शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

टीम इंडिया अपराजित

By admin | Updated: October 6, 2016 04:43 IST

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया आठ आॅक्टोबरपासून

इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया आठ आॅक्टोबरपासून होळकर स्टेडियमवर तिसरा व अखेरचा कसोटी सामना जिंकून किवींना क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने खेळेल. विशेष म्हणजे, होळकर स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, याआधी झालेल्या चारही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत भारताचा विजय झाला असून याच मैदानावरील पहिली कसोटी जिंकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.एप्रिल २००६ मध्ये भारत - इंग्लंड सामन्याद्वारे होळकर स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत चार एकदिवसीय सामने झालेल्या या स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळविण्यात येईल. कानपूर येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर भारताने आपला ५०० वा कसोटी सामना खेळताना न्यूझीलंडला १९७ धावांनी नमवले. यानंतर कोलकाता इडनगार्डन येथे घरच्या मैदानावर २५० वा सामना खेळताना न्यूझीलंडला १७८ धावांनी पराभूत करून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. याचबरोबर भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्येही अव्वल स्थान पटकावले. दरम्यान, होळकर स्टेडियमवरील आपला शंभर टक्के निकाल कायम राखून अंतिम कसोटी विजयासह न्यूझीलंडला क्लीन स्वीप देऊन आपले नंबर वन स्थान अधिक भक्कम करण्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि टीम सज्ज आहे.त्याचप्रमाणे, कर्णधार कोहलीला आणखी एक पराक्रम करण्याची संधी होळकर मैदानावर असेल. हा सामना जिंकल्यास भारत पहिल्यांदाच न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्यात यशस्वी होईल. याआधी भारताने कर्णधार मन्सूरअली खान नवाब पतौडी यांच्या नेतृत्वाखाली १९६७-६८ मध्ये न्यूझीलंडविरुद्धची चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली होती. त्या वेळी पहिल्यांदाच भारताने न्यूझीलंडविरुद्ध एका मालिकेत तीन सामने जिंकले होते. भारताला आयसीसी क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखण्यासाठी इंदूर येथील कसोटी सामना जिंकावा लागेल किंवा अनिर्णीत राखावा लागेल. जर, अशी कामगिरी करण्यात भारताला यश आले, तर नंबर वन स्थान पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर जाईल. मालिकेत ३-० अशी बाजी मारल्यास भारताचे ११५ गुण होतील. तर, २-० अशी बाजी मारल्यास भारताचे ११३ गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानने वेस्ट इंडिजला नमवण्यात यश मिळवले तरी त्यांना ११२ गुणांपर्यंतच समाधान मानावे लागेल. त्याचवेळी न्यूझीलंडने अखेरच्या कसोटीमध्ये बाजी मारल्यास भारताचे १११ गुण होतील आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानकडे पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज करण्याची संधी असेल. (वृत्तसंस्था)गुरुवारी निवडला जाणार भारतीय वनडे संघएम. एस. के. प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील नवीन निवड समिती न्यूझीलंडविरुद्ध आगामी ५ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची निवड करणार आहे.च्भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नवीन सिनिअर निवड समितीने गुरुवारी दुपारी ४ वाजता आपली बैठक आयोजित केली आहे आणि सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषदेत संघाची घोषणा प्रसाद करणार आहेत.च्भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची कसोटी ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान इंदूर येथे होणार आहे. त्यानंतर ५ वनडे सामन्यांची मालिका होईल. पहिला वनडे सामना १६ आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे, दुसरा वनडे २० आॅक्टोबर रोजी दिल्ली येथे, तिसरा वनडे सामना २३ आॅक्टोबरला मोहाली येथे, चौथा वनडे सामना रांची येथे २६ आॅक्टोबर रोजी व पाचवा वनडे सामना २९ आॅक्टोबर रोजी विशाखापट्टणम् येथे खेळवला जाईल.