शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 07:23 IST

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली.

अयाज मेमन

कन्सल्टिंग एडिटर 

शनिवारची सकाळ मीराबाई चानूने गाजवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या भारोत्तोलकने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या यशाचे दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. हे यश मिळवण्यासाठी तिने केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. अत्यंत गरीब घरातील सहा भावंडांमधील मीराबाईचे जीवन अत्यंत संघर्षमय ठरले. परिवाराचा आर्थिक भार उचलण्यासाठी तिला लहानपणी लाकडे तोडावी लागायची. मात्र, एका स्थानिक प्रशिक्षकाने तिच्यातील गुणवत्ता ओळखली आणि मीराबाईच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. त्यावेळी, ती केवळ १२ वर्षांची होती.

२०१४ साली ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकत मीराबाईने पहिल्यांदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून भारताला पदकाची सर्वाधिक आशा होती. मात्र, तिच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली. या अपयशाने अत्यंत निराश झालेल्या मीराबाईने खेळातून निवृत्त होण्याचाही विचार केला होता. या पराभवानंतर पुन्हा एकदा तिची कारकिर्द वेगळ्या वळणावर आली. रिओमधील अपयश टोकियोमध्ये मागे टाकण्याचा त्याचवेळी मीराबाईने निर्धार केला आणि पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तिने तेव्हाच सुरुवात केली.

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली. टीव्ही समालोचनादरम्यान माजी हॉकी कर्णधार विरेन रिस्किन्हा यानेही सांगितले होते की, ‘कमजोरी दूर करणे हेच मीराबाईचे समर्पण ठरेल.’ शनिवारी स्पर्धेदरम्यान मीराबाई खूप सकारात्मक दिसली. स्नॅच प्रकारात प्रयत्न केल्यानंतर तिचा आत्मविश्वास आणखी वाढला. तिने आपल्या भावनांवर प्रचंड नियंत्रण राखले. माझ्या मते जर मुलींना आक्रमकतेने खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले, तेव्हाच असे परिवर्तन शक्य आहे. यासाठी सामाजिक विचार बदलण्याची गरज आहे. असे झाले तरच चानूसारखे चॅम्पियन दुर्मिळपणे नाही, तर नियमितपणे तयार होतील.

ऑलिम्पिकमधील भारताच्या आतापर्यंतच्या यशावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, ज्या खेळांमध्ये भारतीयांना तंदुरुस्त मानले जात नाही, त्याच खेळांमध्ये भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. मेरीकोम, कर्णम मल्लेश्वरी,  पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक अशी काही उदाहरणे आहेत. लिएंडर पेसने अटलांटामध्ये कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर २५ वर्षांत भारतीयांनी १५ वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यामध्ये सहा म्हणजेच ४० टक्के यश महिलांनी मिळवले आहे. मल्लेश्वरी, सायना नेहवाल, मेरी कोम, सिंधू, ंसाक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच, ऑलिम्पिकव्यतिरिक्त अनेक आघाडीच्या महिला खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. 

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021