शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरीनेच मुंबई जिंकली;  रोहन गमरे ठरला मालिकावीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:15 IST

रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले.

मुंबई : चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईवर मात करणाऱया रत्नागिरीनेच मुंबई जिंकली. मुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल, अशी आशा असताना रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले. वेगवान चढायांबरोबर पकडींचाही अप्रतिम खेळ करणारा रत्नागिरीचा रोहन गमरे सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा मानकरी ठरला. त्याला पॅशन प्रो ही बाईक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ चढाईपटूचा पुरस्कार मुंबईच्या अजिंक्य कापरेला मिळाला तर रत्नागिरीचा शुभम शिंदे पकडवीराचा मानकरी ठरला.

 

प्रभादेवीच्या जर्नादन राणे क्रीडा नगरीत आज कबड्डीप्रेमींचा जनसागर उसळला होता. तब्बल तीन हजार कबड्डीशौकिनांची तुफान गर्दी मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी उपस्थित होती तर स्पोर्टस्वाला आणि कबड्डी यूनिव्हर्स या यू ट्युब चॅनेलवरून तब्बल 41 हजार क्रीडाप्रेमींना अंतिम सामना पाहिला. अत्यंत काँटे की टक्कर असलेल्या अंतिम सामन्यात शेवटची सात मिनीटे शिलल्क असेपर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता. गुणफलकात रत्नागिरी 29-26 असा आघाडीवर होता. तेव्हाच सामन्याला कलाटणी देणारी चढाई बदली खेळाडू म्हणून आत आलेल्या ओंकार कुंभारने केली. त्याने चढाईत मिळवलेले दोन गुण रत्नागिरीला स्फूर्तीदायक ठरले. त्यानंतर रत्नागिरीने अजिंक्य कापरेची पकड करून मुंबईवर लोण लादत 33-26 अशी निर्णायक आघाडी घेतली आणि सामन्यावरही पकड मजबूत केली. त्यानंतर मुंबईच्या ओंकार जाधव, अजिंक्य कापरेने मुंबईला गुण मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण रत्नागिरीचे अभेद्य क्षेत्ररक्षण ते यशस्वीपणे भेदू शकले नाही. दुसरीकडे रत्नागिरीने वेळकाढू खेळ करीत आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.

त्याअगोदर रोहन गमरेने सामन्याच्या पहिल्याच चढाईला पहिला गुण मिळवत रत्नागिरीला भन्नाट सुरूवात करून दिली. त्यानंतर रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने मुंबईच्या अजिंक्य कापरेची पकड करून 2-0 अशी आघाडी घेतली.त्यानंतर मात्र मुंबईच्या जाधव, कापरेने एकापेक्षा एक चढाया करीत रत्नागिरीचे संरक्षण खिळखिळे केले. मुंबईचा गुणांचा वेग इतका भन्नाट होता की 9-9 अशा बरोबरीतला सामना 2 मिनीटात 15-9 असा केला. पण मुंबईला ही आघाडी पुढची पाच मिनीटेही कायम राखता आली नाही. आधी रोहन गमरेची 2 गुणांची चढाई आणि त्यानंतर अजिंक्य पवारने मिळविलेले 3 गुण रत्नागिरीला बरोबरीत आणण्यास पुरेसे ठरले. या वेगवान चढायांमुळे आघाडीवर असलेली मुंबई मध्यंतराला 17-19 अशी पिछाड़ीवर पडली. मध्यंतरानंतर दोन्ही संघात वारंवार चकमकी उडाल्या. मुंबईचा गुणफलक 20-21 असताना सुशांत साईलने एक कल्पक चढाई करत रत्नागिरीच्या चौघांना मध्यरेषेपर्यंत खेचत आणले होते, पण रेषेला स्पर्श करण्याआधीच त्याला रोखण्यात रत्नागिरीला यश लाभले. ही पकड खूप निर्णायक ठरली. त्यानंतर सामना संपायला सात मिनीटे असेपर्यंत उभय संघातला धरपकडींचा खेळ फार रंजक झाला.

 

 तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत रत्नागिरीने रायगडचा 32-24 असा सहज पराभव केला. रत्नागिरीच्या विजयात रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हीरो ठरले. रायगडकडून स्मितील पाटील आणि गौरव पाटील चमकले. तसेच मुंबई शहरसमोर ठाण्याचे काहीही चालले नाही. सुशांत साईल, अजिंक्य कापरे यांनी अप्रतिम खेळ करीत ठाण्याची 50-23 अशी धूळधाण उडवली. महत्त्वाच्या लढतीत ठाण्याचा संघ अत्यंत दुबळा भासला. चार दिवस रंगलेल्या या दिमाखदार कबड्डी महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा माजी राज्यमंत्री सचिन अहिर, मंडळाचे अध्यक्ष रामदास गावकर, प्रमुख कार्यवाह महेश सावंत, निशीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई