शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

त्यामुळे कळाले चॅम्पियन बनण्याचे महत्त्व - अंकित बावणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 21:06 IST

गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील

- जयंत कुलकर्णी

औरंगाबाद, दि.३० - गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील रणजी फायनलमध्ये पराभव पत्करल्याचे शल्य आहे. २१ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर महाराष्ट्राने हा सामना गमावला आणि त्याच वेळेस विजेतेपद पटकावण्याचे काय महत्त्व असते याची जाणीव आपल्याला झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अंकित बावणे याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. २0१३-२0१४ च्या हंगामात महाराष्ट्राला अंतिम फेरीत धडक मारण्यात निर्णायक भूमिका बजाविणारा अंकित बावणे इंग्लंडचा दौरा आणि त्यानंतर चेन्नई येथील बीसीसीआयची मान्यता असणाऱ्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सन्मार इंडिया केम्पलास्ट या संघाचे प्रतिनिधित्व करताना ५ सामन्यांत ८८ च्या सरासरीने २६५ धावा फटकावल्यानंतर औरंगाबादेत आला होता. यावेळी त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला.२0१३-२0१४ या हंगामात महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. या कामगिरीत अंकित बावणे याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईविरुद्ध संघ संकटात सापडला असताना ८९ धावांची खेळी करताना महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर त्याने उपांत्य फेरीत बंगालविरुद्ध ८९ आणि अंतिम फेरीत कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ८९ आणि दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी करताना आपला विशेष ठसा उमटवला होता. त्या वेळेस त्याने ६६.४५ या जबरदस्त सरासरीसह ११ सामन्यात ७३१ धावांचा पाऊस पाडला होता. तथापि, एवढ्या सुरेख कामगिरीनंतरही अंतिम फेरीत विजेतेपद पटकावता न आल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. २0१३-२0१४ च्या रणजी करंडक स्पर्धेतील फायनल आम्ही जिंकू शकलो नाही याची खंत वाटते. त्यानंतर जीवनात फायनल जिंकण्याचे महत्त्व कळाले. आता आपले पहिले ध्येय म्हणजे आपली वैयक्तिक कामगिरी उंचावतानाच महाराष्ट्राला रणजी चॅम्पियन बनविण्याचे आहे. महाराष्ट्राचा संघ चॅम्पियन झाला की, आपोआप माझी स्वत:ची कामगिरीही उंचावणार आहे आणि माझ्यासाठी भारताच्या सिनिअर संघाची दारे उघडणेदेखील सुकर होईल याचा विश्वास वाटतो, असे अंकित बावणे याने सांगितले.बीसीसीआयचे सचिव व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के आणि रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष रियाज बागवान यांनी नेहमीच युवा खेळाडूंचा समावेश असणाऱ्या आमच्या संघाला पाठिंबा दिला आहे. पडत्या काळातही त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या गेल्या तीन हंगामांपासून आमची कामगिरी उंचावत आहे. आमचे नवीन प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांचा अनुभव आमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्याचप्रमाणे आता आमच्या गाठीशी अनुभवदेखील आहे आणि महाराष्ट्राला रणजीत चॅम्पियन बनवून अजय शिर्के व बागवान यांचा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी संघावर आहे, असे अंकित म्हणतो. यंदा रणजी ट्रॉफीचे सामने तटस्थ स्थळी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे सामनेदेखील परराज्यात होणार आहेत. ही फलंदाजांसाठी चांगली संधी असणार आहेत. याचा लाभ दोन्ही प्रतिस्पर्धी संघांना समसमान असणार आहे. रणजी ट्रॉफी सामन्यांचे वेळापत्रक व स्थळ जाहीर झाल्यानंतर त्या स्थळानुसार आपण सराव करणार असल्याचे अंकित बावणे याने सांगितले. अंकित भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपला आदर्श मानतो. विराटमध्ये आक्रमकता, फिटनेस, क्रिकेटबद्दलची जिद्द व इनिंग बिल्ट करण्याची क्षमता आहे. त्याच्याकडून आपण खूप काही शिकलो असल्याचे त्याने सांगितले. कारकीर्दीतील हरियाणाविरुद्धची खेळी आपली संस्मरणीय असल्याचे अंकित म्हणतो. अंकितने गेल्या वर्षी हरियाणाविरुद्ध खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना पोषक असतानाही १७२ धावांची खेळी करीत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला होता.