शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

टीम इंडिया अपराजित

By admin | Updated: October 6, 2016 04:43 IST

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया आठ आॅक्टोबरपासून

इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया आठ आॅक्टोबरपासून होळकर स्टेडियमवर तिसरा व अखेरचा कसोटी सामना जिंकून किवींना क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने खेळेल. विशेष म्हणजे, होळकर स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, याआधी झालेल्या चारही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत भारताचा विजय झाला असून याच मैदानावरील पहिली कसोटी जिंकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.एप्रिल २००६ मध्ये भारत - इंग्लंड सामन्याद्वारे होळकर स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत चार एकदिवसीय सामने झालेल्या या स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळविण्यात येईल. कानपूर येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर भारताने आपला ५०० वा कसोटी सामना खेळताना न्यूझीलंडला १९७ धावांनी नमवले. यानंतर कोलकाता इडनगार्डन येथे घरच्या मैदानावर २५० वा सामना खेळताना न्यूझीलंडला १७८ धावांनी पराभूत करून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. याचबरोबर भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्येही अव्वल स्थान पटकावले. दरम्यान, होळकर स्टेडियमवरील आपला शंभर टक्के निकाल कायम राखून अंतिम कसोटी विजयासह न्यूझीलंडला क्लीन स्वीप देऊन आपले नंबर वन स्थान अधिक भक्कम करण्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि टीम सज्ज आहे.त्याचप्रमाणे, कर्णधार कोहलीला आणखी एक पराक्रम करण्याची संधी होळकर मैदानावर असेल. हा सामना जिंकल्यास भारत पहिल्यांदाच न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्यात यशस्वी होईल. याआधी भारताने कर्णधार मन्सूरअली खान नवाब पतौडी यांच्या नेतृत्वाखाली १९६७-६८ मध्ये न्यूझीलंडविरुद्धची चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली होती. त्या वेळी पहिल्यांदाच भारताने न्यूझीलंडविरुद्ध एका मालिकेत तीन सामने जिंकले होते. भारताला आयसीसी क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखण्यासाठी इंदूर येथील कसोटी सामना जिंकावा लागेल किंवा अनिर्णीत राखावा लागेल. जर, अशी कामगिरी करण्यात भारताला यश आले, तर नंबर वन स्थान पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर जाईल. मालिकेत ३-० अशी बाजी मारल्यास भारताचे ११५ गुण होतील. तर, २-० अशी बाजी मारल्यास भारताचे ११३ गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानने वेस्ट इंडिजला नमवण्यात यश मिळवले तरी त्यांना ११२ गुणांपर्यंतच समाधान मानावे लागेल. त्याचवेळी न्यूझीलंडने अखेरच्या कसोटीमध्ये बाजी मारल्यास भारताचे १११ गुण होतील आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानकडे पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज करण्याची संधी असेल. (वृत्तसंस्था)गुरुवारी निवडला जाणार भारतीय वनडे संघएम. एस. के. प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील नवीन निवड समिती न्यूझीलंडविरुद्ध आगामी ५ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची निवड करणार आहे.च्भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नवीन सिनिअर निवड समितीने गुरुवारी दुपारी ४ वाजता आपली बैठक आयोजित केली आहे आणि सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषदेत संघाची घोषणा प्रसाद करणार आहेत.च्भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची कसोटी ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान इंदूर येथे होणार आहे. त्यानंतर ५ वनडे सामन्यांची मालिका होईल. पहिला वनडे सामना १६ आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे, दुसरा वनडे २० आॅक्टोबर रोजी दिल्ली येथे, तिसरा वनडे सामना २३ आॅक्टोबरला मोहाली येथे, चौथा वनडे सामना रांची येथे २६ आॅक्टोबर रोजी व पाचवा वनडे सामना २९ आॅक्टोबर रोजी विशाखापट्टणम् येथे खेळवला जाईल.