शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

त्यामुळे कळाले चॅम्पियन बनण्याचे महत्त्व - अंकित बावणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 21:06 IST

गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील

- जयंत कुलकर्णी

औरंगाबाद, दि.३० - गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील रणजी फायनलमध्ये पराभव पत्करल्याचे शल्य आहे. २१ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर महाराष्ट्राने हा सामना गमावला आणि त्याच वेळेस विजेतेपद पटकावण्याचे काय महत्त्व असते याची जाणीव आपल्याला झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अंकित बावणे याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. २0१३-२0१४ च्या हंगामात महाराष्ट्राला अंतिम फेरीत धडक मारण्यात निर्णायक भूमिका बजाविणारा अंकित बावणे इंग्लंडचा दौरा आणि त्यानंतर चेन्नई येथील बीसीसीआयची मान्यता असणाऱ्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सन्मार इंडिया केम्पलास्ट या संघाचे प्रतिनिधित्व करताना ५ सामन्यांत ८८ च्या सरासरीने २६५ धावा फटकावल्यानंतर औरंगाबादेत आला होता. यावेळी त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला.२0१३-२0१४ या हंगामात महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. या कामगिरीत अंकित बावणे याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईविरुद्ध संघ संकटात सापडला असताना ८९ धावांची खेळी करताना महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर त्याने उपांत्य फेरीत बंगालविरुद्ध ८९ आणि अंतिम फेरीत कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ८९ आणि दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी करताना आपला विशेष ठसा उमटवला होता. त्या वेळेस त्याने ६६.४५ या जबरदस्त सरासरीसह ११ सामन्यात ७३१ धावांचा पाऊस पाडला होता. तथापि, एवढ्या सुरेख कामगिरीनंतरही अंतिम फेरीत विजेतेपद पटकावता न आल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. २0१३-२0१४ च्या रणजी करंडक स्पर्धेतील फायनल आम्ही जिंकू शकलो नाही याची खंत वाटते. त्यानंतर जीवनात फायनल जिंकण्याचे महत्त्व कळाले. आता आपले पहिले ध्येय म्हणजे आपली वैयक्तिक कामगिरी उंचावतानाच महाराष्ट्राला रणजी चॅम्पियन बनविण्याचे आहे. महाराष्ट्राचा संघ चॅम्पियन झाला की, आपोआप माझी स्वत:ची कामगिरीही उंचावणार आहे आणि माझ्यासाठी भारताच्या सिनिअर संघाची दारे उघडणेदेखील सुकर होईल याचा विश्वास वाटतो, असे अंकित बावणे याने सांगितले.बीसीसीआयचे सचिव व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के आणि रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष रियाज बागवान यांनी नेहमीच युवा खेळाडूंचा समावेश असणाऱ्या आमच्या संघाला पाठिंबा दिला आहे. पडत्या काळातही त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या गेल्या तीन हंगामांपासून आमची कामगिरी उंचावत आहे. आमचे नवीन प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांचा अनुभव आमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्याचप्रमाणे आता आमच्या गाठीशी अनुभवदेखील आहे आणि महाराष्ट्राला रणजीत चॅम्पियन बनवून अजय शिर्के व बागवान यांचा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी संघावर आहे, असे अंकित म्हणतो. यंदा रणजी ट्रॉफीचे सामने तटस्थ स्थळी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे सामनेदेखील परराज्यात होणार आहेत. ही फलंदाजांसाठी चांगली संधी असणार आहेत. याचा लाभ दोन्ही प्रतिस्पर्धी संघांना समसमान असणार आहे. रणजी ट्रॉफी सामन्यांचे वेळापत्रक व स्थळ जाहीर झाल्यानंतर त्या स्थळानुसार आपण सराव करणार असल्याचे अंकित बावणे याने सांगितले. अंकित भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपला आदर्श मानतो. विराटमध्ये आक्रमकता, फिटनेस, क्रिकेटबद्दलची जिद्द व इनिंग बिल्ट करण्याची क्षमता आहे. त्याच्याकडून आपण खूप काही शिकलो असल्याचे त्याने सांगितले. कारकीर्दीतील हरियाणाविरुद्धची खेळी आपली संस्मरणीय असल्याचे अंकित म्हणतो. अंकितने गेल्या वर्षी हरियाणाविरुद्ध खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना पोषक असतानाही १७२ धावांची खेळी करीत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला होता.