शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

...तर शर्यतीत पाकिस्तान पडणार खूप मागे

By admin | Updated: October 4, 2016 05:33 IST

या दणदणीत विजयासह टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकले आहे.

कसोटीत भारत नंबर वन!

कोलकाता : तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या न्यू झीलंडचा १७८ धावांनी फडशा पाडून २-० अशी विजयी आघाडी घेतली असून, या दणदणीत विजयासह टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे वेस्ट दौऱ्यातच भारत आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आला होता. मात्र, चौथा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर याचा फायदा घेत पाकिस्तानने पहिले स्थान मिळवले. आता पुन्हा भारत अव्वल स्थानी आला आहे.या शानदार विजयासह भारताने घरच्या मैदानावर गेल्या १२ सामन्यांतून ११वा विजय मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णीत खेळला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या यजमानांचा डाव गडगडल्यानंतरही किवी संघाला फायदा घेता आला नाही. भुवनेश्वर आणि शमी यांच्या स्विंग व वेगवान माऱ्यापुढे किवी संघाने पहिल्या डावात सपशेल शरणागती पत्करली. तर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा अश्विन व जडेजा यांनी आपला जलवा दाखवताना न्यू झीलंडचा पराभव निश्चित करत भारताच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब केले. 2003सालापासून आयसीसी क्रमवारी सुरू झाल्यानंतर चौथ्यांदा टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावले. आतापर्यंत चार यष्टीरक्षकांनी एकाच सामन्यात दोन अर्धशतके झळकावली. यामध्ये वृद्धिमान साहा, एम.एस. धोनी, फारूख इंजिनीअर व दिलवार हुसैन यांचा समावेश आहे. धोनीने अशी कामगिरी चार वेळा केली असून, इतर खेळाडूंनी केवळ एकदा अशी कामगिरी केली आहे.रँकिंग आमच्या नियंत्रणातकामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य आहे. रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणे आणि गमावणे आमच्या हातात नाही; पण मायदेशातील प्रदीर्घ सत्रामुळे यावर नियंत्रण राखणे शक्य आहे.- विराट कोहलीया सामन्यात वेगवान गोलंदाजांनी 26 बळी घेतले. वेगवान गोलंदाजांची इडन गार्डनवरील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी....तर शर्यतीत पाकिस्तान पडणार खूप मागे भारताने इंदोर कसोटी जिंकल्यास किंवा अनिर्णीत राखल्यास अव्वल स्थानाच्या शर्यतीत पाकिस्तान खूप मागे पडणार. याआधी भारत नोव्हेंबर २००९ ते आॅगस्ट २०११, फेब्रुवारी २०१६ आणि आॅगस्ट २०१६मध्ये अव्वल स्थानी होता.या सामन्यात एकूण १५ फलंदाज पायचीत झाले. भारतात खेळलेल्या कसोटी सामन्यात ही सर्वोच्च संख्या आहे. याआधी १९९६ साली अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात १३ फलंदाज पायचीत झाले होते.