शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

लंकेला हवे कसोटी मालिकेचे यजमानपद

By admin | Updated: October 20, 2014 05:01 IST

वेस्ट इंडीजने मालिकेतून माघार घेतल्यानंतर अल्पावधीत नियामक मंडळासमोर (बीसीसीआय) नवा प्रस्ताव ठेवला आहे.

कोलंबो : वेस्ट इंडीजने मालिकेतून माघार घेतल्यानंतर अल्पावधीत भारताविरुद्ध पाच वनडे सामन्यांची मालिका खेळण्यास सहमती दर्शविणाऱ्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (बीसीसीआय) नवा प्रस्ताव ठेवला आहे. पुढील वर्षी श्रीलंकन संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार होता. या दौऱ्याचे यजमानपद आता लंकेला हवे आहे. तसा प्रत्रव्यवहार त्यांनी बीसीसीआयशी केला आहे. श्रीलंका बोर्डाचा अधिकारी म्हणाला, की आम्ही १ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत सहभागी होण्यास होकार दिला आहे. आम्ही पुढील वर्षी आॅगस्ट महिन्यात भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविण्यास उत्सुक आहोत. याबाबतची चर्चा सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आताच या मालिकेबाबत सांगणे घाईचे ठरेल.पूर्वघोषित भविष्य दौरा कार्यक्रमानुसार श्रीलंका संघ आॅगस्ट २०१५ मध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर येणार होता. पण आता श्रीलंका बोर्ड या मालिकेचे यजमानपद भूषविण्यास उत्सुक आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून ८० लाख डॉलर्सची कमाई अपेक्षित आहे. भारतीय बोर्डाकडून अद्याप या मालिकेबाबत सूचना मिळालेली नाही. मंगळवारी होणाऱ्या कार्यकारी समितीच्या तातडीच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विंडीज संघाने दौरा अर्धवट सोडल्यामुळे या बैठकीचे आयोजन केले आहे. (वृत्तसंस्था)