शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

भारतीय संघात एकही महाराष्ट्रीयन नाही

By admin | Updated: September 21, 2016 05:02 IST

आगामी ७ आॅक्टोबरपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली

मुंबई : आगामी ७ आॅक्टोबरपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली. परंतु, एकाही मराठी खेळाडूची संघात वर्णी न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच वेळी गुजरातचा खेळाडू किरण परमारची संघात वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी प्रो-कबड्डी लीगसह अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी केली असल्याने किमान एक तरी मराठी खेळाडू संघात असणे आवश्यक होते, अशी खंत व्यक्त होत आहे.महाराष्ट्राच्या मातीतला खेळ, अशी ओळख असलेल्या कबड्डीच्या राष्ट्रीय संघात एकाही मराठी खेळाडूची निवड न झाल्याने महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली. दरम्यान, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू अनुप कुमारकडे भारताची धुरा सोपविण्यात आली असून, अष्टपैलू मनजित चिल्लरची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.राष्ट्रीय निवड शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या काशिलिंग आडके, नीलेश शिंदे, रिशांक देवाडिगा, विशाल माने, गिरीश एर्नाक आणि सचिन शिंगाडे यांचा समावेश होता. शिवाय राष्ट्रीय शिबिरामध्ये अंतिम क्षणी परमारचा प्रवेश झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलीे. दरम्यान, याबाबत भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे (एकेएफआय) सचिव दिनेश पटेल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी संघनिवडीबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळले. त्याच वेळी यजमान म्हणून गुजरातचा खेळाडू संघात असणे यात काही गैर नसल्याचे मतही या वेळी व्यक्त होत आहे. दुसरीकडे भारतीय संघात हरियाणाच्या एकूण ४ खेळाडूंनी संघात स्थान मिळवले आहे. तर, रेल्वेच्या ३ खेळाडूंनी स्थान मिळवताना आपली चमक दाखवली. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या हस्ते संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. तसेच, कपिलदेव यांनी कर्णधार अनुप कुमारला काही मोलाच्या टिप्स देताना संघाचे मनोबलही उंचावले. (क्रीडा प्रतिनिधी)>.. आणि कपिलदेव भडकलेएकूण १२ देशांचा सहभाग असलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कपिलदेव चांगलेच भडकले. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने विचारलेल्या या प्रश्नाचा कपिलदेव यांनी चांगलाच समाचार घेताना म्हटले, ‘‘हा प्रश्न याठिकाणी उपस्थित आवश्यक होते का? जर तुम्ही भारतीय असाल, तर तुम्ही हा प्रश्न विचारूच शकत नाही.’’राष्ट्रीय निवड चाचणीतून सर्वोत्तम खेळाडूंची निवड झाली असून, यामध्ये राज्यानुसार निवड झालेली नाही. काही प्रमाणात खेळाडूंमध्ये असलेला थोडाफार फरक हेच निर्णायक ठरले. सर्वच खेळाडू निर्णायक आहेत. यंदाची स्पर्धा अत्यंत कठीण व तगडी असेल. त्यामुळे अंदाज लावणे कठीण असेल, अशी प्रतिक्रिया भारताचे प्रशिक्षक बलवान सिंग आणि के. भास्करन यांनी या वेळी दिली.>महाराष्ट्राचा खेळाडू राष्ट्रीय संघात नसणे हे निश्चित निराशाजनक आहे. यातून तरी राज्य संघटनेने बोध घ्यावा. तसेच रोहित कुमारची न झालेली निवड धक्कादायक ठरली. सॅग स्पर्धेत त्याचा खेळ भारतासाठी निर्णायक ठरला होता.- राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेते >भारतीय संघ :अनुप कुमार (कर्णधार), मनजित चिल्लर (उपकर्णधार), अजय ठाकूर, दीपक हुडा, धरमराज चेरालथन, जसवीर सिंग, किरण परमार, मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा आणि सुरजित, बलवान सिंग आणि के. भास्करन (दोघेही प्रशिक्षक)