शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

कॅन्सर सर्व्हायव्हर्सचा अनोखा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 23:58 IST

‘कर्करोग हा अंत नाही, या आजारातूनही होऊ शकते नवी सुरुवात’ अशा आशयाचा संदेश इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दिला.

मुंबई : ‘कर्करोग हा अंत नाही, या आजारातूनही होऊ शकते नवी सुरुवात’ अशा आशयाचा संदेश इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दिला. रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ३१ जणांनी सहभाग घेतला. त्यातील १२ जण विविध वयोगटांतील कॅन्सर सर्व्हायव्हर्स होते. या सर्वांनी यशस्वीरीत्या ही दौड पूर्ण करत, अन्य कर्करोग रुग्णांसाठी व समाजासाठी आदर्श घालून दिला. ‘लोकमत’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.यात डोळ्याच्या कर्करोगावर मात केलेली ३० वर्षांची प्रीती फड ही तरुणी १० किलोमीटर अंतर धावली. सोसायटीच्या वतीने राइज अगेन्स्ट कॅन्सर मोहिमेच्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. याविषयी, सोसायटीचे विश्वस्त नवीन क्षत्रिय यांनी सांगितले की, कर्करोगाचे निदान झाले की, रुग्णावर मानसिक आघात होतो. त्यामुळे आता आयुष्य संपले, या भावनेतून हे रुग्ण नकारात्मक आणि निराशावादी जीवन जगतात. मात्र, सोसायटीच्या वतीने ही भावना पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे कर्करोगातून बरे झालेले रुग्णांनाच या उपक्रमाचा चेहरा बनविला आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून ‘उगम’ या कॅन्सर सर्व्हायव्हलच्या संस्थेतील रुग्णांनी कर्करोगावर मात करण्याची जिद्द बाळगण्याचा संदेश दिला.

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन