शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सलग दोन मालिका विजय विराटसाठी स्पेशल

By admin | Updated: November 27, 2015 23:54 IST

एका युवा कर्णधारासाठी सलग दोन मालिकांमध्ये विजय मिळवणे स्पेशल बाब ठरते. विराट मायदेशात खेळत असल्यामुळे त्याच्यावर अधिक दडपण होते.

एका युवा कर्णधारासाठी सलग दोन मालिकांमध्ये विजय मिळवणे स्पेशल बाब ठरते. विराट मायदेशात खेळत असल्यामुळे त्याच्यावर अधिक दडपण होते. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावरील संघ असल्यामुळे विराटसाठी हा मालिका विजय मोठी उपलब्धी आहे. मला विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये बदल दिसत आहे. कर्णधार म्हणून विराट अ‍ॅक्टिव्ह आहे. तो प्रत्येक चेंडूनंतर खेळाडूंसोबत चर्चा करतो. कारण तो धोनीप्रमाणे यष्टिरक्षण करीत नाही. तो गोलंदाजांसोबत चर्चा करतो. त्यामुळे गोलंदाजांना कामगिरी सुधारण्यास मदत मिळते. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम अमलाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी-कधी दोन स्वरूपासाठी वेग-वेगळे कर्णधार असणे चांगली बाब ठरते, पण कधी-कधी अडचणीचेही ठरते. कारण त्यामुळे दुसरा कर्णधार थोडा रिलॅक्स होतो. तसे वेगवेगळ्या शैलीच्या कर्णधारांना परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेळ लागतो. या खेळपट्टीवर कर्णधार म्हणून एबी डिव्हिलियर्सलाही संघर्ष करावा लागला असते, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. हाशिमने चांगली भूमिका बजावली. निकालाच्या आधारावर त्याच्या कामगिरीचे आकलन करणे योग्य ठरणार नाही. आमला ही भूमिका बजावू शकतो किंवा नाही, याचा निर्णय पुढील सहा महिन्यांमध्ये होईलच. मी कधीच दोन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलेलो नाही, पण अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली नक्कीच खेळलो. गेल्या तीन वर्षांत दक्षिण आफ्रिका कसोटी संघात अनेक बदल झालेले आहेत. कर्णधार ग्रॅमी स्मिथ, अष्टपैलू जॅक कॅलिस, शानदार यष्टिरक्षक मार्क बाऊचर आता संघात नाहीत. अशा खेळाडूंची उणीव भरून काढण्यासाठी कधी-कधी एका दशकाचाही वेळ लागू शकतो. या व्यतिरिक्त डेल स्टेनही संघात नाही. त्याची रिव्हर्स स्विंग गोलंदाजी या खेळपट्टीवर भेदक ठरली असती. मी खेळपट्टीबाबत काही बोलू इच्छित नाही. येथे खेळणे निश्चितच कठीण होते, पण द. आफ्रिका संघाने फिरकीविरुद्ध लौकिकाला साजेशी फलंदाजी केली नाही. भारताला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला होता. अश्विनने सामन्यात १२ बळी घेतले. त्याचा मारा खेळणे अडचणीचे ठरत आहे. तो जगातील सर्वोत्मत आॅफ स्पिनर ठरत आहे. कामगिरीत सातत्य राखणारा अश्विन आक्रमकही आहे. जडेजाही चांगली गोलंदाजी करीत आहे. खेळपट्टी त्याच्यासाठी अनुकूल आहे. पहिल्या डावात ७९ धावांत गारद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघासाठी सामन्यात परतणे कठीण होते. (टीसीएम)