शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

राज्यस्तरीय कबड्डी : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 17:54 IST

या महिन्यातील एअर इंडियाचे तिसरे, तर शिवशक्तीचे हंगामातील पाचवे जेतेपद; सुशांत साईल, सायली जाधव सर्वोत्तम

मुंबई : एअर इंडिया, शिवशक्ती यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकाविले. एअर इंडियाचे या महिन्यातील हे तिसरे राज्यस्तरीय अजिंक्यपद, तर शिवशक्तीचे या हंगामातील हे पाचवे जेतेपद आहे. एअर इंडियाचा सुशांत साईल आणि महात्मा गांधींची सायली जाधव हे अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडू ठरले. 

शिंदेवाडी-दादर (पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर  झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने महिंद्राला ३५-१८अशी मात करत स्व.मोहन नाईक चषकावर नाव कोरले. एअर इंडियाने सुरवातच झोकात केली. त्यांच्या असलम इनामदारने आपल्या व संघाच्या पहिल्याच चढाईत बोनस करीत संघाला गुण मिळवून दिला. एअर इंडियाने २गुण घेतल्यानंतर महिंद्राच्या ऋतुराज कोरवीने असलमच्या पायात झेप घेत पहिला गुण घेतला.अनंत पाटीलच्या सलग ३पकडी करीत एअर इंडियाने महिंद्राचा एक टायर निकामी केला.तसेच १०मिनिटाला लोण देत एअर इंडियाने १२-०२अशी हवेत झेप घेली. लोण झाल्यानंतर अनंत पाटीलने एका चढाईत ३गडी टिपत महिंद्राचे इंजिन गरम करण्याचा प्रयत्न केला. पण तो क्षणिक ठरला.

मध्यंतराला २०-११अशी एअर इंडिया कडे आघाडी होती. मध्यांतरा नंतर १३व्या मिनिटाला एअर इंडियाने आणखी एक लोण देत ३१-१६अशी आघाडी घेत महिंद्राच्या सर्वच चाकातील हवा काढून घेतली.या लोण नंतर महिंद्राच्या इंजिनातील धडधड थंड झाली. या नंतर महिंद्राला एअर इंडियाचे हवेतील विमान जमिनीवर आणणे जमले नाही. एअर इंडियाच्या या विजयात असलम इनामदारने १२चढाया करीत १बोनस व ४गुण घेतले.सुशांत साईलने १२चढायात ४गुण घेतले,पण एकदा त्याची अव्वल पकड झाली. आदित्य शिंदेने ६पकडी यशस्वी केल्या. महिंद्राच्या अनंत पाटीलने १४चढायात ५गुण घेतले खरे,पण ५वेळा तो पकडला गेला.पाटीलने हे अपयश आणि बचावातील त्रुटी महिंद्राच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. 

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने महात्मा गांघीचा २६-१७ असा पाडाव केला. दोन्ही संघाचे काही नामवंत खेळाडू खेळत नसल्यामुळे सामना तसा संथपणे खेळला गेला.मध्यंतरापर्यंत सामन्याचा गुणफलक १६-१०असा शिवशक्तीच्या बाजूने झुकला होता. गुणातील हा फरक शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा शिवशक्तीकडे २०-१६अशी आघाडी होती. शेवटी ९गुणांनी शिवशक्तीने हंगामातील या ५व्या राज्यस्तरीय विजयाला गवसणी घातली. वैयक्तिक कामगिरी पेक्षा दोन्ही संघाची सांधिक कामगिरी या सामन्यात उठून दिसली. रक्षा नारकर,पूजा यादव, पौर्णिमा जेधे यांचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. महात्मा गांधी कडून सायली जाधव, सृष्टी चाळके, तृप्ती सोनावणे यांना अखेर पर्यंत आपला खेळ उंचावता आला नाही. सायलीने या सामन्यात अवघे २गुण घेतले.

देना बँकेचा नितीन देशमुख व महिंद्राचा अनंत पाटील यांना पुरुषांत अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. महिलांत शिवशक्तीच्याच पूजा यादव व पूर्णिमा जेधे या दोघी अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. 

टॅग्स :Kabaddiकबड्डी