शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार : गौतम गंभीर

By admin | Updated: April 10, 2015 08:59 IST

गेम चेंजर’ असलेला सूर्यकुमार यादव हाच मुंबई इंडियन्सवरील केकेआरच्या विजयाचा खरा शिल्पकार असल्याची प्रतिक्रिया कर्णधार गौतम गंभीर याने व्यक्त केली.

कोलकाता : ‘गेम चेंजर’ असलेला सूर्यकुमार यादव हाच मुंबई इंडियन्सवरील केकेआरच्या विजयाचा खरा शिल्पकार असल्याची प्रतिक्रिया कर्णधार गौतम गंभीर याने व्यक्त केली.विजयानंतर गंभीर म्हणाला, ‘टिच्चून मारा केल्याबद्दल मोर्नी मोर्केल याची ‘सामनावीर’ म्हणून निवड जरी झाली असली तरी माझ्या मते सूर्यकुमारच सामनावीर आहे. सूर्यकुमारचे भविष्य फार उज्ज्वल आहे. नाणेफेकीपूर्वी सूर्यकुमारची कामगिरी पाहण्यासारखी असेल, असे रवी शास्त्री यांच्याकडे मी बोललो होतो. चांगली बाब अशी, की सामन्यापूर्वीच आम्ही त्याला उपकर्णधारपदी नेमले. चौथ्या स्थानावर बढतीही देण्यात आली. आमचा सर्वांचा विश्वास त्याने सार्थ ठरविला.’ संघाचा उपकर्णधार असलेल्या यादवने पाच षटकार आणि एका चौकारासह २० चेंडूंत नाबाद ४६ धावांची खेळी केली.दोनदा आयपीएल विजेत्या संघाचा कर्णधार असलेला गंभीर पुढे म्हणाला, ‘केकेआरचा विश्वास खेळाडूंची प्रतिभा शोधणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर असतो.’रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या यादवची काही सामन्यांतील खराब कामगिरीनंतर उचलबांगडी करण्यात आली होती. त्याची जागा आदित्य तारेने घेतली. या पार्श्वभूमीवर गंभीर म्हणाला, ‘आम्ही यादवमधील नेतृत्वगुण हेरले. त्याला तयार केले. आता परिणाम दिसत आहेत. केकेआर व अन्य संघांत हाच मूलभूत फरक आहे.’गोलंदाजी शैली सुधारल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या सुनील नरेनला मात्र चार षटकांत एकही बळी मिळू शकला नाही. त्याने २५ धावा मोजल्या. यावर गंभीरचे मत असे की,‘नरेनवर आम्ही अतिरिक्त दडपण आणणार नाही. त्याने हळूहळू लय मिळवावी, असा आमचा हेतू आहे. काहीशा गवताळ असलेल्या या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फारसे यश मिळत नसल्याने मी त्याच्या गोलंदाजीवर खूष आहे. आम्ही धावांचा पाठलाग करण्यात पटाईत आहोत. माझ्या सहकाऱ्यांनी नेहमीसारखी पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी बजावली. मात्र यापुढील सामन्यांत क्षेत्ररक्षणातील उणिवा दूर करण्यावर भर दिला जाईल.’ क्षेत्ररक्षणातील हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा दमही गंभीरने सहकाऱ्यांना दिला. केकेआरचा पुढील सामना ११ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होईल.