शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरी-रायगड आणि मुंबई-ठाणे यांच्यामध्ये रंगणार उपांत्य फेरीचे सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:34 IST

रायगडने कोल्हापूरची 41-12  अशी धूळधाण उडवत  थाटात अंतिम चार संघात धडक मारली

मुंबई : स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या  उपउपांत्य फेरीच्या चारही सामन्यांनी कबड्डीप्रेमींची घोर निराशा केली. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या ठरलेल्या रत्नागिरी आणि मुंबई शहरने आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवत सहजगत्या उपांत्य फेरी गाठली.  

रायगडने कोल्हापूरची 41-12  अशी धूळधाण उडवत  थाटात अंतिम चार संघात धडक मारली तर ठाण्याने मुंबई उपनगरचे आव्हान 42-32 असे सहज परतवून लावले. आता उपांत्य फेरीत रत्नागिरीची झुंज रायगडशी होईल तर मुंबई शहर आणि ठाणे अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी एकमेकांशी भिडतील.

काल थरारक सामन्यांच्या मेजवानीचा आनंद उपभोगणाऱ्या  प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या जनार्दन राणे क्रीडानगरीत तिसऱ्या दिवशी एकतर्फी सामन्यांचे दाट धुके पसरले होते.  साखळीत दोन्ही लढती जिंकलेल्या रायगडने अमीर धुमाळ आणि स्मितील पाटीलच्या चौफेर चढायांनी कोल्हापूरला पहिल्या मिनिटापासूनच डोके वर काढू दिले नाही. पूर्वार्धातच  कोल्हापूरवर 3 लोण चढवत रायगडने  30-7 अशी निर्णायक आघाडी घेऊन आपला विजय जवळजवळ निश्चित केला. उत्तरार्धातही या लढतीत काहीही चुरस दिसली नाही आणि हा कंटाळवाणा सामना 41-12  असा संपला.रत्नागिरीलाही सांगलीला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले नाही. चढाईत रोहन गमरे आणि पकडीत शुभम शिंदेचा खेळ इतका भन्नाट होतं की सांगलीचे काहीएक चालले नाही. मध्यंतरालाच 27-11 अशी आघाडी घेत त्यांनी उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला होता. त्यावर रत्नागिरीने 39-23 असे शिक्कामोर्तब केले. मुंबई शहरनेही आपल्या लौकिकास खेळ करताना काल नशिबाने आलेल्या पालघरला 45-29 असे सहज नमवून उपांत्य फेरी गाठली. सुशांत साईलने सुसाट चढाया करीत 13 गुण टिपले तर ओंकार जाधवने 10 गुणांची कमाई केली. पालघरकडून जतीन तामोरे आणि योगेश देसले यांनी चांगला खेळ केला.

पहिले 3 सामने निरस झाल्यानंतर उपनगर आणि ठाणे यांच्यातील लढत चुरशीची होता होता राहिली. सोनू थळे आणि सूरज दुदले यांनी वेगवान सुरुवात करीत ठाण्याला 19-12 अशी आघाडी मिळवून दिली.  सामना संपायला सहा मिनिटे असताना ठाणे 33-22 असे आघाडीवर होते. तेव्हा उपनगरच्या आकाश कदमने ठाण्यावर खोलवर चढाई करून 2 गुण मिळवले. गुणफलक 25-33 असताना ठाण्याचा फक्त उमेश म्हात्रेच शिल्लक होता. तोसुद्धा चढाईची किमान 30 सेकंद संपताच बाद होणार होता आणि ठाण्यावर लोणची नामुष्की ओढावली होती, पण तेव्हाच निलेश साळुंखे आणि विक्रांत नार्वेकरने उमेशला पकडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न निव्वळ आत्महत्या ठरला.  ठाण्यावर लोण पडला असता तर गुणफलक 28-33 झाला असता, पण तसे घडले नाही आणि ठाण्याने 42-32 अशी लढत जिंकली.  उमेशने 7 तर सुरजने 8 गुण चढाईचे टिपले.

कोशिश करनेवालो की हार नहीं होती...

मैदानात गाळलेला घाम आणि घेतलेली मेहनत कधीच वाया जात नाही. कित्येकदा माझी संघात निवड होऊनही मी अंतिम संघात खेळू शकलेलो नाही. काहीवेळा संभाव्य संघात निवड झाली पण अंतिम संघात बसू शकलो नाही. म्हणून मी हार मानली नाही. माझा सर्व कबड्डीपटूना हाच सल्ला आहे की धीर सोडू नका, खचू नका. आयुष्यात असे प्रसंग येतातच. त्यांना सामोरे जा. प्रयत्न सोडू नका कारण कोशिश करनेवालो की कभी हार नही होती, असा सल्ला दिला प्रो कबड्डी स्टार धर्मराज चेरलाथन आणि पवन शेरावत यांनी. भारतीय रेल्वे कबड्डी संघाचे प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांनी या दोन्ही कबड्डीच्या स्टार्सना केवळ प्रभादेवीत आणले नाही तर त्यांना उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करायलासुद्धा लावले. दोघांच्या अनुभवाने साऱ्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला होता.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबईthaneठाणेRaigadरायगडRatnagiriरत्नागिरी