शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Tokyo Olympics: ॲथलेटिक्समध्ये ही भारतासाठी नवी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 05:11 IST

भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते.

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटरभारताची ऑलिम्पिकमध्ये सुरूवात शानदार झाली. मीराबाई चानू हीने रौप्य पदक मिळ‌वून दिले. मात्र ऑलिम्पिकचा शेवट हा त्यापेक्षा उत्तम झाला. पहिल्यांदाच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये सुवर्ण पदक पटकावले. हा ऐतिहासिक दिवस आहे. या आधी अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदक मिळ‌वले होते. मात्र भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते. भाला फेकीच्या उपांत्य फेरीत तो पहिल्याच प्रयत्न करून परत गेला होता. त्याचा आत्मविश्वास होता. अंतिम फेरीतही त्याने पहिल्या दोन प्रयत्नात आपल्या आत्मविश्वासाचे प्रर्दर्शन केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव वाढला. त्यामुळे त्याला कुणीही पकड़ु शकले नाहीत. टोकियोत उकाडा खुप असतो. त्यामुळे जे खेळाडू ९० मीटरपेक्षा जास्त भालाफेक करतात. ते ८५ मीटरच्या आत फेक करत होते. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे कौतुक करावे लागेल. नीरज हा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. आशियाई पदक विजेता, राष्ट्रकुल पदक विजेता आहे. त्याच्या क्षमतेनुसार त्याने पुर्ण खेळ केला. त्याचे प्रशिक्षक, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि ॲथलेटिक्स संघटनेचेही कौतुक आहे. आजचा दिवस चागंला होता. त्यासोबतच बजरंग पुनियाने कांस्यपदक मिळवले.अदिती अशोक ही देखील अखेरच्या स्ट्रोकवर चौथ्या स्थानावर राहिली ती रँकिंगमध्ये २०० व्या स्थानावर आहे. तेथून ती पुढे आली आहे. भारताने लंडन ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी केली. लंडनमध्ये सहा पदके होती आता सात आहेत. आणि त्यातही एक सुवर्ण पदक आहे. हे सांगते की खुप जास्त प्रगती आहे. कारण रियोत फक्त दोन पदके होते. त्यामुळे ऑलिम्पिक खेळांत भारत पुढे जाऊ शकत नाही, असे वाटत होते. यंदा १२ ते १५ पदकांची अपेक्षा होती मात्र सात मिळाले आहेत. भारतासाठी क्रिकेट हा पॅशन असेल तर हॉकी हा इमोशन आहे. हे पदक ४१ वर्षांनी मिळाले आहे. महिलांच्या गटात देखील खुपच कडवी टक्कर होती. रियोत २०१६ मध्ये भारताने ४१ वर्षांनी पात्रता मिळवली होती. त्यानंतर असा खेळ करणे हे सर्वोत्तम आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा हॉकीच्या विकासाला  वेग येईल.