शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

video : कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 16:01 IST

‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके याच्यासोबत जमलेला गप्पांचा फड

जालना : ज्या क्षणाचे सारे क्रीडाप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. आता काही तासांमध्येच मानाची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे. आता गतविजेता अभिजित कटके पुन्हा एकदा बाजी मारणार की त्याला बाला रफिक जोरदार टक्कर देणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

खुराकाचा खर्च दरमहा पन्नास हजार रुपये!सध्या स्पर्धांचं प्रमाण वाढलं आहे; पण प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावं का असं विचारल्यावर अभिजित उत्स्फूर्तपणे म्हणाला, खेळाची भीती राहत नाही ना मग. मुलांना अशा स्पर्धांतून पैसासुद्धा मिळतो. खुराकाचा खर्च किती असतो?-मला चाळीस-पन्नास हजार रुपये लागतात दर महिन्याला. वडिलांनी मनावर घेतलंय म्हणून, ते कुठूनही जमवतात. पण तसं सगळ्यांचंच नसतं. शिवाय अशा वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्यानं टेक्निक कळतं. कसं खेळायचं याचा आत्मविश्वास येतो. आम्ही तालमीत सराव करतो त्यामुळे आम्हाला इथल्या कुस्तीचं काहीच वाटत नाही. तसंच बाहेरच्या स्पर्धांमध्ये खेळल्यानं मोठमोठ्या स्पर्धांचंही काही वाटत नाही.’अभिजितनं एकाचवेळी आर्थिक अडचणीचं वास्तव आणि त्याकडे पाहण्याचा सकारात्मक भाव सांगितला..

..कुस्ती जवळपास कायमचीच संपली होती !अभिजित वेगवेगळ्या छोट्या स्तरावरच्या स्पर्धा खेळत होता. जिंकणं-हारणं सुरू होतं. पण या दरम्यान नेमकी त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली. अस्थिबंधन- लिगामेंट फाटली. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. ही गोष्ट २०१३ मधली. वयाच्या सतराव्या वर्षातली. डॉक्टरांनी सहा महिने आराम सांगितला. नुसताच आराम नव्हे तर कुस्ती खेळता येईल का नाही याबाबत कुठलीही खात्री त्यावेळेस दिलेली नव्हती. कदाचित खेळताच येणार नाही असाच त्यांचा सूर होता. तो आतून पार कोलमडला. आपण आत्ता कुठं कुस्ती करायला लागलो होतो. स्पर्धा जिंकायच्या, किताब मिळवायचे, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पदकं मिळविण्याची स्वप्नं उराशी आणि दुसरीकडे निखळलेल्या खांद्याचं दु:ख. अशा उमेदीच्या काळात माणूस खचल्याशिवाय राहणार नाही. अभिजितही खचला; पण त्यानं उमेद सोडून दिली नाही. स्वप्नांच्या वाटेवर कस्सून धावायला सुरुवात केल्यानंतर अचानक थांबावं लागल्यामुळे तो दुखावला गेला, रडलाही; पण कायम रडत बसला नाही. त्यातून सावरला आणि नव्या जिद्दीनं पेटून उठला.

..मग मारायचो दोन हजार बैठका, करायचो दहा किलोमीटर रनिंग..

अभिजित सांगतो, ‘मी खरं तर खूप आधीच महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकायला हवा होता. म्हणजे जिंकलाच असता, पण खांद्याचं दुखणं आलं. सहा महिन्यात ठीक होईल असं वाटलं होतं; पण दीड वर्ष लागलं. कुस्तीपासून दुरावलोे होतो; पण आतून जिद्द कायम होती. पहिल्या सहा महिन्यात तर आरामापेक्षा रडायलाच जास्त यायचं. स्वत:वर खूप चीड यायची. राग यायचा. नंतर मी सावरलो. रागाचं रूपांतर व्यायामात करू लागलो. अप्पर बॉडी व्यायाम शक्य नव्हता. मग सकाळी १० हजार मीटर पळायचं आणि संध्याकाळी दोन हजार बैठका काढायच्या. राग कशावर तरी काढायचा असायचा. तो असा व्यायामातूनच निघायचा. याचवेळी माझ्या मागाहून तालमीत आलेली मुलं पुढं जाऊ लागली. आपणपण कुस्ती खेळायला पाहिजे म्हणून ईर्षा वाढू लागली. पप्पासुद्धा म्हणायचे, बघ तुझ्यापेक्षा लहान मुलं खेळू लागलीत. जिंकू लागलीत. गदा आणण्याचं स्वप्न राहिलं बघ. मला अजूनच चीड यायची. दीड वर्ष हा संघर्ष केल्यानंतर हळूहळू कुस्तीचा सराव सुरू झाला. २०१५ मध्ये युवा स्पर्धेत उतरलो. गमावलेला आत्मविश्वास परत येऊ लागला..’

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtra Kesriमहाराष्ट्र केसरी