शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Tokyo Olympics: ॲथलेटिक्समध्ये ही भारतासाठी नवी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 05:11 IST

भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते.

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटरभारताची ऑलिम्पिकमध्ये सुरूवात शानदार झाली. मीराबाई चानू हीने रौप्य पदक मिळ‌वून दिले. मात्र ऑलिम्पिकचा शेवट हा त्यापेक्षा उत्तम झाला. पहिल्यांदाच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये सुवर्ण पदक पटकावले. हा ऐतिहासिक दिवस आहे. या आधी अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदक मिळ‌वले होते. मात्र भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते. भाला फेकीच्या उपांत्य फेरीत तो पहिल्याच प्रयत्न करून परत गेला होता. त्याचा आत्मविश्वास होता. अंतिम फेरीतही त्याने पहिल्या दोन प्रयत्नात आपल्या आत्मविश्वासाचे प्रर्दर्शन केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव वाढला. त्यामुळे त्याला कुणीही पकड़ु शकले नाहीत. टोकियोत उकाडा खुप असतो. त्यामुळे जे खेळाडू ९० मीटरपेक्षा जास्त भालाफेक करतात. ते ८५ मीटरच्या आत फेक करत होते. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे कौतुक करावे लागेल. नीरज हा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. आशियाई पदक विजेता, राष्ट्रकुल पदक विजेता आहे. त्याच्या क्षमतेनुसार त्याने पुर्ण खेळ केला. त्याचे प्रशिक्षक, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि ॲथलेटिक्स संघटनेचेही कौतुक आहे. आजचा दिवस चागंला होता. त्यासोबतच बजरंग पुनियाने कांस्यपदक मिळवले.अदिती अशोक ही देखील अखेरच्या स्ट्रोकवर चौथ्या स्थानावर राहिली ती रँकिंगमध्ये २०० व्या स्थानावर आहे. तेथून ती पुढे आली आहे. भारताने लंडन ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी केली. लंडनमध्ये सहा पदके होती आता सात आहेत. आणि त्यातही एक सुवर्ण पदक आहे. हे सांगते की खुप जास्त प्रगती आहे. कारण रियोत फक्त दोन पदके होते. त्यामुळे ऑलिम्पिक खेळांत भारत पुढे जाऊ शकत नाही, असे वाटत होते. यंदा १२ ते १५ पदकांची अपेक्षा होती मात्र सात मिळाले आहेत. भारतासाठी क्रिकेट हा पॅशन असेल तर हॉकी हा इमोशन आहे. हे पदक ४१ वर्षांनी मिळाले आहे. महिलांच्या गटात देखील खुपच कडवी टक्कर होती. रियोत २०१६ मध्ये भारताने ४१ वर्षांनी पात्रता मिळवली होती. त्यानंतर असा खेळ करणे हे सर्वोत्तम आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा हॉकीच्या विकासाला  वेग येईल.