शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विनेशची खेलरत्नसाठी पुन्हा शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:42 IST

भारतीय कुस्ती महासंघ : साक्षी मलिकचा अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज

नवी दिल्ली : विश्व चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेती विनेश फोगाटची सलग दुसऱ्या वर्षी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार आहे तर रिओ आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केलेला आहे. साक्षी यापूर्वीच खेलरत्न पुरस्काराची मानकरी ठरली आहे.कोरोना व्हायरसमुळे स्थगित टोकियो आॅलम्पिकसाठी पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला मल्ल विनेशचा गेल्या वर्षी हा पुरस्कार हुकला होता आणि सहकारी मल्ल बजरंग पुनिया या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. ती गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे आणि यादरम्यान तिने जकार्तामध्ये आशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने २०१९ मध्ये नूर सुल्तानमध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.या वर्षाच्या सुरुवातीला तिने नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. डब्ल्यूएफआयच्या सूत्राने सांगितले की, अलीकडच्या कालावधीत फॉर्मात नसलेल्या साक्षीने अर्जुन पुरस्कारासाठी आपला अर्ज पाठविला आहे.तिला २०१६ मध्ये जिम्नास्ट दीपा करमाकर व नेमबाज जितू रायसह खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. अलीकडेच ती युवा मल्ल सोनम मलिकविरुद्ध दोनदा पराभूत झाली. त्यामुळे आशियाई आॅलिम्पिक क्वालिफायरपासून तिला रोखण्यात आले होते. डब्ल्यूएफआय तिच्या नावाची शिफारस करते किंवा नाही याबाबत उत्सुकता आहे. कारण २०१९ विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता दीपक पुनिया (८६ किलो) आणि प्रतिभावान राहुल आवारे ( ६१ किलो, बिगर आॅलिम्पिक गट) यांनीही अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केले आहेत.सूत्राने सांगितले की, रिओ आॅलिम्पिकपूर्वी तिने काही विशेष केले नव्हते, त्यामुळे तिचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठविण्यात आले नव्हते, पण रिओमध्ये कांस्यपदक पटकावल्यामुळे तिला थेट खेलरत्न मिळाला. आता ती अर्जुन पुरस्कारासाठीही उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) सहायक सचिव विनोद तोमर म्हणाले,‘आम्ही सोमवारी विनेशचे नाव खेलरत्नसाठी पाठवू. ती प्रबळ दावेदार असेल, पण आम्ही अद्याप अर्जुन पुरस्काराच्या शिफारसीसाठी नावांचा विचार केलेला नाही. कारण आम्हाला जास्त अर्ज मिळालेले नाहीत. त्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्याबाबतचा निर्णय डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष घेतील. ते म्हणाले,‘आमच्याकडे नावांची शिफारस करण्यासाठी ३ जूनपर्यंतचा कालावधी आहे, पण सोमवारपर्यंत नाव पाठविले जाण्याची पूर्ण शक्यता आहे.