शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Tokyo Olympics: ॲथलेटिक्समध्ये ही भारतासाठी नवी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 05:11 IST

भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते.

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटरभारताची ऑलिम्पिकमध्ये सुरूवात शानदार झाली. मीराबाई चानू हीने रौप्य पदक मिळ‌वून दिले. मात्र ऑलिम्पिकचा शेवट हा त्यापेक्षा उत्तम झाला. पहिल्यांदाच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये सुवर्ण पदक पटकावले. हा ऐतिहासिक दिवस आहे. या आधी अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदक मिळ‌वले होते. मात्र भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते. भाला फेकीच्या उपांत्य फेरीत तो पहिल्याच प्रयत्न करून परत गेला होता. त्याचा आत्मविश्वास होता. अंतिम फेरीतही त्याने पहिल्या दोन प्रयत्नात आपल्या आत्मविश्वासाचे प्रर्दर्शन केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव वाढला. त्यामुळे त्याला कुणीही पकड़ु शकले नाहीत. टोकियोत उकाडा खुप असतो. त्यामुळे जे खेळाडू ९० मीटरपेक्षा जास्त भालाफेक करतात. ते ८५ मीटरच्या आत फेक करत होते. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे कौतुक करावे लागेल. नीरज हा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. आशियाई पदक विजेता, राष्ट्रकुल पदक विजेता आहे. त्याच्या क्षमतेनुसार त्याने पुर्ण खेळ केला. त्याचे प्रशिक्षक, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि ॲथलेटिक्स संघटनेचेही कौतुक आहे. आजचा दिवस चागंला होता. त्यासोबतच बजरंग पुनियाने कांस्यपदक मिळवले.अदिती अशोक ही देखील अखेरच्या स्ट्रोकवर चौथ्या स्थानावर राहिली ती रँकिंगमध्ये २०० व्या स्थानावर आहे. तेथून ती पुढे आली आहे. भारताने लंडन ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी केली. लंडनमध्ये सहा पदके होती आता सात आहेत. आणि त्यातही एक सुवर्ण पदक आहे. हे सांगते की खुप जास्त प्रगती आहे. कारण रियोत फक्त दोन पदके होते. त्यामुळे ऑलिम्पिक खेळांत भारत पुढे जाऊ शकत नाही, असे वाटत होते. यंदा १२ ते १५ पदकांची अपेक्षा होती मात्र सात मिळाले आहेत. भारतासाठी क्रिकेट हा पॅशन असेल तर हॉकी हा इमोशन आहे. हे पदक ४१ वर्षांनी मिळाले आहे. महिलांच्या गटात देखील खुपच कडवी टक्कर होती. रियोत २०१६ मध्ये भारताने ४१ वर्षांनी पात्रता मिळवली होती. त्यानंतर असा खेळ करणे हे सर्वोत्तम आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा हॉकीच्या विकासाला  वेग येईल.