शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

रोहितचे शतक व्यर्थ, भारत पराभूत

By admin | Updated: January 19, 2015 03:22 IST

सलामीवीर अ‍ॅरोन फिंचला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी भारताचा ४ गडी राखून पराभव केला

मेलबोर्न : सलामीवीर अ‍ॅरोन फिंचला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याने केलेल्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने रविवारी भारताचा ४ गडी राखून पराभव केला आणि वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत सलग दुसरा विजय मिळवीत अंतिम फेरीच्या दिशेने आश्वासक आगेकूच केली. भारताच्या रोहित शर्माची (१३८) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. भारताने दिलेल्या २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने फिंचच्या (९६ धावा, १२७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४९ षटकांत विजयासाठी आवश्यक धावा ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. त्याआधी, मिशेल स्टार्कच्या (४३ धावांत ६ बळी) आॅस्ट्रेलियाने भारताचा डाव ८ बाद २६७ धावांत रोखला. भारताच्या डावात शतकवीर रोहित शर्मासह सुरेश रैनाचे (५१) योगदान उल्लेखनीय ठरले. फिंचच्या खेळीमुळे आॅस्ट्रेलियाला प्रतिकूल परिस्थिीतही लक्ष्य गाठण्यात यश आले. फिंचने डेव्हिड वॉर्नरसह (२४) सलामीला ५१ धावांची, शेन वॉटसनसोबत (४१) दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची, कर्णधार स्टिव्हन स्मिथसोबत (४७) तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. भारताने अखेरच्या षटकांमध्ये अचूक मारा करीत आॅस्ट्रेलियावर दडपण निर्माण केले; पण अखेर यजमान संघ विजय मिळविण्यात यशस्वी ठरला. भारतातर्फे उमेश यादवने ५५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. आॅस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेत सलामी लढतीत इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला होता. भारताला आता दुसऱ्या लढतीत २० जानेवारी रोजी इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच व वॉर्नर यांनी आॅस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी नवव्या षटकात आॅस्ट्रेलियाला धावसंख्येचे अर्धशतक गाठून दिले. यादवने वॉर्नरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या वॉटसनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. वॉटसन वैयक्तिक २८ धावांवर असताना सुदैवी ठरला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्याच्याविरुद्धचे पायचितचे अपील पंचानी फेटाळले. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या वॉटसनला (४१ धावा, ३९ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) पटेलने तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर अश्विनने कर्णधार जॉर्ज बेली (५), तर भुवनेश्वरने ग्लेन मॅक्सवेलला (२०) बाद करीत यजमान संघावर दडपण निर्माण केले. ब्रॅड हॅडिन (नाबाद १३) व जेम्स फॉकनर (नाबाद ९) यांनी आॅस्ट्रेलियाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितचे काराकिर्दीतील सहावे, तर आॅस्ट्रेलियाविरुद्धचे हे तिसरे शतक आहे. रोहित व रैना यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करीत डाव सावरला. कर्णधार धोनी (१९) बाद झाला. अखेरच्या १० षटकांत भारताने ४ विकेटचे मोल देत केवळ ६१ धावा फटकाविल्या. (वृत्तसंस्था)