शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

राज्यस्तरीय कबड्डी : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 17:54 IST

या महिन्यातील एअर इंडियाचे तिसरे, तर शिवशक्तीचे हंगामातील पाचवे जेतेपद; सुशांत साईल, सायली जाधव सर्वोत्तम

मुंबई : एअर इंडिया, शिवशक्ती यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकाविले. एअर इंडियाचे या महिन्यातील हे तिसरे राज्यस्तरीय अजिंक्यपद, तर शिवशक्तीचे या हंगामातील हे पाचवे जेतेपद आहे. एअर इंडियाचा सुशांत साईल आणि महात्मा गांधींची सायली जाधव हे अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडू ठरले. 

शिंदेवाडी-दादर (पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर  झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने महिंद्राला ३५-१८अशी मात करत स्व.मोहन नाईक चषकावर नाव कोरले. एअर इंडियाने सुरवातच झोकात केली. त्यांच्या असलम इनामदारने आपल्या व संघाच्या पहिल्याच चढाईत बोनस करीत संघाला गुण मिळवून दिला. एअर इंडियाने २गुण घेतल्यानंतर महिंद्राच्या ऋतुराज कोरवीने असलमच्या पायात झेप घेत पहिला गुण घेतला.अनंत पाटीलच्या सलग ३पकडी करीत एअर इंडियाने महिंद्राचा एक टायर निकामी केला.तसेच १०मिनिटाला लोण देत एअर इंडियाने १२-०२अशी हवेत झेप घेली. लोण झाल्यानंतर अनंत पाटीलने एका चढाईत ३गडी टिपत महिंद्राचे इंजिन गरम करण्याचा प्रयत्न केला. पण तो क्षणिक ठरला.

मध्यंतराला २०-११अशी एअर इंडिया कडे आघाडी होती. मध्यांतरा नंतर १३व्या मिनिटाला एअर इंडियाने आणखी एक लोण देत ३१-१६अशी आघाडी घेत महिंद्राच्या सर्वच चाकातील हवा काढून घेतली.या लोण नंतर महिंद्राच्या इंजिनातील धडधड थंड झाली. या नंतर महिंद्राला एअर इंडियाचे हवेतील विमान जमिनीवर आणणे जमले नाही. एअर इंडियाच्या या विजयात असलम इनामदारने १२चढाया करीत १बोनस व ४गुण घेतले.सुशांत साईलने १२चढायात ४गुण घेतले,पण एकदा त्याची अव्वल पकड झाली. आदित्य शिंदेने ६पकडी यशस्वी केल्या. महिंद्राच्या अनंत पाटीलने १४चढायात ५गुण घेतले खरे,पण ५वेळा तो पकडला गेला.पाटीलने हे अपयश आणि बचावातील त्रुटी महिंद्राच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. 

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने महात्मा गांघीचा २६-१७ असा पाडाव केला. दोन्ही संघाचे काही नामवंत खेळाडू खेळत नसल्यामुळे सामना तसा संथपणे खेळला गेला.मध्यंतरापर्यंत सामन्याचा गुणफलक १६-१०असा शिवशक्तीच्या बाजूने झुकला होता. गुणातील हा फरक शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा शिवशक्तीकडे २०-१६अशी आघाडी होती. शेवटी ९गुणांनी शिवशक्तीने हंगामातील या ५व्या राज्यस्तरीय विजयाला गवसणी घातली. वैयक्तिक कामगिरी पेक्षा दोन्ही संघाची सांधिक कामगिरी या सामन्यात उठून दिसली. रक्षा नारकर,पूजा यादव, पौर्णिमा जेधे यांचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. महात्मा गांधी कडून सायली जाधव, सृष्टी चाळके, तृप्ती सोनावणे यांना अखेर पर्यंत आपला खेळ उंचावता आला नाही. सायलीने या सामन्यात अवघे २गुण घेतले.

देना बँकेचा नितीन देशमुख व महिंद्राचा अनंत पाटील यांना पुरुषांत अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. महिलांत शिवशक्तीच्याच पूजा यादव व पूर्णिमा जेधे या दोघी अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. 

टॅग्स :Kabaddiकबड्डी