शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

टीम इंडिया ‘नोबॉल’वर आऊट

By admin | Updated: April 1, 2016 04:02 IST

मोक्याच्यावेळी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत लिंडेल सिमन्सने केलेली तडाखेबंद फलंकाजी आणि आंद्रे रसेलने केलेली तुफानी फटकेबाजी या जोरावर वेस्ट इंडिजने टी२० विश्वचषक

- शिवाजी गोरे/रोहित नाईक,  मुंबई

मोक्याच्यावेळी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत लिंडेल सिमन्सने केलेली तडाखेबंद फलंकाजी आणि आंद्रे रसेलने केलेली तुफानी फटकेबाजी या जोरावर वेस्ट इंडिजने टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना यजमान भारताविरुद्ध ७ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. विध्वंसक फलंदाज ख्रिस गेलला स्वस्तात बाद केल्यानंतरही भारतीयांना विजय मिळवण्यात अपयश आले. विशेष म्हणजे दोन वेळा सिमन्सला नोबॉलवर मिळालेल्या जीवदानाचा मोठा फटका भारताला बसला. दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या वेस्ट इंडिजला जगज्जेतेपदासाठी इडन गार्डन्सवर रविवारी बलाढ्य इंग्लंड विरुध्द लढावे लागेल.भारताने दिलेल्या १९३ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजला सुरुवातीलाच धक्का बसला. जसप्रीत बुमराहने धोकादायक गेलचा त्रिफळा उडवल्यानंतर भारतीय पाठिराख्यांनी सामना जिंकल्याच्या अंदाजात जल्लोष केला. मात्र सिमन्स व रसेल यांनी निर्णायक फटकेबाजी करताना भारतीयांच्या हातातील सामना अक्षरश: हिसकावून घेतला. भारताच्या डावात विराट कोहलीला चार जीवदान मिळाले आणि त्याने विंडिजला त्याची शिक्षा दिली. नेमकी तीच बाब सिमन्ससह घडली. ६व्या आणि १४ व्या षटकांत अनुक्रमे रविचंद्रन अश्विन व हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सिमन्स बाद झाला. परंतु दोन्ही चेंडू नोबॉल ठरल्याने त्याने याचा पुरेपुर फायदा उचलत विजयी खेळी केली. शिवाय बुमराह टाकत असलेल्या १८व्या षटकात सिमन्सचा झेल घेताना जेडेजाचा पाय सीमारेषेला स्पर्श झाल्याने पुन्हा एकदा सिमन्सला जीवदान मिळाले आणि त्याने रसेलसह अखेरपर्यंत टिकून राहत संघाला अंतिम फेरीत नेले. सिमन्सने ५१ चेंडूत ७ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ८२ धावांचा तडाखा दिला. तर रसेलने केवळ २० चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचताना नाबाद ४३ धावा कुटल्या. शिवाय सलामीवीर जॉन्सन चार्ल्सनेही आक्रमक ५२ धावा काढताना संघाच्या विजयाचा पाया रचला.तत्पूर्वी, मुंबईकर सलामीवीर रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांनी केलेली आक्रमक सुरुवात आणि संघाचा आधारस्तंभ विराट कोहलीने झळकावलेल्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १९२ धावा उभारल्या. विशेष म्हणजे संपुर्ण स्पर्धेत राखीव खेळाडूंमध्ये बसल्यानंतर निर्णायक उपांत्य लढतीत मिळालेल्या संधीचे रहाणेने सोने केले. कोहलीने ४७ चेंडूत ११ चौकार व १ षटकार ठोकताना नाबाद ८९ धावा कुटताना विंडिजला मजबूत चोप दिला. अत्यंत सावध सुरुवात केल्यानंतर रोहित - रहाणे यांनी जिबरदस्त हल्ला चढवून ६ व्या षटकात भारताची बिनबाद ५५ अशी धमाकेदार सुरुवात केली. सॅम्युअल बद्रीने रोहितला पायचीत पकडून यजमानांना पहिला धक्का दिला. रोहितने ३१ चेंडूत प्रत्येकी ३ चौकार व षटकार ठोकत ४३ धावा फटकावल्या. यानंतर रहाणेने कोहलीसह ६६ धावांची भागीदारी करुन भारताला सावरले.दरम्यान, ९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कोहलीला धावबाद करण्याची नामी संधी ड्वेन ब्रावोने गमावली आणि त्याची मोठी किंमत विंडिजला मोजावी लागली. रहाणे ३५ चेंडूत ४० धावांची खेळी करुन परतला. यानंतर धोनी - कोहली यांनी जिथे एक धाव मिळते त्या ठिकाणी दोन धावा पळताना विंडिजला क्षेत्ररक्षणाचे धडेच दिले. त्यातच कोहलीची फटकेबाजी आणि त्याला मिळालेले चार जीवदान यामुळे विंडिजचे खेळाडू पुर्णपणे हतबल झाले. कोहली - धोनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६४ धावांची भागीदारी केली.धावफलकभारत : रोहित शर्मा पायचीत गो. बद्री ४३, अजिंक्य रहाणे झे. ब्रावो गो. रसेल ४०, विराट कोहली नाबाद ८९, महेंद्रसिंग धोनी नाबाद १५. अवांतर - ५. एकूण : २० षटकांत २ बाद १९२ धावा. गोलंदाजी : आंद्रे रसेल ४-०-४७-१; सॅम्युअल बद्री ४-०-२६-१; कार्लोस ब्रेथवेट ४-०-३८-०; सुलेमान बेन ४-०-३६-०; ड्वेन ब्रावो ४-०-४४-०.वेस्ट इंडिज : जॉन्सन चार्ल्स झे. रोहित गो. कोहली ५२, ख्रिस गेल त्रि. गो. बुमराह ५, मार्लन सॅम्युअल्स झे. रहाणे गो. नेहरा ८, लेंडल सिमन्स नाबाद ८२, आंद्रे रसेल नाबाद ४३. अवांतर - ६. एकूण : १९.४ षटकांत ३ बाद १९६ धावा. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२४-१; जसप्रीत बुमराह ४-०-४२-१; रविंद्र जडेजा ४-०-४८-०; रविचंद्रन अश्विन २-०-२०-०, हार्दिक पांड्या ४-०-४३-०; विराट कोहली १.४-०-१५-१.