शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 07:23 IST

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली.

अयाज मेमन

कन्सल्टिंग एडिटर 

शनिवारची सकाळ मीराबाई चानूने गाजवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या भारोत्तोलकने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या यशाचे दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. हे यश मिळवण्यासाठी तिने केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. अत्यंत गरीब घरातील सहा भावंडांमधील मीराबाईचे जीवन अत्यंत संघर्षमय ठरले. परिवाराचा आर्थिक भार उचलण्यासाठी तिला लहानपणी लाकडे तोडावी लागायची. मात्र, एका स्थानिक प्रशिक्षकाने तिच्यातील गुणवत्ता ओळखली आणि मीराबाईच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. त्यावेळी, ती केवळ १२ वर्षांची होती.

२०१४ साली ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकत मीराबाईने पहिल्यांदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून भारताला पदकाची सर्वाधिक आशा होती. मात्र, तिच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली. या अपयशाने अत्यंत निराश झालेल्या मीराबाईने खेळातून निवृत्त होण्याचाही विचार केला होता. या पराभवानंतर पुन्हा एकदा तिची कारकिर्द वेगळ्या वळणावर आली. रिओमधील अपयश टोकियोमध्ये मागे टाकण्याचा त्याचवेळी मीराबाईने निर्धार केला आणि पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तिने तेव्हाच सुरुवात केली.

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली. टीव्ही समालोचनादरम्यान माजी हॉकी कर्णधार विरेन रिस्किन्हा यानेही सांगितले होते की, ‘कमजोरी दूर करणे हेच मीराबाईचे समर्पण ठरेल.’ शनिवारी स्पर्धेदरम्यान मीराबाई खूप सकारात्मक दिसली. स्नॅच प्रकारात प्रयत्न केल्यानंतर तिचा आत्मविश्वास आणखी वाढला. तिने आपल्या भावनांवर प्रचंड नियंत्रण राखले. माझ्या मते जर मुलींना आक्रमकतेने खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले, तेव्हाच असे परिवर्तन शक्य आहे. यासाठी सामाजिक विचार बदलण्याची गरज आहे. असे झाले तरच चानूसारखे चॅम्पियन दुर्मिळपणे नाही, तर नियमितपणे तयार होतील.

ऑलिम्पिकमधील भारताच्या आतापर्यंतच्या यशावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, ज्या खेळांमध्ये भारतीयांना तंदुरुस्त मानले जात नाही, त्याच खेळांमध्ये भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. मेरीकोम, कर्णम मल्लेश्वरी,  पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक अशी काही उदाहरणे आहेत. लिएंडर पेसने अटलांटामध्ये कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर २५ वर्षांत भारतीयांनी १५ वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यामध्ये सहा म्हणजेच ४० टक्के यश महिलांनी मिळवले आहे. मल्लेश्वरी, सायना नेहवाल, मेरी कोम, सिंधू, ंसाक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच, ऑलिम्पिकव्यतिरिक्त अनेक आघाडीच्या महिला खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. 

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021