शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरीनेच मुंबई जिंकली;  रोहन गमरे ठरला मालिकावीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:15 IST

रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले.

मुंबई : चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईवर मात करणाऱया रत्नागिरीनेच मुंबई जिंकली. मुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल, अशी आशा असताना रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले. वेगवान चढायांबरोबर पकडींचाही अप्रतिम खेळ करणारा रत्नागिरीचा रोहन गमरे सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा मानकरी ठरला. त्याला पॅशन प्रो ही बाईक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ चढाईपटूचा पुरस्कार मुंबईच्या अजिंक्य कापरेला मिळाला तर रत्नागिरीचा शुभम शिंदे पकडवीराचा मानकरी ठरला.

 

प्रभादेवीच्या जर्नादन राणे क्रीडा नगरीत आज कबड्डीप्रेमींचा जनसागर उसळला होता. तब्बल तीन हजार कबड्डीशौकिनांची तुफान गर्दी मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी उपस्थित होती तर स्पोर्टस्वाला आणि कबड्डी यूनिव्हर्स या यू ट्युब चॅनेलवरून तब्बल 41 हजार क्रीडाप्रेमींना अंतिम सामना पाहिला. अत्यंत काँटे की टक्कर असलेल्या अंतिम सामन्यात शेवटची सात मिनीटे शिलल्क असेपर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता. गुणफलकात रत्नागिरी 29-26 असा आघाडीवर होता. तेव्हाच सामन्याला कलाटणी देणारी चढाई बदली खेळाडू म्हणून आत आलेल्या ओंकार कुंभारने केली. त्याने चढाईत मिळवलेले दोन गुण रत्नागिरीला स्फूर्तीदायक ठरले. त्यानंतर रत्नागिरीने अजिंक्य कापरेची पकड करून मुंबईवर लोण लादत 33-26 अशी निर्णायक आघाडी घेतली आणि सामन्यावरही पकड मजबूत केली. त्यानंतर मुंबईच्या ओंकार जाधव, अजिंक्य कापरेने मुंबईला गुण मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण रत्नागिरीचे अभेद्य क्षेत्ररक्षण ते यशस्वीपणे भेदू शकले नाही. दुसरीकडे रत्नागिरीने वेळकाढू खेळ करीत आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.

त्याअगोदर रोहन गमरेने सामन्याच्या पहिल्याच चढाईला पहिला गुण मिळवत रत्नागिरीला भन्नाट सुरूवात करून दिली. त्यानंतर रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने मुंबईच्या अजिंक्य कापरेची पकड करून 2-0 अशी आघाडी घेतली.त्यानंतर मात्र मुंबईच्या जाधव, कापरेने एकापेक्षा एक चढाया करीत रत्नागिरीचे संरक्षण खिळखिळे केले. मुंबईचा गुणांचा वेग इतका भन्नाट होता की 9-9 अशा बरोबरीतला सामना 2 मिनीटात 15-9 असा केला. पण मुंबईला ही आघाडी पुढची पाच मिनीटेही कायम राखता आली नाही. आधी रोहन गमरेची 2 गुणांची चढाई आणि त्यानंतर अजिंक्य पवारने मिळविलेले 3 गुण रत्नागिरीला बरोबरीत आणण्यास पुरेसे ठरले. या वेगवान चढायांमुळे आघाडीवर असलेली मुंबई मध्यंतराला 17-19 अशी पिछाड़ीवर पडली. मध्यंतरानंतर दोन्ही संघात वारंवार चकमकी उडाल्या. मुंबईचा गुणफलक 20-21 असताना सुशांत साईलने एक कल्पक चढाई करत रत्नागिरीच्या चौघांना मध्यरेषेपर्यंत खेचत आणले होते, पण रेषेला स्पर्श करण्याआधीच त्याला रोखण्यात रत्नागिरीला यश लाभले. ही पकड खूप निर्णायक ठरली. त्यानंतर सामना संपायला सात मिनीटे असेपर्यंत उभय संघातला धरपकडींचा खेळ फार रंजक झाला.

 

 तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत रत्नागिरीने रायगडचा 32-24 असा सहज पराभव केला. रत्नागिरीच्या विजयात रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हीरो ठरले. रायगडकडून स्मितील पाटील आणि गौरव पाटील चमकले. तसेच मुंबई शहरसमोर ठाण्याचे काहीही चालले नाही. सुशांत साईल, अजिंक्य कापरे यांनी अप्रतिम खेळ करीत ठाण्याची 50-23 अशी धूळधाण उडवली. महत्त्वाच्या लढतीत ठाण्याचा संघ अत्यंत दुबळा भासला. चार दिवस रंगलेल्या या दिमाखदार कबड्डी महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा माजी राज्यमंत्री सचिन अहिर, मंडळाचे अध्यक्ष रामदास गावकर, प्रमुख कार्यवाह महेश सावंत, निशीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई