शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

...तर शर्यतीत पाकिस्तान पडणार खूप मागे

By admin | Updated: October 4, 2016 05:33 IST

या दणदणीत विजयासह टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकले आहे.

कसोटीत भारत नंबर वन!

कोलकाता : तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या न्यू झीलंडचा १७८ धावांनी फडशा पाडून २-० अशी विजयी आघाडी घेतली असून, या दणदणीत विजयासह टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे वेस्ट दौऱ्यातच भारत आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आला होता. मात्र, चौथा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर याचा फायदा घेत पाकिस्तानने पहिले स्थान मिळवले. आता पुन्हा भारत अव्वल स्थानी आला आहे.या शानदार विजयासह भारताने घरच्या मैदानावर गेल्या १२ सामन्यांतून ११वा विजय मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णीत खेळला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या यजमानांचा डाव गडगडल्यानंतरही किवी संघाला फायदा घेता आला नाही. भुवनेश्वर आणि शमी यांच्या स्विंग व वेगवान माऱ्यापुढे किवी संघाने पहिल्या डावात सपशेल शरणागती पत्करली. तर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा अश्विन व जडेजा यांनी आपला जलवा दाखवताना न्यू झीलंडचा पराभव निश्चित करत भारताच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब केले. 2003सालापासून आयसीसी क्रमवारी सुरू झाल्यानंतर चौथ्यांदा टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावले. आतापर्यंत चार यष्टीरक्षकांनी एकाच सामन्यात दोन अर्धशतके झळकावली. यामध्ये वृद्धिमान साहा, एम.एस. धोनी, फारूख इंजिनीअर व दिलवार हुसैन यांचा समावेश आहे. धोनीने अशी कामगिरी चार वेळा केली असून, इतर खेळाडूंनी केवळ एकदा अशी कामगिरी केली आहे.रँकिंग आमच्या नियंत्रणातकामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य आहे. रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणे आणि गमावणे आमच्या हातात नाही; पण मायदेशातील प्रदीर्घ सत्रामुळे यावर नियंत्रण राखणे शक्य आहे.- विराट कोहलीया सामन्यात वेगवान गोलंदाजांनी 26 बळी घेतले. वेगवान गोलंदाजांची इडन गार्डनवरील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी....तर शर्यतीत पाकिस्तान पडणार खूप मागे भारताने इंदोर कसोटी जिंकल्यास किंवा अनिर्णीत राखल्यास अव्वल स्थानाच्या शर्यतीत पाकिस्तान खूप मागे पडणार. याआधी भारत नोव्हेंबर २००९ ते आॅगस्ट २०११, फेब्रुवारी २०१६ आणि आॅगस्ट २०१६मध्ये अव्वल स्थानी होता.या सामन्यात एकूण १५ फलंदाज पायचीत झाले. भारतात खेळलेल्या कसोटी सामन्यात ही सर्वोच्च संख्या आहे. याआधी १९९६ साली अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात १३ फलंदाज पायचीत झाले होते.