शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
4
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
5
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
6
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
7
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
8
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
9
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
10
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
11
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
12
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
13
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
14
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
15
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
16
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
17
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
18
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
19
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
20
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा ‘अश्वमेध’ सुसाट

By admin | Updated: February 14, 2017 00:19 IST

पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवित सोमवारी पाचव्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा २०८ धावांनी पराभव

हैदराबाद : पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवित सोमवारी पाचव्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा २०८ धावांनी पराभव केला आणि १९ व्या कसोटी सामन्यापर्यंत अपराजित राहण्याचा पराक्रम नोंदविला. भारतीय कर्णधार विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.भारताने बांगलादेशपुढे विजयासाठी ४५९ धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव १००.३ षटकांत २५० धावांत संपुष्टात आला. भारताचा मायदेशातील यंदाच्या मोसमातील हा आठवा कसोटी विजय ठरला. भारताने एमकेव अनिर्णीत सामना राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग सहाव्या मालिकेत विजय मिळविला. २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध या मोहिमेची सुरुवात झाली होती. भारतीय संघ १९ कसोटी सामन्यांपासून अपराजित आहे. यापूर्वी आॅगस्ट २०१५ मध्ये गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध भारताला अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला बांगलादेश संघ या लढतीत चार दिवस व दोन सत्र झुंज देईल, याचा कुणी विचार केला नव्हता. बांगलादेशने दोन्ही डावात एकूण २३० षटके फलंदाजी केली. बांगलादेशला पराभव टाळण्यासाठी अखेरच्या दोन सत्रांत ५८ षटके खेळायची होती; पण उपाहारानंतर ईशांतने चांगला स्पेल करताना पाहुण्या संघाच्या आशेवर पाणी फेरले. ईशांतने सुरुवातीला शब्बीर रहमानला (२२) पायचित केल्यानंतर महमुदुल्लाहला पूलचा फटका मारण्यास प्रवृत्त केले. महमुदुल्लाह फाईन लेग सीमारेषेवर तैनात असणाऱ्या भुवनेश्वरकडे झेल देत माघारी परतला आणि बांगलादेशचा पराभव निश्चित झाला. कर्णधार मुशफिकर रहीम (२३) चुकीचा फटका खेळून बाद झाला. महमुदुल्लाहसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.मेहदी हसन मिराजला (२३) जडेजाने माघारी परतविले. तैजुल इस्लामला (६) बाद करीत जडेजाने डावातील चौथा बळी घेतला. अश्विनने तास्किन अहमदला पायचित करीत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.भारतीय गोलंदाजही प्रशंसेस पात्र आहेत. खेळपट्टीकडून कुठल्याही प्रकारची मदत नसताना संयम दाखवित त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा गारद केले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३७ षटकांत ७८ धावांत ४, तर आर. अश्विनने ३०.३ षटकांत ७३ धावांत ४ बळी घेतले. ईशांत शर्माने १३ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना माघारी परतविले. भारतीय खेळाडूंनी विजयाचा जल्लोष न करता विजयाची आठवण म्हणून काही खेळाडूंनी बेल्स घेतल्या. विशेष म्हणजे सामन्याच्या पाचव्या दिवशीही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती.धावफलकभारत प. डाव ६ बाद ६८७ (घोषित). बांगलादेश प. डाव ३८८. भारत दु. डाव ४ बाद १५९ (घोषित). बांगलादेश दुसरा डाव :- तामिम इक्बाल झे. कोहली गो. अश्विन ०३, सौम्या सरकार झे. रहाणे गो. जडेजा ४२, मोमिनुल हक झे. रहाणे गो. अश्विन २७, महमुदुल्लाह झे. भुवनेश्वर गो. ईशांत ६४, शाकिब-अल-हसन झे. पुजारा गो. जडेजा २२, मुशफिकर रहीम झे. जडेजा गो. अश्विन २३, शब्बीर रहमान पायचित गो. ईशांत २२, मेहदी हसन मिराज झे. साहा गो. जडेजा २३, कामरूल इस्लाम रब्बी नाबाद ०३, तैजुल इस्लाम झे. राहुल गो. जडेजा ०६, तास्किन अहमद पायचित गो. अश्विन ०१. अवांतर (१४). एकूण १००.३ षटकांत सर्वबाद २५०. बाद क्रम : १-११, २-७१, ३-७५, ४-१०६, ५-१६२, ६-२१३, ७-२२५, ८-२४२, ९-२४९, १०-२५०. गोलंदाजी : भुवनेश्वर ८-४-१५-०, अश्विन ३०.३-१०-७३-४, ईशांत १३-३-४०-२, उमेश १२-२-३३-०, जडेजा ३७-१५-७८-४.