शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
5
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
6
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
7
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
8
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
9
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
10
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
11
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
12
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
13
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
14
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
15
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
16
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
17
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
18
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
19
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...

भारतीय संघात एकही महाराष्ट्रीयन नाही

By admin | Updated: September 21, 2016 05:02 IST

आगामी ७ आॅक्टोबरपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली

मुंबई : आगामी ७ आॅक्टोबरपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली. परंतु, एकाही मराठी खेळाडूची संघात वर्णी न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच वेळी गुजरातचा खेळाडू किरण परमारची संघात वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी प्रो-कबड्डी लीगसह अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी केली असल्याने किमान एक तरी मराठी खेळाडू संघात असणे आवश्यक होते, अशी खंत व्यक्त होत आहे.महाराष्ट्राच्या मातीतला खेळ, अशी ओळख असलेल्या कबड्डीच्या राष्ट्रीय संघात एकाही मराठी खेळाडूची निवड न झाल्याने महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली. दरम्यान, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू अनुप कुमारकडे भारताची धुरा सोपविण्यात आली असून, अष्टपैलू मनजित चिल्लरची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.राष्ट्रीय निवड शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या काशिलिंग आडके, नीलेश शिंदे, रिशांक देवाडिगा, विशाल माने, गिरीश एर्नाक आणि सचिन शिंगाडे यांचा समावेश होता. शिवाय राष्ट्रीय शिबिरामध्ये अंतिम क्षणी परमारचा प्रवेश झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलीे. दरम्यान, याबाबत भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे (एकेएफआय) सचिव दिनेश पटेल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी संघनिवडीबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळले. त्याच वेळी यजमान म्हणून गुजरातचा खेळाडू संघात असणे यात काही गैर नसल्याचे मतही या वेळी व्यक्त होत आहे. दुसरीकडे भारतीय संघात हरियाणाच्या एकूण ४ खेळाडूंनी संघात स्थान मिळवले आहे. तर, रेल्वेच्या ३ खेळाडूंनी स्थान मिळवताना आपली चमक दाखवली. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या हस्ते संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. तसेच, कपिलदेव यांनी कर्णधार अनुप कुमारला काही मोलाच्या टिप्स देताना संघाचे मनोबलही उंचावले. (क्रीडा प्रतिनिधी)>.. आणि कपिलदेव भडकलेएकूण १२ देशांचा सहभाग असलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कपिलदेव चांगलेच भडकले. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने विचारलेल्या या प्रश्नाचा कपिलदेव यांनी चांगलाच समाचार घेताना म्हटले, ‘‘हा प्रश्न याठिकाणी उपस्थित आवश्यक होते का? जर तुम्ही भारतीय असाल, तर तुम्ही हा प्रश्न विचारूच शकत नाही.’’राष्ट्रीय निवड चाचणीतून सर्वोत्तम खेळाडूंची निवड झाली असून, यामध्ये राज्यानुसार निवड झालेली नाही. काही प्रमाणात खेळाडूंमध्ये असलेला थोडाफार फरक हेच निर्णायक ठरले. सर्वच खेळाडू निर्णायक आहेत. यंदाची स्पर्धा अत्यंत कठीण व तगडी असेल. त्यामुळे अंदाज लावणे कठीण असेल, अशी प्रतिक्रिया भारताचे प्रशिक्षक बलवान सिंग आणि के. भास्करन यांनी या वेळी दिली.>महाराष्ट्राचा खेळाडू राष्ट्रीय संघात नसणे हे निश्चित निराशाजनक आहे. यातून तरी राज्य संघटनेने बोध घ्यावा. तसेच रोहित कुमारची न झालेली निवड धक्कादायक ठरली. सॅग स्पर्धेत त्याचा खेळ भारतासाठी निर्णायक ठरला होता.- राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेते >भारतीय संघ :अनुप कुमार (कर्णधार), मनजित चिल्लर (उपकर्णधार), अजय ठाकूर, दीपक हुडा, धरमराज चेरालथन, जसवीर सिंग, किरण परमार, मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा आणि सुरजित, बलवान सिंग आणि के. भास्करन (दोघेही प्रशिक्षक)