शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

त्यामुळे कळाले चॅम्पियन बनण्याचे महत्त्व - अंकित बावणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 21:06 IST

गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील

- जयंत कुलकर्णी

औरंगाबाद, दि.३० - गेल्या ८ वर्षांपासून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी धावांचे इमले रचताना संघासाठी संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या रणजीपटू अंकित बावणे याला २0१३-१४ हंगामातील रणजी फायनलमध्ये पराभव पत्करल्याचे शल्य आहे. २१ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर महाराष्ट्राने हा सामना गमावला आणि त्याच वेळेस विजेतेपद पटकावण्याचे काय महत्त्व असते याची जाणीव आपल्याला झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अंकित बावणे याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. २0१३-२0१४ च्या हंगामात महाराष्ट्राला अंतिम फेरीत धडक मारण्यात निर्णायक भूमिका बजाविणारा अंकित बावणे इंग्लंडचा दौरा आणि त्यानंतर चेन्नई येथील बीसीसीआयची मान्यता असणाऱ्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सन्मार इंडिया केम्पलास्ट या संघाचे प्रतिनिधित्व करताना ५ सामन्यांत ८८ च्या सरासरीने २६५ धावा फटकावल्यानंतर औरंगाबादेत आला होता. यावेळी त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला.२0१३-२0१४ या हंगामात महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. या कामगिरीत अंकित बावणे याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईविरुद्ध संघ संकटात सापडला असताना ८९ धावांची खेळी करताना महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर त्याने उपांत्य फेरीत बंगालविरुद्ध ८९ आणि अंतिम फेरीत कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ८९ आणि दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी करताना आपला विशेष ठसा उमटवला होता. त्या वेळेस त्याने ६६.४५ या जबरदस्त सरासरीसह ११ सामन्यात ७३१ धावांचा पाऊस पाडला होता. तथापि, एवढ्या सुरेख कामगिरीनंतरही अंतिम फेरीत विजेतेपद पटकावता न आल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. २0१३-२0१४ च्या रणजी करंडक स्पर्धेतील फायनल आम्ही जिंकू शकलो नाही याची खंत वाटते. त्यानंतर जीवनात फायनल जिंकण्याचे महत्त्व कळाले. आता आपले पहिले ध्येय म्हणजे आपली वैयक्तिक कामगिरी उंचावतानाच महाराष्ट्राला रणजी चॅम्पियन बनविण्याचे आहे. महाराष्ट्राचा संघ चॅम्पियन झाला की, आपोआप माझी स्वत:ची कामगिरीही उंचावणार आहे आणि माझ्यासाठी भारताच्या सिनिअर संघाची दारे उघडणेदेखील सुकर होईल याचा विश्वास वाटतो, असे अंकित बावणे याने सांगितले.बीसीसीआयचे सचिव व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के आणि रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष रियाज बागवान यांनी नेहमीच युवा खेळाडूंचा समावेश असणाऱ्या आमच्या संघाला पाठिंबा दिला आहे. पडत्या काळातही त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या गेल्या तीन हंगामांपासून आमची कामगिरी उंचावत आहे. आमचे नवीन प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांचा अनुभव आमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्याचप्रमाणे आता आमच्या गाठीशी अनुभवदेखील आहे आणि महाराष्ट्राला रणजीत चॅम्पियन बनवून अजय शिर्के व बागवान यांचा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी संघावर आहे, असे अंकित म्हणतो. यंदा रणजी ट्रॉफीचे सामने तटस्थ स्थळी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे सामनेदेखील परराज्यात होणार आहेत. ही फलंदाजांसाठी चांगली संधी असणार आहेत. याचा लाभ दोन्ही प्रतिस्पर्धी संघांना समसमान असणार आहे. रणजी ट्रॉफी सामन्यांचे वेळापत्रक व स्थळ जाहीर झाल्यानंतर त्या स्थळानुसार आपण सराव करणार असल्याचे अंकित बावणे याने सांगितले. अंकित भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपला आदर्श मानतो. विराटमध्ये आक्रमकता, फिटनेस, क्रिकेटबद्दलची जिद्द व इनिंग बिल्ट करण्याची क्षमता आहे. त्याच्याकडून आपण खूप काही शिकलो असल्याचे त्याने सांगितले. कारकीर्दीतील हरियाणाविरुद्धची खेळी आपली संस्मरणीय असल्याचे अंकित म्हणतो. अंकितने गेल्या वर्षी हरियाणाविरुद्ध खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना पोषक असतानाही १७२ धावांची खेळी करीत महाराष्ट्राला विजय मिळवून दिला होता.