शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

तामिळनाडू उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 25, 2016 03:44 IST

गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्याच दिवशी आज, शनिवारी कर्नाटकचा ७ गडी राखून पराभव केला आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत

विशाखापट्टणम : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्याच दिवशी आज, शनिवारी कर्नाटकचा ७ गडी राखून पराभव केला आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या पहिल्या डावातील ८८ धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना तामिळनाडूने शुक्रवारी दिवसअखेर ४ बाद १११ धावांची मजल मारली होती. तामिळनाडूचा पहिला डाव १५२ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात तामिळनाडू संघाने ६४ धावांची आघाडी घेतली. तामिळनाडूने आज केवळ ४१ धावांची भर घालत ६ विकेट गमावल्या. तामिळनाडूतर्फे विजय शंकरने सर्वाधिक ३४ धावा फटकावल्या तर दिनेश कार्तिकने ३१ धावांची खेळी केली. कर्नाटकतर्फे श्रीनाथ अरविंदने १६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर श्रेयस गोपाल व कर्णधार आर. विनयकुमार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. कर्नाटकच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही विशेष छाप सोडता आली नाही. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने ७७ धावांची खेळी केली तरी कर्नाटकचा डाव ३८.१ षटकांत १५० धावांत संपुष्टात आला. कर्नाटकतर्फे विग्नेशने ५३ धावांत ४ तर टी. नटराजनने ४० धावांत ३ बळी घेतले. कर्नाटकने दिलेल्या ८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूची ३ बाद ३५ अशी अवस्था झाली होती. पण दिनेश कार्तिकच्या (नाबाद ४१ धावा, ३० चेंडू, ५ चौकार, २ षटकार) आक्रमक खेळीच्या जोरावर तामिळनाडू संघाने १९.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. (वृत्तसंस्था)