शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सलग दोन मालिका विजय विराटसाठी स्पेशल

By admin | Updated: November 27, 2015 23:54 IST

एका युवा कर्णधारासाठी सलग दोन मालिकांमध्ये विजय मिळवणे स्पेशल बाब ठरते. विराट मायदेशात खेळत असल्यामुळे त्याच्यावर अधिक दडपण होते.

एका युवा कर्णधारासाठी सलग दोन मालिकांमध्ये विजय मिळवणे स्पेशल बाब ठरते. विराट मायदेशात खेळत असल्यामुळे त्याच्यावर अधिक दडपण होते. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावरील संघ असल्यामुळे विराटसाठी हा मालिका विजय मोठी उपलब्धी आहे. मला विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये बदल दिसत आहे. कर्णधार म्हणून विराट अ‍ॅक्टिव्ह आहे. तो प्रत्येक चेंडूनंतर खेळाडूंसोबत चर्चा करतो. कारण तो धोनीप्रमाणे यष्टिरक्षण करीत नाही. तो गोलंदाजांसोबत चर्चा करतो. त्यामुळे गोलंदाजांना कामगिरी सुधारण्यास मदत मिळते. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम अमलाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी-कधी दोन स्वरूपासाठी वेग-वेगळे कर्णधार असणे चांगली बाब ठरते, पण कधी-कधी अडचणीचेही ठरते. कारण त्यामुळे दुसरा कर्णधार थोडा रिलॅक्स होतो. तसे वेगवेगळ्या शैलीच्या कर्णधारांना परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेळ लागतो. या खेळपट्टीवर कर्णधार म्हणून एबी डिव्हिलियर्सलाही संघर्ष करावा लागला असते, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. हाशिमने चांगली भूमिका बजावली. निकालाच्या आधारावर त्याच्या कामगिरीचे आकलन करणे योग्य ठरणार नाही. आमला ही भूमिका बजावू शकतो किंवा नाही, याचा निर्णय पुढील सहा महिन्यांमध्ये होईलच. मी कधीच दोन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलेलो नाही, पण अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली नक्कीच खेळलो. गेल्या तीन वर्षांत दक्षिण आफ्रिका कसोटी संघात अनेक बदल झालेले आहेत. कर्णधार ग्रॅमी स्मिथ, अष्टपैलू जॅक कॅलिस, शानदार यष्टिरक्षक मार्क बाऊचर आता संघात नाहीत. अशा खेळाडूंची उणीव भरून काढण्यासाठी कधी-कधी एका दशकाचाही वेळ लागू शकतो. या व्यतिरिक्त डेल स्टेनही संघात नाही. त्याची रिव्हर्स स्विंग गोलंदाजी या खेळपट्टीवर भेदक ठरली असती. मी खेळपट्टीबाबत काही बोलू इच्छित नाही. येथे खेळणे निश्चितच कठीण होते, पण द. आफ्रिका संघाने फिरकीविरुद्ध लौकिकाला साजेशी फलंदाजी केली नाही. भारताला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला होता. अश्विनने सामन्यात १२ बळी घेतले. त्याचा मारा खेळणे अडचणीचे ठरत आहे. तो जगातील सर्वोत्मत आॅफ स्पिनर ठरत आहे. कामगिरीत सातत्य राखणारा अश्विन आक्रमकही आहे. जडेजाही चांगली गोलंदाजी करीत आहे. खेळपट्टी त्याच्यासाठी अनुकूल आहे. पहिल्या डावात ७९ धावांत गारद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघासाठी सामन्यात परतणे कठीण होते. (टीसीएम)