शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

त्यामुळे कळाले चॅम्पियन बनण्याचे महत्त्व - अंकित बावणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 21:06 IST

गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील

- जयंत कुलकर्णी

औरंगाबाद, दि.३० - गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील रणजी फायनलमध्ये पराभव पत्करल्याचे शल्य आहे. २१ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर महाराष्ट्राने हा सामना गमावला आणि त्याच वेळेस विजेतेपद पटकावण्याचे काय महत्त्व असते याची जाणीव आपल्याला झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अंकित बावणे याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. २0१३-२0१४ च्या हंगामात महाराष्ट्राला अंतिम फेरीत धडक मारण्यात निर्णायक भूमिका बजाविणारा अंकित बावणे इंग्लंडचा दौरा आणि त्यानंतर चेन्नई येथील बीसीसीआयची मान्यता असणाऱ्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सन्मार इंडिया केम्पलास्ट या संघाचे प्रतिनिधित्व करताना ५ सामन्यांत ८८ च्या सरासरीने २६५ धावा फटकावल्यानंतर औरंगाबादेत आला होता. यावेळी त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला.२0१३-२0१४ या हंगामात महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. या कामगिरीत अंकित बावणे याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईविरुद्ध संघ संकटात सापडला असताना ८९ धावांची खेळी करताना महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर त्याने उपांत्य फेरीत बंगालविरुद्ध ८९ आणि अंतिम फेरीत कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ८९ आणि दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी करताना आपला विशेष ठसा उमटवला होता. त्या वेळेस त्याने ६६.४५ या जबरदस्त सरासरीसह ११ सामन्यात ७३१ धावांचा पाऊस पाडला होता. तथापि, एवढ्या सुरेख कामगिरीनंतरही अंतिम फेरीत विजेतेपद पटकावता न आल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. २0१३-२0१४ च्या रणजी करंडक स्पर्धेतील फायनल आम्ही जिंकू शकलो नाही याची खंत वाटते. त्यानंतर जीवनात फायनल जिंकण्याचे महत्त्व कळाले. आता आपले पहिले ध्येय म्हणजे आपली वैयक्तिक कामगिरी उंचावतानाच महाराष्ट्राला रणजी चॅम्पियन बनविण्याचे आहे. महाराष्ट्राचा संघ चॅम्पियन झाला की, आपोआप माझी स्वत:ची कामगिरीही उंचावणार आहे आणि माझ्यासाठी भारताच्या सिनिअर संघाची दारे उघडणेदेखील सुकर होईल याचा विश्वास वाटतो, असे अंकित बावणे याने सांगितले.बीसीसीआयचे सचिव व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के आणि रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष रियाज बागवान यांनी नेहमीच युवा खेळाडूंचा समावेश असणाऱ्या आमच्या संघाला पाठिंबा दिला आहे. पडत्या काळातही त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या गेल्या तीन हंगामांपासून आमची कामगिरी उंचावत आहे. आमचे नवीन प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांचा अनुभव आमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्याचप्रमाणे आता आमच्या गाठीशी अनुभवदेखील आहे आणि महाराष्ट्राला रणजीत चॅम्पियन बनवून अजय शिर्के व बागवान यांचा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी संघावर आहे, असे अंकित म्हणतो. यंदा रणजी ट्रॉफीचे सामने तटस्थ स्थळी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे सामनेदेखील परराज्यात होणार आहेत. ही फलंदाजांसाठी चांगली संधी असणार आहेत. याचा लाभ दोन्ही प्रतिस्पर्धी संघांना समसमान असणार आहे. रणजी ट्रॉफी सामन्यांचे वेळापत्रक व स्थळ जाहीर झाल्यानंतर त्या स्थळानुसार आपण सराव करणार असल्याचे अंकित बावणे याने सांगितले. अंकित भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपला आदर्श मानतो. विराटमध्ये आक्रमकता, फिटनेस, क्रिकेटबद्दलची जिद्द व इनिंग बिल्ट करण्याची क्षमता आहे. त्याच्याकडून आपण खूप काही शिकलो असल्याचे त्याने सांगितले. कारकीर्दीतील हरियाणाविरुद्धची खेळी आपली संस्मरणीय असल्याचे अंकित म्हणतो. अंकितने गेल्या वर्षी हरियाणाविरुद्ध खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना पोषक असतानाही १७२ धावांची खेळी करीत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला होता.