शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरीनेच मुंबई जिंकली;  रोहन गमरे ठरला मालिकावीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:15 IST

रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले.

मुंबई : चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईवर मात करणाऱया रत्नागिरीनेच मुंबई जिंकली. मुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल, अशी आशा असताना रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले. वेगवान चढायांबरोबर पकडींचाही अप्रतिम खेळ करणारा रत्नागिरीचा रोहन गमरे सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा मानकरी ठरला. त्याला पॅशन प्रो ही बाईक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ चढाईपटूचा पुरस्कार मुंबईच्या अजिंक्य कापरेला मिळाला तर रत्नागिरीचा शुभम शिंदे पकडवीराचा मानकरी ठरला.

 

प्रभादेवीच्या जर्नादन राणे क्रीडा नगरीत आज कबड्डीप्रेमींचा जनसागर उसळला होता. तब्बल तीन हजार कबड्डीशौकिनांची तुफान गर्दी मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी उपस्थित होती तर स्पोर्टस्वाला आणि कबड्डी यूनिव्हर्स या यू ट्युब चॅनेलवरून तब्बल 41 हजार क्रीडाप्रेमींना अंतिम सामना पाहिला. अत्यंत काँटे की टक्कर असलेल्या अंतिम सामन्यात शेवटची सात मिनीटे शिलल्क असेपर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता. गुणफलकात रत्नागिरी 29-26 असा आघाडीवर होता. तेव्हाच सामन्याला कलाटणी देणारी चढाई बदली खेळाडू म्हणून आत आलेल्या ओंकार कुंभारने केली. त्याने चढाईत मिळवलेले दोन गुण रत्नागिरीला स्फूर्तीदायक ठरले. त्यानंतर रत्नागिरीने अजिंक्य कापरेची पकड करून मुंबईवर लोण लादत 33-26 अशी निर्णायक आघाडी घेतली आणि सामन्यावरही पकड मजबूत केली. त्यानंतर मुंबईच्या ओंकार जाधव, अजिंक्य कापरेने मुंबईला गुण मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण रत्नागिरीचे अभेद्य क्षेत्ररक्षण ते यशस्वीपणे भेदू शकले नाही. दुसरीकडे रत्नागिरीने वेळकाढू खेळ करीत आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.

त्याअगोदर रोहन गमरेने सामन्याच्या पहिल्याच चढाईला पहिला गुण मिळवत रत्नागिरीला भन्नाट सुरूवात करून दिली. त्यानंतर रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने मुंबईच्या अजिंक्य कापरेची पकड करून 2-0 अशी आघाडी घेतली.त्यानंतर मात्र मुंबईच्या जाधव, कापरेने एकापेक्षा एक चढाया करीत रत्नागिरीचे संरक्षण खिळखिळे केले. मुंबईचा गुणांचा वेग इतका भन्नाट होता की 9-9 अशा बरोबरीतला सामना 2 मिनीटात 15-9 असा केला. पण मुंबईला ही आघाडी पुढची पाच मिनीटेही कायम राखता आली नाही. आधी रोहन गमरेची 2 गुणांची चढाई आणि त्यानंतर अजिंक्य पवारने मिळविलेले 3 गुण रत्नागिरीला बरोबरीत आणण्यास पुरेसे ठरले. या वेगवान चढायांमुळे आघाडीवर असलेली मुंबई मध्यंतराला 17-19 अशी पिछाड़ीवर पडली. मध्यंतरानंतर दोन्ही संघात वारंवार चकमकी उडाल्या. मुंबईचा गुणफलक 20-21 असताना सुशांत साईलने एक कल्पक चढाई करत रत्नागिरीच्या चौघांना मध्यरेषेपर्यंत खेचत आणले होते, पण रेषेला स्पर्श करण्याआधीच त्याला रोखण्यात रत्नागिरीला यश लाभले. ही पकड खूप निर्णायक ठरली. त्यानंतर सामना संपायला सात मिनीटे असेपर्यंत उभय संघातला धरपकडींचा खेळ फार रंजक झाला.

 

 तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत रत्नागिरीने रायगडचा 32-24 असा सहज पराभव केला. रत्नागिरीच्या विजयात रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हीरो ठरले. रायगडकडून स्मितील पाटील आणि गौरव पाटील चमकले. तसेच मुंबई शहरसमोर ठाण्याचे काहीही चालले नाही. सुशांत साईल, अजिंक्य कापरे यांनी अप्रतिम खेळ करीत ठाण्याची 50-23 अशी धूळधाण उडवली. महत्त्वाच्या लढतीत ठाण्याचा संघ अत्यंत दुबळा भासला. चार दिवस रंगलेल्या या दिमाखदार कबड्डी महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा माजी राज्यमंत्री सचिन अहिर, मंडळाचे अध्यक्ष रामदास गावकर, प्रमुख कार्यवाह महेश सावंत, निशीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई