शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
4
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
6
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
7
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
8
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
9
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
10
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
11
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
12
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
14
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
15
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
16
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
17
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
18
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
19
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

रोहितचे शतक व्यर्थ, भारत पराभूत

By admin | Updated: January 19, 2015 03:22 IST

सलामीवीर अ‍ॅरोन फिंचला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी भारताचा ४ गडी राखून पराभव केला

मेलबोर्न : सलामीवीर अ‍ॅरोन फिंचला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी भारताचा ४ गडी राखून पराभव केला आणि वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत सलग दुसरा विजय मिळवीत अंतिम फेरीच्या दिशेने आश्वासक आगेकूच केली. भारताच्या रोहित शर्माची (१३८) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. भारताने दिलेल्या २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने फिंचच्या (९६ धावा, १२७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४९ षटकांत विजयासाठी आवश्यक धावा ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. त्याआधी, मिशेल स्टार्कच्या (४३ धावांत ६ बळी) आॅस्ट्रेलियाने भारताचा डाव ८ बाद २६७ धावांत रोखला. भारताच्या डावात शतकवीर रोहित शर्मासह सुरेश रैनाचे (५१) योगदान उल्लेखनीय ठरले. फिंचच्या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाला प्रतिकूल परिस्थिीतही लक्ष्य गाठण्यात यश आले. फिंचने डेव्हिड वॉर्नरसह (२४) सलामीला ५१ धावांची, शेन वॉटसनसोबत (४१) दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची, कर्णधार स्टिव्हन स्मिथसोबत (४७) तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. भारताने अखेरच्या षटकांमध्ये अचूक मारा करीत आॅस्ट्रेलियावर दडपण निर्माण केले; पण अखेर यजमान संघ विजय मिळविण्यात यशस्वी ठरला. भारतातर्फे उमेश यादवने ५५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. आॅस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेत सलामी लढतीत इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला होता. भारताला आता दुसऱ्या लढतीत २० जानेवारी रोजी इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच व वॉर्नर यांनी आॅस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी नवव्या षटकात आॅस्ट्रेलियाला धावसंख्येचे अर्धशतक गाठून दिले. यादवने वॉर्नरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या वॉटसनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. वॉटसन वैयक्तिक २८ धावांवर असताना सुदैवी ठरला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्याच्याविरुद्धचे पायचितचे अपील पंचानी फेटाळले. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या वॉटसनला (४१ धावा, ३९ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) पटेलने तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर अश्विनने कर्णधार जॉर्ज बेली (५), तर भुवनेश्वरने ग्लेन मॅक्सवेलला (२०) बाद करीत यजमान संघावर दडपण निर्माण केले. ब्रॅड हॅडिन (नाबाद १३) व जेम्स फॉकनर (नाबाद ९) यांनी आॅस्ट्रेलियाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितचे काराकिर्दीतील सहावे, तर आॅस्ट्रेलियाविरुद्धचे हे तिसरे शतक आहे. रोहित व रैना यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करीत डाव सावरला. कर्णधार धोनी (१९) बाद झाला. अखेरच्या १० षटकांत भारताने ४ विकेटचे मोल देत केवळ ६१ धावा फटकाविल्या. (वृत्तसंस्था)