शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा ‘अश्वमेध’ सुसाट

By admin | Updated: February 14, 2017 00:19 IST

पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवित सोमवारी पाचव्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा २०८ धावांनी पराभव

हैदराबाद : पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवित सोमवारी पाचव्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा २०८ धावांनी पराभव केला आणि १९ व्या कसोटी सामन्यापर्यंत अपराजित राहण्याचा पराक्रम नोंदविला. भारतीय कर्णधार विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.भारताने बांगलादेशपुढे विजयासाठी ४५९ धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव १००.३ षटकांत २५० धावांत संपुष्टात आला. भारताचा मायदेशातील यंदाच्या मोसमातील हा आठवा कसोटी विजय ठरला. भारताने एमकेव अनिर्णीत सामना राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग सहाव्या मालिकेत विजय मिळविला. २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध या मोहिमेची सुरुवात झाली होती. भारतीय संघ १९ कसोटी सामन्यांपासून अपराजित आहे. यापूर्वी आॅगस्ट २०१५ मध्ये गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध भारताला अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला बांगलादेश संघ या लढतीत चार दिवस व दोन सत्र झुंज देईल, याचा कुणी विचार केला नव्हता. बांगलादेशने दोन्ही डावात एकूण २३० षटके फलंदाजी केली. बांगलादेशला पराभव टाळण्यासाठी अखेरच्या दोन सत्रांत ५८ षटके खेळायची होती; पण उपाहारानंतर ईशांतने चांगला स्पेल करताना पाहुण्या संघाच्या आशेवर पाणी फेरले. ईशांतने सुरुवातीला शब्बीर रहमानला (२२) पायचित केल्यानंतर महमुदुल्लाहला पूलचा फटका मारण्यास प्रवृत्त केले. महमुदुल्लाह फाईन लेग सीमारेषेवर तैनात असणाऱ्या भुवनेश्वरकडे झेल देत माघारी परतला आणि बांगलादेशचा पराभव निश्चित झाला. कर्णधार मुशफिकर रहीम (२३) चुकीचा फटका खेळून बाद झाला. महमुदुल्लाहसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.मेहदी हसन मिराजला (२३) जडेजाने माघारी परतविले. तैजुल इस्लामला (६) बाद करीत जडेजाने डावातील चौथा बळी घेतला. अश्विनने तास्किन अहमदला पायचित करीत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.भारतीय गोलंदाजही प्रशंसेस पात्र आहेत. खेळपट्टीकडून कुठल्याही प्रकारची मदत नसताना संयम दाखवित त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा गारद केले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३७ षटकांत ७८ धावांत ४, तर आर. अश्विनने ३०.३ षटकांत ७३ धावांत ४ बळी घेतले. ईशांत शर्माने १३ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना माघारी परतविले. भारतीय खेळाडूंनी विजयाचा जल्लोष न करता विजयाची आठवण म्हणून काही खेळाडूंनी बेल्स घेतल्या. विशेष म्हणजे सामन्याच्या पाचव्या दिवशीही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती.धावफलकभारत प. डाव ६ बाद ६८७ (घोषित). बांगलादेश प. डाव ३८८. भारत दु. डाव ४ बाद १५९ (घोषित). बांगलादेश दुसरा डाव :- तामिम इक्बाल झे. कोहली गो. अश्विन ०३, सौम्या सरकार झे. रहाणे गो. जडेजा ४२, मोमिनुल हक झे. रहाणे गो. अश्विन २७, महमुदुल्लाह झे. भुवनेश्वर गो. ईशांत ६४, शाकिब-अल-हसन झे. पुजारा गो. जडेजा २२, मुशफिकर रहीम झे. जडेजा गो. अश्विन २३, शब्बीर रहमान पायचित गो. ईशांत २२, मेहदी हसन मिराज झे. साहा गो. जडेजा २३, कामरूल इस्लाम रब्बी नाबाद ०३, तैजुल इस्लाम झे. राहुल गो. जडेजा ०६, तास्किन अहमद पायचित गो. अश्विन ०१. अवांतर (१४). एकूण १००.३ षटकांत सर्वबाद २५०. बाद क्रम : १-११, २-७१, ३-७५, ४-१०६, ५-१६२, ६-२१३, ७-२२५, ८-२४२, ९-२४९, १०-२५०. गोलंदाजी : भुवनेश्वर ८-४-१५-०, अश्विन ३०.३-१०-७३-४, ईशांत १३-३-४०-२, उमेश १२-२-३३-०, जडेजा ३७-१५-७८-४.