शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

दाक्षिणात्य संस्कृतीने फेडले डोळ्यांचे पारणे, PM मोदींच्याहस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 05:48 IST

पंतप्रधानांनी केले उद्घाटन

चेन्नई : भारतात पहिल्यांदाच आयोजन होत असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला गुरुवारी जबरदस्त सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर त्यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी दाक्षिणात्य संस्कृतीचे शानदार सादरीकरण करत आयोजकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सुपरस्टार अभिनेता रजनिकांत यांची उपस्थिती या सोहळ्यात आकर्षणाचे केंद्र ठरली.

बुद्धिबळ खेळाचा विश्वचषक अशी ओळख असलेल्या या ४४ व्या स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत भारतीयांनी यावेळी जगभरातील उपस्थित बुद्धिबळप्रेमींचे लक्ष वेधले. स्टेडियमबाहेर आकर्षक रोषणाई करण्यासह भलामोठा चेसबोर्ड साकारण्यात आला होता. यावर स्पर्धेतील सहभागी देशांचे ध्वज फडकावण्यात आले होते. १० ऑगस्टपर्यंत येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची चुरस रंगेल. ज्या मार्गावरून मोदी स्टेडियमवर जाणार होते, त्या संपूर्ण मार्गावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच मार्गात संगीतकार आणि वादकांनी आपले अप्रतिम सादरीकरण करत पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत केले. स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना मोदी यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला.उद्घाटन सोहळ्यादरम्यान भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन घडवून आयोजकांनी विदेशी खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे मन जिंकले. ऑर्केस्ट्राच्या धमाकेदार सादरीकरण आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रिया, अल्बानिया, अल्जेरिया, अंगोला, अर्जेंटिना आणि बार्बाडोस यांच्यासह इतर सर्व स्पर्धक देशांच्या संघांचे दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय शास्त्रीय नृत्याचे सर्व आठ प्रकार कथ्थक, ओडिसी, कुचुपुडी, कथक्कली, मोहिनीअट्टम, मणिपुरी, सत्तिया आणि भरतनाट्यम यांचे सादरीकरण करण्यात आले.स्टेडियममध्ये बुद्धिबळ खेळातील राजा, राणी, हत्ती, ऊंट, घोडा आणि प्यादा यांच्या मोठ्या प्रतिकृती साकारून केलेली आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली. उद्घाटन सोहळ्यादरम्यान मोदी यांच्यासह केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राज्यपाल आर. एन. रवी यांचीही उपस्थिती होती.

लोकांच्या लक्षात राहील ऑलिम्पियाड : मोदीभारतात पहिल्यांदाच आयोजित होत असलेले बुद्धिबळ ऑलिम्पियाड विशेष बाब असून, ही स्पर्धा जगभरातील लोकांच्या कायम लक्षात राहील. लोकांना आणि समाजाला एकत्र आणण्याची ताकद खेळांमध्ये आहे. कोरोना महामारीदरम्यानही खेळांनीच जगाला जोडून ठेवले. भारताने ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि मूक-बधिर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करीत आपले सर्वोत्तम प्रदर्शन सादर केले. त्यामुळे देशात या भव्य स्पर्धेचे आयोजन करणे, एक सकारात्मक आणि अत्यंत योग्य पाऊल ठरले आहे. खेळामध्ये कोणीही पराभूत होत नाही. यामध्ये विजेता आणि भविष्यातील विजेता असतो. आज मी बुद्धिबळ ऑलिम्पियाड आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. 

काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानची माघार बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू होण्याआधी देशभर भ्रमंतीवर असलेली टॉर्च रिले काश्मीरमध्ये फिरविल्यावरून पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली आहे. ४४ व्या ऑलिम्पियाडमध्ये १८८ देशातील १७०० खेळाडूंचा सहभाग आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Chessबुद्धीबळ