शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आज ‘सेमीफायनल’

By admin | Updated: January 30, 2015 00:53 IST

आॅस्ट्रेलिया दौ-यात कामगिरी सुधारण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध उद्या, शुक्रवारी खेळल्या जाणा-या तिरंगी मालिकेतील

पर्थ : आॅस्ट्रेलिया दौ-यात कामगिरी सुधारण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध उद्या, शुक्रवारी खेळल्या जाणा-या तिरंगी मालिकेतील उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. अंतिम फेरीत स्थान मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलियाविरुद्धची यापूर्वीची लढत पावसामुळे रद्द झाल्यामुळे भारताच्या खात्यावर दोन गुणांची नोंद झाली. मिळालेल्या या संधीचा लाभ घेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघापुढे उद्याच्या लढतीत फलंदाजी व गोलंदाजीच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान आहे.साखळी फेरीत विजयाचे खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला पहिल्या लढतीत २६७ धावा फटकाविल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागला, तर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ १५३ धावांत गारद झाला. पहिल्या लढतीत १३८ धावा पटकाविणाऱ्या रोहित शर्माला त्यानंतर दुखापतीमुळे दोन सामन्यांत खेळता आले नाही. रोहितवर सर्वांची नजर आहे. विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघव्यवस्थापन रोहितबाबत जोखीम पत्करण्यास तयार नाही. वाका मैदानावर बुधवारी फिटनेस चाचणीनंतर रोहितने काहीवेळ नेट््समध्ये सराव केला. त्यानंतरही तो निवडसाठी उपलब्ध नसल्याचे संकेत मिळत आहेत. अजिंक्य रहाणेचा फलंदाजी क्रम अद्याप निश्चित झालेला नसून अंबाती रायडू तिसऱ्या क्रमांकावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. त्याने तीन सामन्यांत केवळ ११ धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाच सामन्यांत ३६३ धावा फटकावित स्पर्धावीर पुरस्काराचा मानकरी ठरल्यानंतर धवनला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. विराट कोहलीला चौथ्या कमांकावर मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर वन-डेमध्येही भारतीय गोलंदाज खोऱ्याने धावा बहाल करीत असून, विकेट घेण्यात अपयशी ठरत आहेत. (वृत्तसंस्था)