शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरीनेच मुंबई जिंकली;  रोहन गमरे ठरला मालिकावीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:15 IST

रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले.

मुंबई : चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईवर मात करणाऱया रत्नागिरीनेच मुंबई जिंकली. मुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल, अशी आशा असताना रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले. वेगवान चढायांबरोबर पकडींचाही अप्रतिम खेळ करणारा रत्नागिरीचा रोहन गमरे सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा मानकरी ठरला. त्याला पॅशन प्रो ही बाईक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ चढाईपटूचा पुरस्कार मुंबईच्या अजिंक्य कापरेला मिळाला तर रत्नागिरीचा शुभम शिंदे पकडवीराचा मानकरी ठरला.

 

प्रभादेवीच्या जर्नादन राणे क्रीडा नगरीत आज कबड्डीप्रेमींचा जनसागर उसळला होता. तब्बल तीन हजार कबड्डीशौकिनांची तुफान गर्दी मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी उपस्थित होती तर स्पोर्टस्वाला आणि कबड्डी यूनिव्हर्स या यू ट्युब चॅनेलवरून तब्बल 41 हजार क्रीडाप्रेमींना अंतिम सामना पाहिला. अत्यंत काँटे की टक्कर असलेल्या अंतिम सामन्यात शेवटची सात मिनीटे शिलल्क असेपर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता. गुणफलकात रत्नागिरी 29-26 असा आघाडीवर होता. तेव्हाच सामन्याला कलाटणी देणारी चढाई बदली खेळाडू म्हणून आत आलेल्या ओंकार कुंभारने केली. त्याने चढाईत मिळवलेले दोन गुण रत्नागिरीला स्फूर्तीदायक ठरले. त्यानंतर रत्नागिरीने अजिंक्य कापरेची पकड करून मुंबईवर लोण लादत 33-26 अशी निर्णायक आघाडी घेतली आणि सामन्यावरही पकड मजबूत केली. त्यानंतर मुंबईच्या ओंकार जाधव, अजिंक्य कापरेने मुंबईला गुण मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण रत्नागिरीचे अभेद्य क्षेत्ररक्षण ते यशस्वीपणे भेदू शकले नाही. दुसरीकडे रत्नागिरीने वेळकाढू खेळ करीत आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.

त्याअगोदर रोहन गमरेने सामन्याच्या पहिल्याच चढाईला पहिला गुण मिळवत रत्नागिरीला भन्नाट सुरूवात करून दिली. त्यानंतर रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने मुंबईच्या अजिंक्य कापरेची पकड करून 2-0 अशी आघाडी घेतली.त्यानंतर मात्र मुंबईच्या जाधव, कापरेने एकापेक्षा एक चढाया करीत रत्नागिरीचे संरक्षण खिळखिळे केले. मुंबईचा गुणांचा वेग इतका भन्नाट होता की 9-9 अशा बरोबरीतला सामना 2 मिनीटात 15-9 असा केला. पण मुंबईला ही आघाडी पुढची पाच मिनीटेही कायम राखता आली नाही. आधी रोहन गमरेची 2 गुणांची चढाई आणि त्यानंतर अजिंक्य पवारने मिळविलेले 3 गुण रत्नागिरीला बरोबरीत आणण्यास पुरेसे ठरले. या वेगवान चढायांमुळे आघाडीवर असलेली मुंबई मध्यंतराला 17-19 अशी पिछाड़ीवर पडली. मध्यंतरानंतर दोन्ही संघात वारंवार चकमकी उडाल्या. मुंबईचा गुणफलक 20-21 असताना सुशांत साईलने एक कल्पक चढाई करत रत्नागिरीच्या चौघांना मध्यरेषेपर्यंत खेचत आणले होते, पण रेषेला स्पर्श करण्याआधीच त्याला रोखण्यात रत्नागिरीला यश लाभले. ही पकड खूप निर्णायक ठरली. त्यानंतर सामना संपायला सात मिनीटे असेपर्यंत उभय संघातला धरपकडींचा खेळ फार रंजक झाला.

 

 तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत रत्नागिरीने रायगडचा 32-24 असा सहज पराभव केला. रत्नागिरीच्या विजयात रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हीरो ठरले. रायगडकडून स्मितील पाटील आणि गौरव पाटील चमकले. तसेच मुंबई शहरसमोर ठाण्याचे काहीही चालले नाही. सुशांत साईल, अजिंक्य कापरे यांनी अप्रतिम खेळ करीत ठाण्याची 50-23 अशी धूळधाण उडवली. महत्त्वाच्या लढतीत ठाण्याचा संघ अत्यंत दुबळा भासला. चार दिवस रंगलेल्या या दिमाखदार कबड्डी महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा माजी राज्यमंत्री सचिन अहिर, मंडळाचे अध्यक्ष रामदास गावकर, प्रमुख कार्यवाह महेश सावंत, निशीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई