शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

दिव्यांग खेळाडूंसाठी साई केंद्र सुरू होणार, करिअर म्हणूनच खेळाकडे पाहा, आयुष्याला शिस्त लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:34 IST

दिव्यांग खेळाडूंसाठी देशात पहिले साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) केंद्र लवकरच सुरू होत आहे. या केंद्रात दिव्यांगांसाठी लागणा-या सर्व सुविधा असतील. गुजरातच्या गांधीनगर शहरात सध्याच्या साई केंद्राचे रूपांतर पॅरा खेळाडूंच्या तयारीसाठी करण्यात येत आहे.

किशोर बागडे ।नागपूर : दिव्यांग खेळाडूंसाठी देशात पहिले साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) केंद्र लवकरच सुरू होत आहे. या केंद्रात दिव्यांगांसाठी लागणा-या सर्व सुविधा असतील. गुजरातच्या गांधीनगर शहरात सध्याच्या साई केंद्राचे रूपांतर पॅरा खेळाडूंच्या तयारीसाठी करण्यात येत आहे.राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया याच्या आग्रहानंतर केंद्र शासनाने वेगाने पावले उचलली. या केंद्रात दिव्यांग खेळाडूंसाठी विविध खेळांचा सराव आणि निवासव्यवस्था असेल. याशिवाय आंतरराष्टÑीय स्पर्धांची तयारी, शिबिरे याच ठिकाणी आयोजिली जातील. झझारिया याने अलीकडे दिव्यांगांसाठी एकही साई केंद्र नसल्याची खंत व्यक्त केली होती. माजी क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तातडीने दखल घेत साई केंद्राचे रूपांतर दिव्यांग खेळाडूंसाठी करण्याचे आदेश दिल्याची माहिती स्वत: देवेंद्रने नागपूरभेटीत ‘लोकमत’ला दिली. तत्पूर्वी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना मार्गदर्शन करताना देवेंद्र म्हणाला, ‘‘आॅलिम्पिक पदक हे खेळाडूंचे स्वप्न असले तरी सर्वांना मिळत नाही. यश आणि लोकप्रियतेसोबतच जीवनाला शिस्त लावण्याची ताकद खेळांमध्ये आहे. आपल्याकडे अमुक गोष्ट नाही, म्हणून रडत बसण्यापेक्षा विपरीत परिस्थितीत संघर्ष केल्यास यश कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.’’सध्याचे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड स्वत: आॅलिम्पिक रौप्यविजेते नेमबाज राहिले आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या वेळी देवेंद्रने खेळाडूंना काय हवे, यावर चर्चा केली. त्यांनीही साई केंद्र अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्याचे झझारियाने सांगितले. भारतीय पॅरालिम्पिक (पीसीआय) समितीवरील बंदीमुळे खेळाडू भरडला जात असून खेळाडूंना देशात आणि देशाबाहेरही मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. खुर्चीच्या भांडणात अडकलेल्यांना घरी बसवायला हवे. माजी पॅरालिम्पिकपटूंना संघटनेत स्थान मिळाल्यास खेळाचे हित साधले जाईल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. पुढील लक्ष्य काय, असे विचारताच ३६ वर्षांचा देवेंद्र म्हणाला, ‘‘मी सध्या पाच तास (फिटनेस) सराव करतो. आशियाडची तयारी सुरू करणार आहे. २०२० च्या टोकिओ पॅरालिम्पिकमध्ये कामगिरीत सातत्य राखून देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे.’’ ‘आॅफर’आल्यास राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे काय, असे विचारताच राजस्थानातील चुरू येथे वास्तव्य करणारा देवेंद्र हसून म्हणाला, ‘‘राजकारण वाईट नाही. संधी मिळाल्यास सेवाभाव म्हणून काम करण्याची इच्छा आहे. दिव्यांगांच्या समस्या मांडता येतील. पण सध्या खेळात रमलो आहे.’’>वयाच्या आठव्या वर्षी फळे तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या देवेंद्रचा डावा हात विजेच्या जिवंत तारेला लागला. डॉक्टरांनी हात कापल्याने वडील रामसिंग आणि आई जीवनीदेवी यांच्यावर आभाळ कोसळले. मुलाला अधिकारी बनविण्याचे स्वप्न जोपासणाºया आई-वडिलांना देवेंद्रने काही करून दाखविण्याचा शब्द दिला. शाळेतील क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात भालाफेकीत कमाल करणाºया देवेंद्रवर कोच आर. डी. सिंग यांची नजर गेली. त्यांनी त्याला घडविले.भाला विकत घेण्यासाठी पैसे नव्हत, तेव्हा एका परदेशी भारतीयाने त्याची मदत केली. मग देवेंद्रने स्वत:चा शब्द खरा ठरविला. २००४ (अथेन्स) आणि २०१६ (रिओ) पॅरालिम्पिकचे सुवर्ण जिंकणाºया देवेंद्रने ६३.९३ मीटर भालाफेकीचा नवा विश्वविक्रमही नोंदविला आहे.यंदा ‘राजीव गांधी खेलरत्न’ हा सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘पॅरालिम्पियन’ला प्रथमच मिळाला हे विशेष. पद्मश्री, अर्जुन आणि खेलरत्न असे तिन्ही पुरस्कार स्वत:च्या शिरपेचात खोवणाºया देवेंद्रकडे आज दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार आंतरराष्टÑीय पदके आहेत. सध्या तो साई केंद्रात समन्वयकपदावर कार्यरत आहे.