हानाचा तीन गडी राखून यशस्वी पाठलाग केला.

ऑनलाइन  लोकमत 
पुणे, दि. 15 - पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाची सूत्रे हाती आल्यानंतर  विराट कोहलीने पहिल्याच लढतीत केलेली दमदार शतकी खेळी, त्याला घरच्या मैदानावर खेळत असलेल्या केदार जाधवने तुफानी शतक ठोकून दिलेली जबरदस्त साथ,  दोघांनीही पाचव्या विकेटसाठी केलेली द्विशतकी भागीदारी आणि मोक्याच्या क्षणी दोन, तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर हार्दिक पांड्याने केलेली समयोचित खेळी या सर्वाच्या जोरावर भारताने आज पुण्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात  इंग्लंडला तीन गडी राखून कात्रजचा घाट दाखवला.  या विजयाबरोबरच भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.
 इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 351 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव अडखळला आहे. शिखर धवन (1), लोकेश राहुल (8), युवराज सिंग (15) आणि  महेंद्र सिंग धोनी (6) हे खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली. मात्र कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. यादरम्यान,  विराटने  इंग्लिश फलंदाजांची जोरदार धुलाई करताना 93 चेंडूतच शतकी मजल मारली. त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे 27 वे शतक ठरले. या खेळीदरम्यान विराटने केदार जाधवसोबत द्विशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयासमीप पोहोचवले. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर विराट 122 धावा काढून बाद झाला. मात्र त्याने बाद होण्यापूर्वी केदारसोबत 200 धावांची भागीदारी करत लढतीचे पारडे भारताकडे झुकवले.
विराट बाद झाल्यावर केदारने सूत्रे हाती घेत आपले दुसरे वनडे शतक अवघ्या 65 चेंडूत पूर्ण केले. मात्र केदार जाधवही 120 धावा काढून बाद झाला.  
यजमान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 350 धावा फटकावत भारतासमोऱ विजयासाठी 351 धावांचे आव्हान ठेवले. जेसन रॉय आणि  जो रूट यांच्या आक्रमक अर्धशतकांनंतर बेन स्टोक्सने केलेल्या घणाघाती फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.
 इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अॅलेक्स हेल्स 9 धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर जेसन रॉय (73)  आणि जो रूट (78) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 69 धावा जोडत संघाला सुस्थितीत नेले. रॉय आणि रूटच्या अर्धशतकांनंतर शेवटच्या षटकांमध्ये बेन स्टोक्स (40 चेंडूत 62 धावा)  आणि मोईन अली (16 चेंडूत 28 धावा) यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 350 धावा फटकावल्या. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताची गोलंदाजी आज पूर्णपणे निष्प्रभ ठरली. भारताकडून हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी दोन बळी टिपले. मात्र त्यांची गोलंदाजीही महागडी ठरली. शेवटच्या दहा षटकांत इंग्लंडने शंभरहून अधिक धावा कुटल्या. 
 तत्पूर्वी भारत आणि पाहुणा इंग्लंड यांच्यातील  पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघातून अजिंक्य रहाणेला वगळण्यात आले . तर, महाराष्ट्राचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला संधी देण्यात आली. विराटने संघात अधिकाधिक अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली.